शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मन वढायं.. वढायं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:52 IST

मानवी मन मोठं अथांग आहे. प्राचीन काळात या ऋषीमुनींपासून आजच्या मानसशास्त्रांपर्यंत सर्वांनीच आप-आपल्यापरीने मनाचं स्वरुप समजावून घेण्याचा, विशद करण्याचा ...

मानवी मन मोठं अथांग आहे. प्राचीन काळात या ऋषीमुनींपासून आजच्या मानसशास्त्रांपर्यंत सर्वांनीच आप-आपल्यापरीने मनाचं स्वरुप समजावून घेण्याचा, विशद करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही मनाचे नेमके स्वरुप कुणाला आकलन झालेले नाही. मनाला इंद्रियांचा राजा म्हणतात. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मोंद्रिये ही १० इंद्रिये ज्याच्या इशाऱ्यावर काम करतात ते मन हे अकरावे इंद्रिय मानले गेले आहे. इतर इंद्रियांना दृश्यरुप आहे. आकार आहे, ज्याचे त्याचे निश्चित असे स्थान आहे. पण आपल्या शरीरात मन नेमके कुठे ठेवले आहे? त्याचा आकार स्वरुप कसा आहे? संत ज्ञानेश्वर महाराज या मनाबद्दल निरुपण करताना म्हणतात ‘हे मन कैसे केवढे । पाहो म्हणो तरी न सापडे । परी राहाटावया धोकडे । त्रैलोक्य इया ।। ‘पाहू गेलो तर दिसत नाही. सर्वत्र फिरत मात्र असतं. त्याचा स्वभाव मात्र चंचल आहे. एका जागी स्थिर राहत नाही. एका विषयात रमत नाही. मन चपय चपय याची काय सांगू मात । आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात । असं त्याचं वर्णन बहिणाबाई करतात. इंद्रियांना विषयामागे धावायला मनच भाग पाडतं. मन कधी कृती करत मग शरीराकडून ती कृती पूर्ण होते. मनात सतत विविध संकल्प विकल्पाची उलथापालथ सुरू असते. म्हणूनच महर्षी पतंजलींनी ‘संकल्प विकल्पात्मक मन’ अशी मनाची व्याख्या केली आहे. तसे मन भोगत काहीच नाही. मानवी सुख-दुखाचे एकमेव कारण ही मनच आहे. मनके मारे हार है... मन के मारे जीत । मन ही मिलाय रामको मन करे फजित । असे मनाचे वर्णन कबीरांनी एका दोह्यात केलेले आहे. शास्त्रकारांनी माणसाच्या बंधमोक्षाचे कारण मनच आहे असे सांगितले आहे.मन एवं मनुष्यवाणी कारण बंध मोक्षय ।। अशा या चंचल मनाला स्थिर कसे करता येईल? माकडाची कधी समाधी लागू शकेल काय? हे कैसे घडेल का मर्कट समाधी येईल? असा प्रश्न माऊली विचारतात. गीतेच्या सहाव्या अध्यायास अर्जूनाचा श्रीकृष्णाशी या विषयावर मोठा गोड संवाद झाला आहे. मन चंचल खरेच पण अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनांनी ते निश्चित स्थिर होईल. काबूत येईल असे भगवंत सांगतात. मन एकदा स्थिर झाले की मग सुखाच्या कोठाराची चाबी सापडलीच समजा. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।आज प्रत्येक जण ताण-तणावाखाली आहे. परंतु त्याकडे निकोप दृष्टीने पाहण्याची गरज आहे. मनाच्या स्वास्थासाठी ध्यानाचा उत्तम उपाय ऋषीमुनींनी सांगितला आणि नामस्मरणाचा सोपा मार्ग संतांनी सांगितला. एकदा नामाची गोडी लागली ती सुटत नाही. लाचावले मन लागली से गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले । मग सर्व समस्या सुटत असतात.-प्रा.सी.एच.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव