शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

जामनेर तालुक्यात प्रेमीयुगुल पलायनाच्या प्रकारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:53 IST

चार महिन्यात २२, तर तीन वर्षात ७० प्रेमीयुगल गायब, चर्चेचा विषय

ठळक मुद्देतालुक्यात गेल्या चार महिन्यात मुलींना पळवून नेणे व प्रेमीयुगुल म्हणून पलायन करणे अशी जवळपास २२ प्रकरणे झाली असून, काहींची पोलीस ठाण्यात नोंद आहे. परंतु नोद नसलेलीही अनेक प्रकरणे आहेत.या प्रकाराने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.

सैयद लियाकत ।जामनेर, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात गेल्ल्या पाच-सहा दिवसांपासून एका चर्चेला उत आहे ‘याची मुलगी पळून गेली...’, ‘त्याचा मुलगा पळून गेला...’ मोबाइल, चित्रपट, टीव्ही मालिकांचे अनुकरण करीत घरच्यांचा विरोध असूनही ‘प्रेमीयुगुलांचे, पलायन करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात जवळपास २२ मुला-मुलींनी पलायन केले आहे. गेल्या तीन वर्षात १०५ जण हरविल्याची (मिसिंग) नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. यात तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात ७० तरुण-तरुणीनी पलायन केले आहे. यातील काहींंची पोलीस ठाण्यात नोंद आहे, तर काहींंनी प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, बदनामी होईल या भीतीपोटी पोलीस गाठलेच नाही. मात्र घडत असलेल्या प्रकारांबद्दल पालकवर्गात चिंतेचे वातावरण असून, दुसरीकडे हा विषय चर्चेचा विषय बनला आहे.प्रेमीयुगुलाने शहरातून, गावातून पलायन केले तर चार दिवस, १५ दिवस, महिनाभरात ते रजिस्टर लग्न करूनच पोलीस ठाण्यात दाखल होतात. काही मुलीदेखील प्रेमात आंधळ्या होत, आई-वडिलांचा, भविष्याचा कुठलाही विचार न करता लग्नाला समंती देतात. या वाढत्या प्रकरणामुळे अनेक पालक चिंतित झाले आहेत. या प्रकाराला आळा बसावा म्हणून महाविद्यालयात जनजागृती, शिबिरे, व्याख्याने राबविण्याची गरज आहे.पालकानी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांशी संवाद साधला पाहिजे. आईने मुलीची दररोज चौकशी करावी. त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवणे गरजेचे आहे.-राजेश काळे,प्रभारी पोलीस अधिकारी, जामनेर 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJamnerजामनेर