शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात वाहन चालवतायं, तर मग ही काळजी घ्याच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST

जळगाव : पावसाळ्यात गावाला, फिरायला किंवा अन्य कोणत्याही कारणाने स्वत:च्या वाहनाने प्रवासाला निघताय, तर मग स्वत:चा आणि इतरांचा जीव ...

जळगाव : पावसाळ्यात गावाला, फिरायला किंवा अन्य कोणत्याही कारणाने स्वत:च्या वाहनाने प्रवासाला निघताय, तर मग स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचविण्यासाठी आरटीओने जी नियमावली घालून दिली आहे, त्याकडे जरा बघा. पावसाळ्यात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यातून जखमी व जीव जाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. वाहन घराच्या बाहेर काढण्यापूर्वी १० हजार किलोमीटर फिरले असेल तर सर्व्हिसिंग आवश्यक असून अन्यथा रस्त्यात धोका निर्माण होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात दोन वर्षात जून ते सप्टेबर या चार महिन्यात पावसाळ्यात ४७७ अपघात झाले असून त्यात ३०० जणांचा मृत्यू तर ४४६ जण जखमी झालेले आहेत. मागील जून महिन्यात ७८ अपघात झाले त्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

पावसाळ्यात प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जेथे जायचे तेथे निर्धारित वेळेत पोहचणे शक्य होत नाही. पावसात रस्त्यावर सांडलेले वाहनाचे तेल, डिझेल, ग्रीस व स्निग्ध पदार्थामुळे रस्ता निसरडा होत असतो. त्यामुळे वाहनांच्या चाकाची रस्त्याबाबत आवश्यक असणारी पकड कमी होते, परिणामी वाहन घसरण्याची शक्यता असते. कोरड्या रस्त्यापेक्षा ओल्या रस्त्यावर वाहनाचा ब्रेक उशिरा लागतो. त्यामुळे वाहन रस्ता सोडण्याची शक्यता असते अशा वेळी अपघात होतो. त्यामुळे वेग कमी ठेवणे गरजेचे आहे. खराब हवामानाच्यावेळी दोन वाहनांमधील अंतर पुरेसे असणं आवश्यक आहे. जी व्यक्ती वाहन चालविते त्याला जी अडचण येते तीच अडचण आपल्या मागे किंवा पुढे चालणाऱ्या वाहनचालकाला असते, त्यामुळे दोन वाहनांमधील अंतर हे सहा सेंकदाचे ठेवावे.

स्टेअरींगची पकड घट्ट ठेवा

१) पावसाळ्यात वारे जोरात वाहतात तर कधी पाऊसही मुसळधार असतो, अशा वेळी समोर रस्ता दिसत नाही, त्यामुळे चालकाने स्टेअरिंगची पकड घट्ट ठेवावी जेणे करुन वाहन रस्ता सोडणार नाही.

२) वाहन रस्त्याच्या बाजुला नाही तर जास्त अंतरावर पार्किंग करावे.

३) लाईट व इंडिकेटर बंद ठेवावे, ते सुरु ठेवल्यास आपले वाहन पुढे धावते आहे असे मागून येणाऱ्या वाहन चालकाला वाटते आणि त्यामुळे मागील वाहन धडकण्याची शक्यता अधिक असते. वाहन चालू असताना लाईट मात्र आवश्यक सुरु ठेवावेत.

कोट...(फोटो)

पावसाळ्याच्या दिवसात वाहन सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. टायर, लाईट, साईड इंडीकेटर, ब्रेक व इंजिन ऑईलची तपासणी करुनच घराच्या बाहेर निघावेत. या दिवसात अपघाताचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्यावेळी वाहन चालविताना अधिक सतर्क राहून बदलत्या वातावरणाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. शक्यतो पावसाळ्यात आवश्यक असेल तरच प्रवास करावा. अपघात टाळण्यासाठी आरटीओच्यावतीने दरवर्षी जनजागृती केली जाते.

-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

पावसाळ्यातील अपघात (जून ते सप्टेबर)

वर्ष अपघात मृत्यू जखमी

२०१९ -२४० - १२७ - २८५

२०२० - २३७ - १७३ - १६१

२०२१ (जूनपर्यंत)- ७८ - ६२ - १११