शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’ची अंमलबजावणी म्हणजे हिटलरशाही, जळगावात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:21 IST

हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन विविध संघटना, पक्षांकडून धरणे आंदोलन

जळगाव : भारतात या पूर्वीही विविध जाती-धर्माच्या राजे-महाराजांनी राज्य केले, मात्र दोन समाजात त्यातून कधी तेढ निर्माण झाला नाही. मात्र सध्या केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करून धर्मा-धर्मांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या कायद्याची सक्ती करणे म्हणजे हिटलरशाहीच आहे, असा सूर जळगाव येथे विविध राजयकीय पक्ष, संस्था संघटनांच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान उमटला. या धरणे आंदोलनासाठी प्रचंड गर्दी उसळली होती.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी अडीच ते संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत जळगाव मुस्लीम मंचच्या माध्यमातून शहरातील विविध राजकीय पक्ष, विविध पंथ, विविध सहकारी व सामाजिक संघटना तसेच क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी एकत्रित येऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याचा निषेध करण्यात आला.या वेळी दारुल कजा काझी मुफ्ती अतिर्कूर रहेमान, हाफिस खालीद, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, मुस्लीम मंचचे समन्वयक फारुख शेख, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जिया बागवान, सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे मुकुंद सपकाळे, डॉ.जावेद खान, सुन्नी मशिदचे शरीफ शाह, सुन्नी जामा मशिदचे अयाज अली, जमात इस्लामीचे आमिर सोहेल, इस्लामी युथ फाउंडेशनचे मौलाना हाफिस फरहान आदी उपस्थित होते.सुरुवात मुफ्ती अतीर्कूर रहेमान यांच्या कुराण पठणाने झाली. हाफिस खालीद यांनी नाथ सादर केली तर हफीज अली यांनी नजम (कविता) सादर केली. प्रास्ताविक फारुक शेख यांनी केले. त्यात त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा व त्यामुळे होणारे दुष्परिणाम या विषयी माहिती दिली.डॉ.जावेद यांनी आपल्या भाषणात या पूर्वी राज्य केलेल्या राजे-महाराजांच्या काळातील आठवण करून देत सांगितले की, त्या राजा-महाराजांनी अशा प्रकारचे भेदभाव केले नाही. शरीफ शाह यांनी भाषणात निषेध करून हा कायदा म्हणजे हिटलरचा कायदा आहे, असे नमूद केले. आमिर सोहेल यांनी हा कायदा कशा प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण करणारा ठरू शकतो, या विषयी माहिती दिली. प्रतिभा शिंदे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. आयाज अली, मुकुंद सपकाळे, मौलाना हाफिस फरहान, करीम सालार, गफ्फार मलिक, वासंती दिघे, मुफ्ती हारुन, जिया बागवान यांनी मनोगत व्यक्त केले.अन्यथा हिंसक वळणहा कायदा लागू करण्यात येऊ नये अन्यथा शांतता मार्गाने चालणाऱ्या या आंदोलनास हिंसक वळण मिळेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. या सर्व प्रकारास पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार ठरतील, असा सूरदेखील या वेळी उमटला.अनेकांच्या डोळ््यात तरळले अश्रूसमारोप वेळी विविध ठराव पारित करण्यात आले. त्या ठरावाचे वाचन करण्यात आले. आंदोलनास कोठेही गालबोट लागू नये तसेच सर्वत्र शांतता नांदावी यासाटी दुआ (प्रार्थना) करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी उपस्थितांच्या डोळ््यात अश्रू तरळले होते.शिस्तबद्धतेचे दर्शनया धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येन नागरिक सहभागी झाले होते. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर मोठी गर्दी उसळली होती. हजारोंची संख्या असली तरी सर्वांनी अत्यंत शांततामय वातावरणात व शिस्तबद्धरित्या धरणे आंदोलन केले. कोणाला त्रास होणार नाही व गालबोट लागणार नाही, यासाठी वक्त्यांनीदेखील तसे आवाहन केले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचे लक्षात घेता पोलीस बंदोबस्त, विविध पथके, अग्नीशमन दल पाचारण करण्यात आले होते. आंदोलनात उपस्थितांची संख्या एवढी होती की, स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी चौक हा रस्ता बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आला होता.अनिस शहा, समीर शेख, सानेर सैयद, रऊफ खान, उमर काफील, बशीर बुºहानी, जमील शेख, फिरोज मुलतानी यांच्यासह हजारो जणांनी परिश्रम घेतले

टॅग्स :Jalgaonजळगाव