शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

अवकाळी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 17:11 IST

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पिकांची पाहणी

चाळीसगाव : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे काढणाºया अवकाळी पावसाने गेल्या दहा दिवसांपासून चाळीसगाव परिसरात तंबूच ठोकला आहे. पावसाची संततधार असल्याने खरीप हंगाम मातीमोल झाला असून नवनिर्वाचित आमदार मंगेश चव्हाण यांनी सोमवारी खडकी बुद्रुक भागातील बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. नुकसानीचे सरसकट व तत्काळ पंचनामे करा. जलद गतीने मदत देखील पोहचवा, अशा सूचनाही त्यांनी महसूल विभागाला दिल्या आहेत. ‘लोकमत’ने देखील बळीराजाची व्यथा ठळकपणे मांडून पंचनामे होत नसल्याची कैफियत थेटपणे मांडली होती.गेल्या दहा दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने अस्मानी संकट उभे राहीले आहे.ज्वारी, बाजरी, मका अश्या पिकांना कोंब फुटले असून मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. शेतात पाणी साचल्याने कपाशीचे पीकही सडत आहे.ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे संकट बळीराजापुढे उभे ठाकले आहे. झालेला खर्च सुद्धा निघणार नाही. नुकसानीची तीव्रता अशी भयावह असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांना या संकटातून सावरण्यासाठी कोणताही कसूर ठेवणार नसल्याचे सांगत मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गिरीष महाजन व जिल्हाधिकारी यांना माहिती दिल्याचे यावेळी सांगितले. पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना तत्काळ विमा क्लेम अदा करावा. याबाबत जिल्हाधिकाºयांना विनंती केली.त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच होणाºया अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकºयांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.