शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

त्रास झाल्यास तत्काळ उपचार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST

जळगाव : कोरोना लसीकरणानंतर लाभार्थ्यास कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र, कोरोना नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. ...

जळगाव : कोरोना लसीकरणानंतर लाभार्थ्यास कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र, कोरोना नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. लाभार्थ्यांस जर काही त्रास झाला तर त्याठिकाणी उपचाराची आवश्यक साधनसामुग्रीची किटही उपलब्ध राहणार असून यासाठी शासकीय यंत्रणेसह खासगी डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यासाठी आयएमएनेदेखील पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लसीकरणाविषयी कोणी चुकीची माहिती पसरवत असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार असून या दरम्यान सोशल मीडियावरही नजर राहणार आहे.

यांना लसीकरणातून वगळले

तीन टप्प्यांत होणाऱ्या लसीकरणात प्रत्येक टप्प्यांत गर्भवती महिला, स्तनदा माता, रक्तपात अधिक होणाऱ्या व्यक्ती.

असे आहे तीन टप्पे

१) आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी

२) कोरोना उपाययोजनांमध्ये पहिल्या फळीत काम करणारे विभाग.

३) सामान्य नागरिक

जिल्ह्यासाठी ४० ते ४२ लाख जणांना दोन डोस

सध्या जिल्ह्यासाठी २४ हजार ३२० लसीचे डोस मिळाले असून दुसऱ्या टप्प्यासाठी असणाऱ्या व्यक्तींची संख्या व तिसऱ्या टप्प्यात सामान्यांची संख्या यानुसार लस उपलब्ध होतील. त्यामध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता, रक्तपात अधिक होणाऱ्या व्यक्ती यांची संख्यावगळता जिल्ह्यासाठी ४० ते ४२ लाख लसीचे डोस लागणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

दर आठवड्याला चार सत्र

दर आठवड्याला चार सत्र राबविण्यात येणार असून एका सत्रात १०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.

ॲपमध्ये यादी उपलब्ध

एका केंद्रावर एका सत्रात १०० जणांना लस द्यावयाची असून यासाठी आरोग्य विभागातील १९ ९५१ जणांची यादी असून कोविन ॲपद्वारे त्यातील १०० जणांची नावे दररोज ठरली जाणार आहे. त्यानुसार त्या १०० जणांना संदेश जाणार आहे.

दीड वर्षांनंतर ‘सक्सेस रेट’ कळणार

लसीकरणासाठी संमतीपत्र घेतले जाणार असून लसीकरणानंतर संबंधितांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. लस घेतल्यानंतर ती किती यशस्वी ठरली हे दीड वर्षांनंतर स्पष्ट होणार आहे.

चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने कोणीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरवू नये. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांनीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणी चुकीची माहिती पसरवत असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.