शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

चाळीसगावात सुधारित जलवाहिनी योजनेला अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:07 IST

सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) बहुचर्चित शहरांतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसह नव्याने उभारण्यात येणाºया १५ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभ योजनेस पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. यामुळे लवकरच शहराच्या विविध भागात नविन जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देचाळीसगाव पालिकेच्या स्थायी समितीच्या विविध विषयांवर चर्चा६२ कोटीची योजना, १५ लाख लीटर क्षमतेचा जलकुंभही उभारणार

चाळीसगाव, जि.जळगाव : सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) बहुचर्चित शहरांतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसह नव्याने उभारण्यात येणाºया १५ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभ योजनेस पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. यामुळे लवकरच शहराच्या विविध भागात नविन जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण यांच्यासह शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गट नेते राजेंद्र चौधरी, आरोग्य सभापती रंजना सोनवणे, पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील, बांधकाम सभापती चंद्रकांत तायडे, शिक्षण सभापती सूर्यकांत ठाकूर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी सभेला उपस्थित होते.चाळीसगाव शहरासाठी असणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) यापूर्वीच मंजूर करण्यात आला असून, यातील काही योजनांना विरोध दर्शविण्यात आला होता. बुधवारी सकाळी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सुधारीत पाणीपुरवठा योजनेसह प्रदीपदादा नगर, महाराणाप्रताप नगरातील गटार व मटन मार्केट परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार असून ही सुधारीत पाणीपुरवठा योजना विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळे वादाच्या भोव-यात सापडली होती. विरोधकांनी योजनेतील काही त्रुटी व उणिवांवर बोट ठेवले होते. २०५३ पर्यंतच्या लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेऊन योजनेचा आराखडा असून आमदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने योजनेसाठी ६२ कोटी २० लाख रुपये मंजुरही केले आहे. यात शहरातील अंतर्गत जलवाहिन्या नव्याने टाकण्यासह अजून एक १५ लाख लटर क्षमतेचा जलकुंभही उभारला जाणार आहे. स्थायी समितीच्या सभेत योजनेला हिरवी झेंडी दाखविण्यात आल्याने योजनेतील अडथळा दूर झाला आहे.सुधारित पाणीपुरवठा योजनेत विरोधकांनी दाखविलेल्या त्रुटी दूर केल्या. शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही योजना स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली. योजनेमुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची बचतही होणार आहे.- आशालता चव्हाण, नगराध्यक्षा, चाळीसगाव 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव