शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

व्यापाऱ्यांचा विचार करून निर्णयांची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या निर्णयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या निर्णयांची अंमलबजावणी करताना व्यापारी बांधवांचा विचार करावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. व्यापारी महामंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निवेदन पाठवले आहे.

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया, युसूफ मकरा, अनिल कांकरिया, सचिन चोरडिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे, की, व्यापारी बांधवांनी लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक जण त्यात आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत. कोणतेही उत्पन्न नसताना कर्मचाऱ्यांचा पगार, बँकांचे हफ्ते, भाडे, लाईट बिल यांचे व्यवस्थापन करावे लागत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १ जूनपासून निर्बंध शिथिल होत असल्याने आता तरी नवीन नियमांची अंमलबजावणी करताना व्यापारी वर्गाचा विचार करावा, तसेच आर्थिक स्थिती पूर्ववत होण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.