शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

यावल तालुक्यावर ‘प्रभारी राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:10 IST

यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयांमध्ये अनेक महत्त्वाची पदे रिक्तमंजूर विविध पदांपैकी ८० टक्के पदे रिक्तसांगायला दोन आमदार, तरीही तालुक्याकडे दुर्लक्षयास तालुकावासीयांची सहनशिलता की लोकप्रनिधिंची उदासीनता कारणीभूततालुकावासीयांकडून उपस्थिततालुक्याचा विकास ठप्पसर्वसामान्य नागरिकांची कामे होईना

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.यावल तालुका हा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. साहजिकच तालुक्यास दोन आमदार लाभले आहेत. दोन आमदार असताना तालुक्यातील या महत्त्वाच्या कार्यालयास कोणीही ‘वाली’ नसल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे की, यास तालुकावासींची सहनशिलता कारणीभूत आहे की लोकप्रतिनिधींची उदासीनता?ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदूग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेले व मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या येथील पंचायत समितीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून गटविकास अधिकारी नाही. पंचायत समितीचे कामकाज सुरू दिसत असले तरी सक्षम अधिकारी नसल्याने ‘आव-जाव घर तुम्हारा है’ अशी गत आहे. यात मात्र ग्रामस्थांची हेळसांड होत आहे.तालुका कृषी कार्यालययेथील विरावली रस्त्यावरील शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुका कृषी कार्यालयाचे कामकाज तर ‘रामभरोसे’च सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त आहे . दुय्यम अधिकारी म्हणून असलेल्या तीनही मंडळ अधिकारी पदांसह अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.कार्यालयातील सूत्रांनुसार, मंजूर विविध पदांपैकी ८० टक्के पदे रिक्त आहेत. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील या कार्यालयात शेतकरी केव्हाही गेल्यास कार्यालयातील मोजके कर्मचारी सोडल्यास सर्व टेबल्स रिक्तच दिसतात. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.पोलीस ठाणेगेल्या दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी यांची मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. दुय्यम अधिकारी सुजीत ठाकरे यांचीही गेल्या १५ दिवसांपासून बदली झालेली आहे. मात्र ‘प्रभारी अधिकारी’ नसल्याने ते थांबून आहेत. शहरासह हद्दीत अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले. स्थानिक पोलीस सर्व आॅलवेल सांगत असले तरी स्थानिक गुन्हे अन्वेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून मधून-मधून विविध ठिकाणी छापे, अवैध व्यावसायिकांवर मारले जातात. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार चालत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे.ग्रामीण रुग्णालययेथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे प्रथमोपचार केंद्र आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालस अधीक्षक लाभलेले नाहीत, तर वैद्यकीय अधिकाºयांची सर्वच पदे रिक्त आहेत. फिरत्या आरोग्य पथकाच्या डॉॅक्टरांकडून दररोज बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. वेळेनंतर रुग्णांवर येथे केवळ प्रथमोपचार करून त्यांना जळगावला पाठवण्यात येते. ग्रामीण रुग्णालयाला अनेक वर्षांपासून स्थायी अधिकारी मिळू नये, यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते असू शकते, असा प्रश्न यावल तालुकावासीयांमधून उपस्थित करण्यात येत आहे.नगरपालिकायेथील नगरपालिकेचीही तीच गत आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून येथे मुख्याधिकारी नाही. रावेर पालिकेचे मुख्याधिकारी आर.एस.लांडे यांच्याकडे यावल पालिकेचा अतिरिक्त पदभार आहे. पालिकेला नियमित मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. नागरिकांची दैनंदिन कामे त्यामुळे खोळंबून पडत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.शहरासह सर्व तालुकास्तरीय कार्यालयाचीच ही गत झाली आहे. सर्व कार्यालयांचे बाहेरील अधिकारीच ‘प्रभारी’ आहेत. बाहेरील तालुक्यास अधिकारी भेटतात. मग आपल्याच तालुक्यास का नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत यास तालुकावासीयांची सहनशिलता की लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे, असा कोडे न उलगडणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारYawalयावल