शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरुन जळगावला येताय, मग उतरताच होणार अँटीजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:15 IST

जळगाव : राज्य शासनाने १ मे पर्यंत घातलेले निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील आदेश पारीत ...

जळगाव : राज्य शासनाने १ मे पर्यंत घातलेले निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील आदेश पारीत केले आहेत. आता नव्या आदेशानुसार जिल्हाभरात लग्नाचा सोहळा फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत आणि दोन तासात पार पाडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये देखील फक्त १५ टक्के उपस्थिती निश्चित करण्यात आली आहे. तसेच खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरजिल्हा किंवा आंतर शहर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही आता अँटीजेन टेस्ट होणार आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शासकीय कार्यालये हे कोविड नियमांचे पालन करून एकुण कर्मचारी क्षमतेच्या १५ टक्के कर्मचारी क्षमतेसह उपस्थितीत सुरू राहतील. आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या कार्यालयांना यातुन सुट राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने इतर शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती वाढवण्यासंदर्भात विभागप्रमुखांनी निर्णय घ्यावा. तसेच इतर कार्यालयांमध्ये एकुण कर्मचारी क्षमतेच्या १५ टक्के किंवा जास्तीत जास्त पाच कर्मचारी यांची उपस्थिती राहील.

लग्न समारंभासाठी फक्त २५ लोकांची उपस्थिती आणि फक्त दोन तासातच विवाह सोहळा पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कुटुंबास ५० हजाराचा दंड आणि ही जागा कोविडचे निवारण होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील. तसेच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे किंवा बसेसमधून आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील १४ दिवस गृहविलगीकरणात रहावे लागणार आहे. सर्व प्रवासी थांब्यांवर अँटीजेन तपासणी करून त्याचा खर्च संबंधित प्रवाशांकडून वसुल करावा. तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक परिस्थितीनुसार ठराविक ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा किंवा नाही याचा निर्णय घ्यावा. असेही आदेशात म्हटले आहे.

बाहेरून येणारे सर्व प्रवाशी १४ दिवस होम क्वारंटाईन

खासगी बसेस या ५० टक्के बैठक क्षमतेसह सुरू राहतील. तसेच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील.

आंतरशहर किंवा आंतर जिल्ह्यातंर्गत खासगी बस सेवांना एका शहरात जास्तित जास्त दोन थांबे घेता येतील त्यासाठी नगर पलिका किंवा महापालिका यांना माहिती द्यावी लागेल. ज्या ठिकाणी थांब्यांवर प्रवासी उतरणार आहे. त्यांच्या सर्व प्रवाशांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा. हा शिक्का खासगी बसचालवणाऱ्या कंपनीने मारावा.

बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करावी. कोविडची लक्षणे दिसल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित करावे.

सर्वप्रवाशांची होणार अँटीजेन चाचणी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रवाशी थांब्यांवर एका स्वतंत्र लॅबला परवानगी देऊन येणाऱ्या प्रवाशांची अंटीजेन चाचणी करावी. तसेच याबाबतचा खर्च हा संबंधित प्रवासी अथवा बस सेवा पुरवठादार यांनी करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास बस सेवा पुरवठादाराला दहा हजाराचा दंड करण्यात येईल.