शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

यावल तालुक्यावर ‘प्रभारी राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:10 IST

यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयांमध्ये अनेक महत्त्वाची पदे रिक्तमंजूर विविध पदांपैकी ८० टक्के पदे रिक्तसांगायला दोन आमदार, तरीही तालुक्याकडे दुर्लक्षयास तालुकावासीयांची सहनशिलता की लोकप्रनिधिंची उदासीनता कारणीभूततालुकावासीयांकडून उपस्थिततालुक्याचा विकास ठप्पसर्वसामान्य नागरिकांची कामे होईना

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.यावल तालुका हा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. साहजिकच तालुक्यास दोन आमदार लाभले आहेत. दोन आमदार असताना तालुक्यातील या महत्त्वाच्या कार्यालयास कोणीही ‘वाली’ नसल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे की, यास तालुकावासींची सहनशिलता कारणीभूत आहे की लोकप्रतिनिधींची उदासीनता?ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदूग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेले व मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या येथील पंचायत समितीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून गटविकास अधिकारी नाही. पंचायत समितीचे कामकाज सुरू दिसत असले तरी सक्षम अधिकारी नसल्याने ‘आव-जाव घर तुम्हारा है’ अशी गत आहे. यात मात्र ग्रामस्थांची हेळसांड होत आहे.तालुका कृषी कार्यालययेथील विरावली रस्त्यावरील शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुका कृषी कार्यालयाचे कामकाज तर ‘रामभरोसे’च सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त आहे . दुय्यम अधिकारी म्हणून असलेल्या तीनही मंडळ अधिकारी पदांसह अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.कार्यालयातील सूत्रांनुसार, मंजूर विविध पदांपैकी ८० टक्के पदे रिक्त आहेत. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील या कार्यालयात शेतकरी केव्हाही गेल्यास कार्यालयातील मोजके कर्मचारी सोडल्यास सर्व टेबल्स रिक्तच दिसतात. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.पोलीस ठाणेगेल्या दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी यांची मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. दुय्यम अधिकारी सुजीत ठाकरे यांचीही गेल्या १५ दिवसांपासून बदली झालेली आहे. मात्र ‘प्रभारी अधिकारी’ नसल्याने ते थांबून आहेत. शहरासह हद्दीत अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले. स्थानिक पोलीस सर्व आॅलवेल सांगत असले तरी स्थानिक गुन्हे अन्वेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून मधून-मधून विविध ठिकाणी छापे, अवैध व्यावसायिकांवर मारले जातात. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार चालत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे.ग्रामीण रुग्णालययेथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे प्रथमोपचार केंद्र आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालस अधीक्षक लाभलेले नाहीत, तर वैद्यकीय अधिकाºयांची सर्वच पदे रिक्त आहेत. फिरत्या आरोग्य पथकाच्या डॉॅक्टरांकडून दररोज बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. वेळेनंतर रुग्णांवर येथे केवळ प्रथमोपचार करून त्यांना जळगावला पाठवण्यात येते. ग्रामीण रुग्णालयाला अनेक वर्षांपासून स्थायी अधिकारी मिळू नये, यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते असू शकते, असा प्रश्न यावल तालुकावासीयांमधून उपस्थित करण्यात येत आहे.नगरपालिकायेथील नगरपालिकेचीही तीच गत आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून येथे मुख्याधिकारी नाही. रावेर पालिकेचे मुख्याधिकारी आर.एस.लांडे यांच्याकडे यावल पालिकेचा अतिरिक्त पदभार आहे. पालिकेला नियमित मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. नागरिकांची दैनंदिन कामे त्यामुळे खोळंबून पडत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.शहरासह सर्व तालुकास्तरीय कार्यालयाचीच ही गत झाली आहे. सर्व कार्यालयांचे बाहेरील अधिकारीच ‘प्रभारी’ आहेत. बाहेरील तालुक्यास अधिकारी भेटतात. मग आपल्याच तालुक्यास का नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत यास तालुकावासीयांची सहनशिलता की लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे, असा कोडे न उलगडणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारYawalयावल