शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

तापीवरील उपसा योजना कार्यान्वित करणार

By admin | Updated: October 24, 2015 00:21 IST

तापीवरील 22 उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन तसेच 1972 च्या दुष्काळ परिस्थितीत पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत तयार करण्यात आलेल्या जुन्या जलस्त्रोतांचे व कामांचे तत्काळ रिसोर्स मॅपिंग करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. दरम्यान, तापीवरील 22 उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानाच्या लोकप्रतिनिधी व जिल्हास्तरीय अधिका:यांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भरत गावीत, खासदार डॉ.हीना गावीत, माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, उदेसिंग पाडवी, जयकुमार रावल, शिरीष चौधरी, मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये, निवासी उपजिल्हाधिकारी नीलेश सागर व जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जुन्या विविध योजनांमधून साकारण्यात आलेल्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करून एका वर्षात कमी पैशात जास्त जलसाठा करता येऊ शकतो. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत येणा:या काळात कंपार्टमेंट बंडिंग, ड्रेनेज सिस्टिमवर भर देण्यात येणार असून, त्यासाठी तीन वर्षाची कालमर्यादा निश्चित करून नियोजन करण्यात यावे. वैयक्तिक शेततळ्यांची कामे घेणे शक्य नसल्यास सामूहिक शेततळी उभारण्यावर भर देण्यात यावा. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून, या जिल्ह्यातील शेतीपंपांच्या विद्युतीकरणाची कामे प्राधान्याने कालमर्यादा निश्चित करून पूर्णत्वास न्याव्यात. ज्याठिकाणी विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत, अशा ठिकाणी तत्काळ विद्युत जोडणी झाली पाहिजे. जेणेकरून त्याठिकाणी विद्युत पंप कार्यान्वित होऊन शेतक:यांची जमीन जास्तीत जास्त बागायती क्षेत्राखाली आणता येईल.

सरदार सरोवर प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वाटय़ाला येणारी ऊर्जा आणि पाण्याचा हिस्सा प्राप्त करून घेण्यासाठी व पुनर्वसनासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम तत्काळ पूर्ण करण्यात येईल. हे भूसंपादन पूर्ण झाल्यास सरदार सरोवर प्रकल्पाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील मोठय़ा प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल. तसेच या भागातील ऊज्रेच्या प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल.

तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजना पुनरुज्जीवीत करण्यासाठी शासन प्रय}शील असून, त्यातील पाईप लाईनच्या तपासणीचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तापी योजनेतील उपसा सिंचन योजनांच्या थकबाकीची 50 टक्के रक्कम माफ करून व उर्वरित 50 टक्के रक्कम 10 हप्त्यात भरण्याची सवलत देण्याबाबत विचार केला जाईल. असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नंदुरबार हा दुर्गम जिल्हा असून, यातील बहुतांश क्षेत्र हे डोंगरी आहे. टंचाईच्या परिस्थितीत डोंगरी भागातील नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करावा लागतो. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर विहिरींची व हातपंपाची कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती या वेळी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

बैठकीचे सूत्रसंचालन व आभार निवासी उपजिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले. बैठकीला मोजक्याच विभागप्रमुखांना पाचारण करण्यात आले होते.