शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

थरा-थराने मुरूम न भरल्याने रस्त्यांचा असमतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सध्या पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटारांच्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र, त्यात बऱ्याच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात सध्या पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटारांच्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र, त्यात बऱ्याच तांत्रिक चुका राहतात. पाइप जमिनीत टाकण्यासाठी चारी खोदल्यानंतर पुन्हा बुजताना थरा-थराने मुरूम न भरल्याने शहरातील रस्ते असमतोल झाले आहेत. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकीचे अपघातदेखील वाढले असल्याचे निवृत्त स्थापत्य अभियंता विनायक काळे यांनी सांगितले.

काळे यांनी देशातील विविध राज्यांत पाणीपुरवठा योजनांसाठी अभियंता म्हणून काम केले आहे. निवृत्तीच्या वेळी ते नागपूर मेट्रो प्रकल्पात स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत होते. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न - शहरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे खड्डे होतात आणि अपघातांचे प्रमाणदेखील वाढते, हे कसे टाळता येऊ शकते.

काळे - सध्या पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटारांच्या योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यात चारी खोदली जाते. पाइप जमिनीत टाकला जातो. मात्र, हे करताना जमिनीत काढलेला मुरूम हा टप्प्याटप्प्याने थरावर थर रचत पुन्हा आत टाकावा लागतो आणि त्याला नंतर रोलरने आणखी आत दाबावा लागतो. त्याचे सपाटीकरण केले जाते. त्यानंतर संबंधित विभागाचे अभियंता येऊन त्याची पाहणी करतात. सपाटीकरण आणि आतील मुरूम नीट कॉम्पॅक्ट झाला असेल तरच त्यावर डांबरीकरण केले जाते.

प्रश्न : शहरात सुरू असलेल्या कामांमुळे धूळ खूप झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत. हे कसे टाळता येऊ शकते.

काळे - खोदकाम करताना धूळ उडणार हे अपेक्षित असते. त्यामुळे धुळीवर नियंत्रण असावे यासाठी खोदकाम करताना त्या ठिकाणी पाण्याचा शिडकावा मारला जातो. त्यामुळे धुळीवर नियंत्रण असते. दगड गोटे हे रस्त्यावर जाऊन त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यावरही ठेकेदाराने नियंत्रण ठेवले पाहिजे. पाणी मारताना चिखल होऊ नये. त्याऐवजी पाणी शिंपडले पाहिजे. वापरल्या जाणाऱ्या मशिन्स या अद्ययावत असल्या पाहिजेत. त्यातून ध्वनी प्रदूषण किती व्हावे, यावर देखील मर्यादा आहे.

प्रश्न : विकास कामे सुरू असताना त्यात सुरक्षा कशी पाळली गेली पाहिजे.

काळे - सुरक्षेचा मुद्दा हा सर्वांत महत्त्वाचा आहे. ठेकेदाराला त्यात नागरिकांची सुरक्षा, काम करणाऱ्या मजुरांची सुरक्षादेखील बघावी लागते. त्यांना काम सुरू असताना कोणताही इजा होऊ नये, यासाठी सुरक्षा साधनांचा वापर केला पाहिजे. जेथे काम करणार आहे त्याठिकाणी नागरिकांना काम किती होणार आहे. याची माहिती असावी. चारी खोदण्याचे आणि ती बुजवण्याचे काम हे दिवसा केले जावे. जेथे रात्री काम केले जाणार आहे. त्याची संबंधित विभागाकडून पूर्वपरवानगी घेणे अपेक्षित असते.

कोट - ज्या रहिवासी भागात काम केले जाणार आहे. तेथील नागरिकांना त्या कामाची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. त्यासोबतच हे सर्व काम होईपर्यंत धुळीवर नियंत्रणासाठी पाण्याचा शिडकावा मारला पाहिजे. तसेच रस्ते खोदताना आणि नंतर बुजवून डांबरीकरण करताना ते काम नियमानुसारच झाले पाहिजे.

- विनायक काळे, निवृत्त स्थापत्य अभियंता, नागपूर मेट्रो.