शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

बाहेरुन जळगावला येताय, मग उतरताच होणार अँटीजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:15 IST

जळगाव : राज्य शासनाने १ मे पर्यंत घातलेले निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील आदेश पारीत ...

जळगाव : राज्य शासनाने १ मे पर्यंत घातलेले निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील आदेश पारीत केले आहेत. आता नव्या आदेशानुसार जिल्हाभरात लग्नाचा सोहळा फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत आणि दोन तासात पार पाडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये देखील फक्त १५ टक्के उपस्थिती निश्चित करण्यात आली आहे. तसेच खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरजिल्हा किंवा आंतर शहर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही आता अँटीजेन टेस्ट होणार आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शासकीय कार्यालये हे कोविड नियमांचे पालन करून एकुण कर्मचारी क्षमतेच्या १५ टक्के कर्मचारी क्षमतेसह उपस्थितीत सुरू राहतील. आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या कार्यालयांना यातुन सुट राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने इतर शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती वाढवण्यासंदर्भात विभागप्रमुखांनी निर्णय घ्यावा. तसेच इतर कार्यालयांमध्ये एकुण कर्मचारी क्षमतेच्या १५ टक्के किंवा जास्तीत जास्त पाच कर्मचारी यांची उपस्थिती राहील.

लग्न समारंभासाठी फक्त २५ लोकांची उपस्थिती आणि फक्त दोन तासातच विवाह सोहळा पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कुटुंबास ५० हजाराचा दंड आणि ही जागा कोविडचे निवारण होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील. तसेच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे किंवा बसेसमधून आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील १४ दिवस गृहविलगीकरणात रहावे लागणार आहे. सर्व प्रवासी थांब्यांवर अँटीजेन तपासणी करून त्याचा खर्च संबंधित प्रवाशांकडून वसुल करावा. तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक परिस्थितीनुसार ठराविक ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा किंवा नाही याचा निर्णय घ्यावा. असेही आदेशात म्हटले आहे.

बाहेरून येणारे सर्व प्रवाशी १४ दिवस होम क्वारंटाईन

खासगी बसेस या ५० टक्के बैठक क्षमतेसह सुरू राहतील. तसेच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील.

आंतरशहर किंवा आंतर जिल्ह्यातंर्गत खासगी बस सेवांना एका शहरात जास्तित जास्त दोन थांबे घेता येतील त्यासाठी नगर पलिका किंवा महापालिका यांना माहिती द्यावी लागेल. ज्या ठिकाणी थांब्यांवर प्रवासी उतरणार आहे. त्यांच्या सर्व प्रवाशांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा. हा शिक्का खासगी बसचालवणाऱ्या कंपनीने मारावा.

बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करावी. कोविडची लक्षणे दिसल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित करावे.

सर्वप्रवाशांची होणार अँटीजेन चाचणी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रवाशी थांब्यांवर एका स्वतंत्र लॅबला परवानगी देऊन येणाऱ्या प्रवाशांची अंटीजेन चाचणी करावी. तसेच याबाबतचा खर्च हा संबंधित प्रवासी अथवा बस सेवा पुरवठादार यांनी करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास बस सेवा पुरवठादाराला दहा हजाराचा दंड करण्यात येईल.