शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पावसाळ्यात वाहन चालवतायं, तर मग ही काळजी घ्याच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST

जळगाव : पावसाळ्यात गावाला, फिरायला किंवा अन्य कोणत्याही कारणाने स्वत:च्या वाहनाने प्रवासाला निघताय, तर मग स्वत:चा आणि इतरांचा जीव ...

जळगाव : पावसाळ्यात गावाला, फिरायला किंवा अन्य कोणत्याही कारणाने स्वत:च्या वाहनाने प्रवासाला निघताय, तर मग स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचविण्यासाठी आरटीओने जी नियमावली घालून दिली आहे, त्याकडे जरा बघा. पावसाळ्यात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यातून जखमी व जीव जाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. वाहन घराच्या बाहेर काढण्यापूर्वी १० हजार किलोमीटर फिरले असेल तर सर्व्हिसिंग आवश्यक असून अन्यथा रस्त्यात धोका निर्माण होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात दोन वर्षात जून ते सप्टेबर या चार महिन्यात पावसाळ्यात ४७७ अपघात झाले असून त्यात ३०० जणांचा मृत्यू तर ४४६ जण जखमी झालेले आहेत. मागील जून महिन्यात ७८ अपघात झाले त्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

पावसाळ्यात प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जेथे जायचे तेथे निर्धारित वेळेत पोहचणे शक्य होत नाही. पावसात रस्त्यावर सांडलेले वाहनाचे तेल, डिझेल, ग्रीस व स्निग्ध पदार्थामुळे रस्ता निसरडा होत असतो. त्यामुळे वाहनांच्या चाकाची रस्त्याबाबत आवश्यक असणारी पकड कमी होते, परिणामी वाहन घसरण्याची शक्यता असते. कोरड्या रस्त्यापेक्षा ओल्या रस्त्यावर वाहनाचा ब्रेक उशिरा लागतो. त्यामुळे वाहन रस्ता सोडण्याची शक्यता असते अशा वेळी अपघात होतो. त्यामुळे वेग कमी ठेवणे गरजेचे आहे. खराब हवामानाच्यावेळी दोन वाहनांमधील अंतर पुरेसे असणं आवश्यक आहे. जी व्यक्ती वाहन चालविते त्याला जी अडचण येते तीच अडचण आपल्या मागे किंवा पुढे चालणाऱ्या वाहनचालकाला असते, त्यामुळे दोन वाहनांमधील अंतर हे सहा सेंकदाचे ठेवावे.

स्टेअरींगची पकड घट्ट ठेवा

१) पावसाळ्यात वारे जोरात वाहतात तर कधी पाऊसही मुसळधार असतो, अशा वेळी समोर रस्ता दिसत नाही, त्यामुळे चालकाने स्टेअरिंगची पकड घट्ट ठेवावी जेणे करुन वाहन रस्ता सोडणार नाही.

२) वाहन रस्त्याच्या बाजुला नाही तर जास्त अंतरावर पार्किंग करावे.

३) लाईट व इंडिकेटर बंद ठेवावे, ते सुरु ठेवल्यास आपले वाहन पुढे धावते आहे असे मागून येणाऱ्या वाहन चालकाला वाटते आणि त्यामुळे मागील वाहन धडकण्याची शक्यता अधिक असते. वाहन चालू असताना लाईट मात्र आवश्यक सुरु ठेवावेत.

कोट...(फोटो)

पावसाळ्याच्या दिवसात वाहन सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. टायर, लाईट, साईड इंडीकेटर, ब्रेक व इंजिन ऑईलची तपासणी करुनच घराच्या बाहेर निघावेत. या दिवसात अपघाताचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्यावेळी वाहन चालविताना अधिक सतर्क राहून बदलत्या वातावरणाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. शक्यतो पावसाळ्यात आवश्यक असेल तरच प्रवास करावा. अपघात टाळण्यासाठी आरटीओच्यावतीने दरवर्षी जनजागृती केली जाते.

-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

पावसाळ्यातील अपघात (जून ते सप्टेबर)

वर्ष अपघात मृत्यू जखमी

२०१९ -२४० - १२७ - २८५

२०२० - २३७ - १७३ - १६१

२०२१ (जूनपर्यंत)- ७८ - ६२ - १११