शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

गणित विषय पर्यायी केल्यास अभियंत्यांच्या गुणवत्तेवर परिणाम : बाटूचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.गायकर

By admin | Updated: June 20, 2017 17:07 IST

शिक्षकांनी वर्ग अध्यापनातून बाहेर पडून प्रशिक्षित अभियंते घडवावेत

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.20- अभियांत्रिकीचे शिक्षण किंवा तंत्रज्ञानाचे अध्ययन व अध्यापन आणि गणित यांचा परस्परांशी महत्त्वाचा संबंध आहे. गणिताशिवाय अभियंता घडणारच नाही. त्यामुळे प्राथमिक किंवा त्यापुढील शिक्षणात गणित विषय पर्याय म्हणून घेऊ नये. गणित विषय अभ्यासक्रमात राहीलाच पाहीजे. अन्यथा पात्रताधारक विद्यार्थी घडणार नाही, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ.व्ही.एम.गायकर यांनी मंगळवारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित बाटूच्या उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले. 
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी बाटूचे कुलसचिव डॉ.एस.एस.भामरे, बाटूचे प्रा.डॉ.प्रदीप कट्टी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ.आर.डी.कोकाटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.जी.अराजपुरे, उपप्राचार्य प्रवीण फालक, जे.टी.महाजन अभियांत्रिकीचे उपाध्यक्ष विजय झोपे, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. 
सीव्हील अभियांत्रिकी शिकतात, पण पूल बांधता येत नाही
अभियंते पदवीपुरते घडविले जातात. शिक्षकही अभ्यासक्रम पूर्ण करायच्या मागे असतात. पण जी माहिती विद्याथ्र्याना पुढे उपयुक्त असते, त्या माहितीचा उपयोग ते नोकरीसाठी करू शकतील, उद्योगासाठी करू शकतील ती माहितीदेखील वर्गात मिळायला हवी. अप्रशिक्षित शिक्षक शिकवितात, असेही निदर्शनास येते. विद्यार्थीदेखील चार वर्षे वर्गात अभ्यास केला, वाचन केले, पदवी घेतली म्हणजे अभियंते झाले असे समजतात. पण फक्त पदवीच्या  शिक्क्यापुरते अभियंते नसावेत. त्यांना प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष उद्योगात कसे काम करतात हे समजले पाहीजे. जे ऑटोमोबाईल शाखेचा अभ्यास करतात त्यांना भंगार चारचाकीचे सुटे भाग मोकळे करणे, त्याचा अभ्यास असला पाहीजे. अनेकदा स्थापत्य अभियांत्रिकीची (सीव्हील) पदवी घेतात, पण पूल बांधण्यासाठी नियुक्ती झाली तर ते काम येत नाही, असे व्हायला नको. बाटू प्रशिक्षित, उद्योगांना अपेक्षित असे अभियंते तयार करणारा अभ्यासक्रम देणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज असेल, असेही डॉ.गायकर म्हणाले. 
आयआयटी, एनआयटीच्या समकक्ष काम व्हावे
जगात तंत्रज्ञान, उद्योगांमध्ये जे बदल घडतात, जे नावीन्य असते त्यासंबंधीची माहिती, अभ्यासक्रम प्रथम आयआयटी, एनआयटीत येतो. नंतर इतर संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम येतात. पण जगात जे बदल घडतात, जे नवे अभ्यासक्रम येतात ते एकाच वेळी सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, संस्था, राज्य शासनाच्या विद्यापीठांमध्ये यावेत. आयआयटीच्या समकक्ष बाटूचे काम न्यायचे आहे, असेही कुलगुरूडॉ.गायकर म्हणाले.