शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यात प्रेमीयुगुल पलायनाच्या प्रकारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:53 IST

चार महिन्यात २२, तर तीन वर्षात ७० प्रेमीयुगल गायब, चर्चेचा विषय

ठळक मुद्देतालुक्यात गेल्या चार महिन्यात मुलींना पळवून नेणे व प्रेमीयुगुल म्हणून पलायन करणे अशी जवळपास २२ प्रकरणे झाली असून, काहींची पोलीस ठाण्यात नोंद आहे. परंतु नोद नसलेलीही अनेक प्रकरणे आहेत.या प्रकाराने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.

सैयद लियाकत ।जामनेर, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात गेल्ल्या पाच-सहा दिवसांपासून एका चर्चेला उत आहे ‘याची मुलगी पळून गेली...’, ‘त्याचा मुलगा पळून गेला...’ मोबाइल, चित्रपट, टीव्ही मालिकांचे अनुकरण करीत घरच्यांचा विरोध असूनही ‘प्रेमीयुगुलांचे, पलायन करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात जवळपास २२ मुला-मुलींनी पलायन केले आहे. गेल्या तीन वर्षात १०५ जण हरविल्याची (मिसिंग) नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. यात तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात ७० तरुण-तरुणीनी पलायन केले आहे. यातील काहींंची पोलीस ठाण्यात नोंद आहे, तर काहींंनी प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, बदनामी होईल या भीतीपोटी पोलीस गाठलेच नाही. मात्र घडत असलेल्या प्रकारांबद्दल पालकवर्गात चिंतेचे वातावरण असून, दुसरीकडे हा विषय चर्चेचा विषय बनला आहे.प्रेमीयुगुलाने शहरातून, गावातून पलायन केले तर चार दिवस, १५ दिवस, महिनाभरात ते रजिस्टर लग्न करूनच पोलीस ठाण्यात दाखल होतात. काही मुलीदेखील प्रेमात आंधळ्या होत, आई-वडिलांचा, भविष्याचा कुठलाही विचार न करता लग्नाला समंती देतात. या वाढत्या प्रकरणामुळे अनेक पालक चिंतित झाले आहेत. या प्रकाराला आळा बसावा म्हणून महाविद्यालयात जनजागृती, शिबिरे, व्याख्याने राबविण्याची गरज आहे.पालकानी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांशी संवाद साधला पाहिजे. आईने मुलीची दररोज चौकशी करावी. त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवणे गरजेचे आहे.-राजेश काळे,प्रभारी पोलीस अधिकारी, जामनेर 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJamnerजामनेर