शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीची चूक सुधारून प्रशिक्षणाला दर्जेदार माणसे पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:44 IST

राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ

ठळक मुद्दे पानी फाऊंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठी कार्यशाळा चित्रफितीने भारावले उपस्थित मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठा

जळगाव: दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी मागील वर्षी केले त्यापेक्षा अधिक प्रयत्न करून, अधिक जोमाने काम करा. जिल्ह्यात मागील वर्षी जी चूक झाली ती सुधारून यंदा अधिक दर्जेदार व या कामाची मनापासून आवड असलेल्यांनाच प्रशिक्षणासाठी पाठवा, असे आवाहन आमिरखानच्या पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ यांनी केले. या स्पर्धेंतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा गुरूवार, १३ डिसेंबर रोजी जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिरात दुपारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारी संभाजी ठाकूर, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास गायकवाड, नाशिक जिल्हा समन्वयक सुकदेव भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले.चित्रफितीने भारावले उपस्थितयावेळी दुष्काळाशी दोन हात ही १७ मिनिटांची चित्रफित दाखविण्यात आली. त्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी कशा पद्धतीने आपसातील वाद, मतभेद मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना कसे यश मिळाले, हे दाखविण्यात आले. ते पाहून या कार्यशाळेला उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ भारावले.मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठापानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक गायकवाड यांनी मागील वर्षी अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यांचा समावेश या योजनेत होता. त्याचा आढावा सादर केला. या दोन्ही तालुक्यात मिळून सुमारे १०४ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला. त्यातून सुमारे २ लाख टँकर भरले जाऊ शकतील. तसेच त्याची बाजारभावानुसार किंमत १० कोटी रूपये असेल असे सांगितले.सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा बदलाडॉ.पोळ म्हणाले की, शिकून, ज्ञान घेऊन सरकारी खुर्चीत बसलेल्या अधिकाºयांकडे आपण जात नाही. कारण आपला सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे. मात्र आपण चांगल्या हेतूने गेलो तर यंत्रणा निश्चित मदत करते, हा माझा अनुभव आहे. माझी कोणतीही संस्था नाही. संत गाडगेबाबांचीही संस्था नव्हती. तरीही ते मंत्रालयात गेले तर मुख्यमंत्री उतरून खाली येत असत. ही त्यांच्या नैतिकतेची ताकद होती. दुर्देवाने ही ताकद निर्माण करण्यात आपण कमी पडतो. सरकारी यंत्रणेत खूप ताकद आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारी यंत्रणेतील अधिकारी मित्रमंडळींच्या मदतीमुळेच बिबळेवाडी या सातारा जिल्'ातील गावात अनेक अडथळे पार करून महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, तसेच बायोगॅस युनिट उभारण्यात कसे यश मिळविले, याचा किस्सा उपस्थितांना ऐकविला.स्पर्धेचे निकषही सुधारीतडॉ.पोळ म्हणाले की, स्पर्धेचे निकषही यंदा सुधारीत केले आहेत. तसेच गेल्या वर्षी ७५ तालुक्यांचा समावेश होता. यंदा ७६ तालुक्यांचा समावेश केला आहे. केवळ जळगावसाठी हा बदल करून चाळीसगाव व जामनेर तालुक्यांचा समावेश केला  असल्याचे सांगितले.