शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ममुराबादला शेडअभावी स्मशानभूमीत गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:28 IST

ममुराबाद‌ : अंत्यसंस्कारासाठी सोयीची जागा नसल्याने गावात मृतदेहांना उघड्यावरील अस्वच्छ ठिकाणी जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार केले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ...

ममुराबाद‌ : अंत्यसंस्कारासाठी सोयीची जागा नसल्याने गावात मृतदेहांना उघड्यावरील अस्वच्छ ठिकाणी जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार केले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

१५ हजारावर लोकसंख्या असलेल्या ममुराबाद गावासाठी ग्रामपंचायतीने कधीकाळी शेडचा निवारा असलेल्या स्मशानभूमीसाठी ठराविक ठिकाणी व्यवस्था केलेली होती. ब्रिटिश काळातील ती स्मशानभूमी नामशेष झाल्यापासून ग्रामस्थ उघड्यावर जागा मिळेल तिथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. त्याकरिता बऱ्याच वेळा गावालगतची शेती, बखळ जागा, खळवाडी तसेच जळगाव- विदगाव रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेचा पर्याय निवडला जातो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार आटोपताना फार कष्ट पडत नसले तरी पावसाळ्यात सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरल्यानंतर उघड्यावरील अंत्यसंस्काराला मर्यादा येतात. एकसारखा पाऊस सुरू असल्यास लाकडे ओली होत असल्याने मृतदेह जाळताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. मोठे रबरी टायर्स तसेच डिझेलचा वापरही केला जातो. पाऊस असल्यास अंत्ययात्रा थेट जळगाव शहरातील शिवाजीनगरच्या स्मशानभूमीत नेली जाते. गरीब असो की श्रीमंत सर्वांना आप्तेष्टांच्या मृतदेहाची अवहेलना सहन करावी लागते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आव्हाणे रस्त्यालगत त्यांच्या निधीतून स्मशानभूमी बांधून दिली होती. मात्र, जागेची निवड चुकल्याने त्या ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास कोणीच तयार झाले नाही.

स्मशानभूमीसाठी भूसंपादनाची गरज

सरकारी अथवा खासगी जागा निश्चित नसल्याने आजतागायत ममुराबाद येथील स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. भविष्यातही त्यावर तोडगा निघण्याची शक्यता कमीच आहे. ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष बाब म्हणून भूसंपादनाचा प्रस्ताव दिल्यास जागेचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज मात्र आहे.