शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारच्या काळातील नेत्यांच्या कर्जमाफीचे पुरावे मुंबईत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:03 IST

गिरीश महाजन आरोपांवर ठाम: दिवाळीपूर्वी शेतकºयांना कर्जमाफीचा प्रयत्न

ठळक मुद्देआरोपांचा केला पुनरूच्चारनेत्यांना चुकीच्या पद्धतीने मिळाली कर्जमाफी

लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.६- आघाडी सरकारच्या काळात नेत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना चुकीच्या पद्धतीने कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यात आला असल्याच्या आरोपांचा पुनरूच्चार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवार, दि.६ रोजी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. राष्टÑवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आलेल्या महाजन यांना पत्रकारांनी गाठले. महाजन यांच्या आरोपांवर स्व.आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी पुरावे द्या, अथवा आर.आर.आबांच्या समाधीवर येऊन माफी मागा असे आव्हान दिले आहे. त्याबाबत विचारणा केली असता महाजन यांनी आरोपांचा पुनरूच्चार करीत मुंबईत गेल्यावर पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले. आघाडी सरकारच्या काळात नेत्यांना चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी दिली गेल्याचा आरोप जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेप्रसंगी केला होता. त्यात राष्टÑवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांच्या बंधूंना तब्बल ८० लाख रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे स्व.आर.आर.पाटील यांच्या कन्या व राष्टÑवादी युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील यांनी महाजन यांनी पुरावे सादर करावेत. अन्यथा आर.आर.आबांच्या समाधीवर येऊन माफी मागावी, असे आव्हान दिले आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी महाजन यांना विचारणा केली असता सुरूवातीला त्यांनी बोलणे टाळले. पुरावे आहेत. असे सांगितले. त्यावर मग पुरावे द्या, असे सांगितल्यावर मुंबईत गेल्यावर पुरावे सादर करणार आहोत, असे सांगत त्यांनी आघाडी सरकारच्या काळात नेत्यांना चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी दिली गेल्याच्या आरोपांचा पुनरूच्चार केला. सर्व नेत्यांची नावेच आपण जाहीर करणार आहोत. तसेच विदर्भात कुणी गाई-म्हशीसाठी चुकीच्या पद्धतीने अनुदान लाटले, त्याची माहितीही जाहीर करणार असल्याचे सांगितले. दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा प्रयत्न आघाडी सरकारच्या काळात ज्या पद्धतीने चुकीच्या लोकांनाही लाभ दिला गेला, तो प्रकार टाळण्याची खबरदारी युती सरकार घेत असल्याचे सांगून महाजन म्हणाले की, दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.