शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

त्रास झाल्यास तत्काळ उपचार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST

जळगाव : कोरोना लसीकरणानंतर लाभार्थ्यास कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र, कोरोना नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. ...

जळगाव : कोरोना लसीकरणानंतर लाभार्थ्यास कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र, कोरोना नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. लाभार्थ्यांस जर काही त्रास झाला तर त्याठिकाणी उपचाराची आवश्यक साधनसामुग्रीची किटही उपलब्ध राहणार असून यासाठी शासकीय यंत्रणेसह खासगी डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यासाठी आयएमएनेदेखील पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लसीकरणाविषयी कोणी चुकीची माहिती पसरवत असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार असून या दरम्यान सोशल मीडियावरही नजर राहणार आहे.

यांना लसीकरणातून वगळले

तीन टप्प्यांत होणाऱ्या लसीकरणात प्रत्येक टप्प्यांत गर्भवती महिला, स्तनदा माता, रक्तपात अधिक होणाऱ्या व्यक्ती.

असे आहे तीन टप्पे

१) आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी

२) कोरोना उपाययोजनांमध्ये पहिल्या फळीत काम करणारे विभाग.

३) सामान्य नागरिक

जिल्ह्यासाठी ४० ते ४२ लाख जणांना दोन डोस

सध्या जिल्ह्यासाठी २४ हजार ३२० लसीचे डोस मिळाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी असणाऱ्या व्यक्तींची संख्या व तिसऱ्या टप्प्यात सामान्यांची संख्या यानुसार लस उपलब्ध होतील. त्यामध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता, रक्तपात अधिक होणाऱ्या व्यक्ती यांची संख्यावगळता जिल्ह्यासाठी ४० ते ४२ लाख लसीचे डोस लागणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

दर आठवड्याला चार सत्र

दर आठवड्याला चार सत्र राबविण्यात येणार असून एका सत्रात १०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.

ॲपमध्ये यादी उपलब्ध

एका केंद्रावर एका सत्रात १०० जणांना लस द्यावयाची असून यासाठी आरोग्य विभागातील १९ ९५१ जणांची यादी असून कोविन ॲपद्वारे त्यातील १०० जणांची नावे दररोज ठरली जाणार आहे. त्यानुसार त्या १०० जणांना संदेश जाणार आहे.

दीड वर्षांनंतर ‘सक्सेस रेट’ कळणार

लसीकरणासाठी संमतीपत्र घेतले जाणार असून लसीकरणानंतर संबंधितांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. लस घेतल्यानंतर ती किती यशस्वी ठरली हे दीड वर्षांनंतर स्पष्ट होणार आहे.

चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने कोणीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरवू नये. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांनीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणी चुकीची माहिती पसरवत असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.