शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

अधिकृत वीज कनेक्शन घेण्यास घरकुलातील लाभार्थीच अनुत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:46 IST

जामनेरात प्राथमिक सुविधा नसताना पालिकेने घरकुले वाटप केल्याचा आरोप

जामनेर, दि.जळगाव : पालिकेने बांधलेल्या घरकुलातील लाभार्र्थींचे वीज कनेक्शन अनधिकृत असले तरी दोन दिवसात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्याच्या अटीवर सोमवारी रात्री काही भागाचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र मंगळवारी फक्त ४३ लाभार्र्थींनी नवीन मीटर मागणीचे अर्ज सादर केल्याची माहिती मिळाली.स्थानिक नगरसेवक प्रत्येक लाभार्थीस भेटून त्यांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देत होते. एकलव्य नगर भागातील ४० व जवळच्या दुसऱ्या घरकुलातील फक्त तीन लाभार्र्थींनी नवीन कनेक्शनसाठी अर्ज सादर केले.अनधिकृतपणे घेतलेल्या विजेच्या जीर्ण वायरमधून झालेल्या वीजपुरवठ्याचा धक्का बसल्याने सोमवारी दोन गुरे दगावली होती. या घटनेनंतर वीज वितरण कंपनी व पालिका प्रशासन सतर्क झाले.दरम्यान, या घटनेबाबत काँग्रेसचे कार्यकर्ते अशपाक पटेल यांनी सांगितले की, घरकुलातील लाभार्थ्यांना नियमित व अधिकृत वीजपुरवठा करण्याबाबत शहर विभागातील कनिष्ठ अभियंत्याशी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पालिकेने घरकुलांचे वाटप करण्यापूर्वी त्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांची पूर्तता करणे गरजेचे होते. तसे न करता घाईघाईने लाभार्र्थींना घरकुलांचे वाटप केले. आजही येथे बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. घरकुलातील लाभार्र्थींना अधिकृत वीज कनेक्शन मिळण्यासाठी पालिकेने कार्यवाही करणे गरजेचे आहे.पालिकेने आयएचएसडीपी योजनेंतर्गत घोडेपीरनगर व एकलव्यनगर भागातील घरकुलातील लाभार्र्थींनी मागणी केल्यास त्यांना या जागेत त्यांच्या नावावर स्वखर्चाने वीजपुरवठा देण्यास पालिकेची हरकत नाही, मात्र प्रत्येक अर्जासोबत पालिकेने त्यांना दिलेल्या ताबापावतीची झेरॉक्सप्रत घेण्यात यावी, असे पत्र वीज वितरण कंपनीस दिल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली.जामनेर शहरातील घरकुलांमध्ये राहणाºया लाभार्र्थींनी अधिकृत विजेचे कनेक्शन मागणीचे अर्ज सादर करणे अपेक्षित होते, मात्र आज फक्त ४३ अर्जच आले. नागरिकांनी तातडीने वीज जोडणी करून घ्यावी.-सतीश राजपूत, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण कंपनी, जामनेरजामनेर पालिकेने बांधलेल्या घरकुलात कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. केवळ ठेकेदाराला वाचविण्यासाठी प्रशासनाने घाईगर्दीत गोरगरीब लाभार्र्थींना वाटप केले. याचा त्यावेळेस पालिकेच्या सभेत विरोध केला होता. घोडेपीरनगरजवळ बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले पाहिजे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ज्या ठिकाणी विजेच्या धक्क्याने गुरे दगावली, तो मुंबई-नागपूर राज्यमार्ग असून, या रस्त्याने दिवसभर वाहतुक सुरू असते. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाने घटना घडली. सुदैवाने अनर्थ टळला, प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. -जावेद ईक्बाल रशीद, माजी उपनगराध्यक्ष, जामनेर