शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

व्यापाऱ्यांचा विचार करून निर्णयांची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या निर्णयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या निर्णयांची अंमलबजावणी करताना व्यापारी बांधवांचा विचार करावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. व्यापारी महामंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निवेदन पाठवले आहे.

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया, युसूफ मकरा, अनिल कांकरिया, सचिन चोरडिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे, की, व्यापारी बांधवांनी लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक जण त्यात आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत. कोणतेही उत्पन्न नसताना कर्मचाऱ्यांचा पगार, बँकांचे हफ्ते, भाडे, लाईट बिल यांचे व्यवस्थापन करावे लागत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १ जूनपासून निर्बंध शिथिल होत असल्याने आता तरी नवीन नियमांची अंमलबजावणी करताना व्यापारी वर्गाचा विचार करावा, तसेच आर्थिक स्थिती पूर्ववत होण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.