शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मागील वर्षीची चूक सुधारून प्रशिक्षणाला दर्जेदार माणसे पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:44 IST

राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ

ठळक मुद्दे पानी फाऊंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठी कार्यशाळा चित्रफितीने भारावले उपस्थित मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठा

जळगाव: दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी मागील वर्षी केले त्यापेक्षा अधिक प्रयत्न करून, अधिक जोमाने काम करा. जिल्ह्यात मागील वर्षी जी चूक झाली ती सुधारून यंदा अधिक दर्जेदार व या कामाची मनापासून आवड असलेल्यांनाच प्रशिक्षणासाठी पाठवा, असे आवाहन आमिरखानच्या पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ यांनी केले. या स्पर्धेंतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा गुरूवार, १३ डिसेंबर रोजी जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिरात दुपारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारी संभाजी ठाकूर, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास गायकवाड, नाशिक जिल्हा समन्वयक सुकदेव भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले.चित्रफितीने भारावले उपस्थितयावेळी दुष्काळाशी दोन हात ही १७ मिनिटांची चित्रफित दाखविण्यात आली. त्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी कशा पद्धतीने आपसातील वाद, मतभेद मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना कसे यश मिळाले, हे दाखविण्यात आले. ते पाहून या कार्यशाळेला उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ भारावले.मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठापानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक गायकवाड यांनी मागील वर्षी अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यांचा समावेश या योजनेत होता. त्याचा आढावा सादर केला. या दोन्ही तालुक्यात मिळून सुमारे १०४ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला. त्यातून सुमारे २ लाख टँकर भरले जाऊ शकतील. तसेच त्याची बाजारभावानुसार किंमत १० कोटी रूपये असेल असे सांगितले.सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा बदलाडॉ.पोळ म्हणाले की, शिकून, ज्ञान घेऊन सरकारी खुर्चीत बसलेल्या अधिकाºयांकडे आपण जात नाही. कारण आपला सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे. मात्र आपण चांगल्या हेतूने गेलो तर यंत्रणा निश्चित मदत करते, हा माझा अनुभव आहे. माझी कोणतीही संस्था नाही. संत गाडगेबाबांचीही संस्था नव्हती. तरीही ते मंत्रालयात गेले तर मुख्यमंत्री उतरून खाली येत असत. ही त्यांच्या नैतिकतेची ताकद होती. दुर्देवाने ही ताकद निर्माण करण्यात आपण कमी पडतो. सरकारी यंत्रणेत खूप ताकद आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारी यंत्रणेतील अधिकारी मित्रमंडळींच्या मदतीमुळेच बिबळेवाडी या सातारा जिल्'ातील गावात अनेक अडथळे पार करून महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, तसेच बायोगॅस युनिट उभारण्यात कसे यश मिळविले, याचा किस्सा उपस्थितांना ऐकविला.स्पर्धेचे निकषही सुधारीतडॉ.पोळ म्हणाले की, स्पर्धेचे निकषही यंदा सुधारीत केले आहेत. तसेच गेल्या वर्षी ७५ तालुक्यांचा समावेश होता. यंदा ७६ तालुक्यांचा समावेश केला आहे. केवळ जळगावसाठी हा बदल करून चाळीसगाव व जामनेर तालुक्यांचा समावेश केला  असल्याचे सांगितले.