शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

त्रास झाल्यास तत्काळ उपचार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST

जळगाव : कोरोना लसीकरणानंतर लाभार्थ्यास कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र, कोरोना नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. ...

जळगाव : कोरोना लसीकरणानंतर लाभार्थ्यास कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र, कोरोना नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. लाभार्थ्यांस जर काही त्रास झाला तर त्याठिकाणी उपचाराची आवश्यक साधनसामुग्रीची किटही उपलब्ध राहणार असून यासाठी शासकीय यंत्रणेसह खासगी डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यासाठी आयएमएनेदेखील पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लसीकरणाविषयी कोणी चुकीची माहिती पसरवत असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार असून या दरम्यान सोशल मीडियावरही नजर राहणार आहे.

यांना लसीकरणातून वगळले

तीन टप्प्यांत होणाऱ्या लसीकरणात प्रत्येक टप्प्यांत गर्भवती महिला, स्तनदा माता, रक्तपात अधिक होणाऱ्या व्यक्ती.

असे आहे तीन टप्पे

१) आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी

२) कोरोना उपाययोजनांमध्ये पहिल्या फळीत काम करणारे विभाग.

३) सामान्य नागरिक

जिल्ह्यासाठी ४० ते ४२ लाख जणांना दोन डोस

सध्या जिल्ह्यासाठी २४ हजार ३२० लसीचे डोस मिळाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी असणाऱ्या व्यक्तींची संख्या व तिसऱ्या टप्प्यात सामान्यांची संख्या यानुसार लस उपलब्ध होतील. त्यामध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता, रक्तपात अधिक होणाऱ्या व्यक्ती यांची संख्यावगळता जिल्ह्यासाठी ४० ते ४२ लाख लसीचे डोस लागणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

दर आठवड्याला चार सत्र

दर आठवड्याला चार सत्र राबविण्यात येणार असून एका सत्रात १०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.

ॲपमध्ये यादी उपलब्ध

एका केंद्रावर एका सत्रात १०० जणांना लस द्यावयाची असून यासाठी आरोग्य विभागातील १९ ९५१ जणांची यादी असून कोविन ॲपद्वारे त्यातील १०० जणांची नावे दररोज ठरली जाणार आहे. त्यानुसार त्या १०० जणांना संदेश जाणार आहे.

दीड वर्षांनंतर ‘सक्सेस रेट’ कळणार

लसीकरणासाठी संमतीपत्र घेतले जाणार असून लसीकरणानंतर संबंधितांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. लस घेतल्यानंतर ती किती यशस्वी ठरली हे दीड वर्षांनंतर स्पष्ट होणार आहे.

चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने कोणीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरवू नये. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांनीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणी चुकीची माहिती पसरवत असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.