शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

तर लोकप्रतिनिधी आता गप्प का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 12:36 IST

शिवाजीनगर उड्डाणपूल

सचिन देवजळगाव : शिवाजीनगर उड्डाणपूल १५ दिवसांपासून बंद झाल्यामुळे, गेल्या आाठवड्यात अग्नीशामक बंब वेळीच न पोहचल्यामुळे अनेक गरिबांचे संसार आगीत खाक झाले तर दोन दिवसांपूर्वी वेळीच उपचार न मिळाल्यामुळे एका बालकाला आपले जीव गमवावा लागला. लागोपाठ या आठवड्यांत शिवाजीनगरत या दोन गंभीर घटना घडुनही, प्रशासनासह लोकप्रतिनिधी या घटनांवर साधा शोक व्यक्त करतांना दिसून आले नाही.अनेकवेळा सामाजिक प्रश्नासाठी महासभेत आवाज उठवणारे, पुढे-पुढे करणारे लोकप्रतिनिधी आता गप्पा का ? असा प्रशन सर्व सामान्य जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यांत या उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करुन, पूलाच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे पूलावरील वाहतुक सुरत गेट मार्गे वाहतुक वळविण्यात आल्याने नागरिकांना दररोज १० किलोमीटरचा फेरा पडत आहे.या फेऱ्यातुन प्रवासा करतांना रस्त्यावरील वाहतुक कोंडी व गेट मध्ये वाहन अडकल्यावर होणाऱ्या विलंबामुळे जळगावकरांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.दररोज या ठिकाणाहुन शिवाजीनगरातील रहिवाशांसह परिसरातील गावांमधुन सुमारे १० हजार वाहनधारक ये-जा करित असतात. सुरत गेट हा एकच पर्यायी मार्ग असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तहसिल कार्यालयाजवळ पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना व आपत्कालीन परिस्थितीसाठी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे. पूलाचे काम दोन वर्ष चालणार असल्याने, रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तात्पुरते गेट उभारण्यासाठी रहिवाशांना न्यायालयाचे देखील दार ठोठावे लागले आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्त्याची मागणी फेटाळुन लावल्याने, शिवाजीनगरातील हातावर पोट भरणाºया नागरिकांना स्व:त पैसे खर्च करुन, न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. या पेक्षा आणखी दुर्देव काय म्हणावे..शिवाजीनगर वासियांचा शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाला विरोध नसुन, प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जर पर्यायी रस्ता उपलब्ध झाला असता, तर ‘त्या ’आगीवर नियंत्रण मिळवता आले असते आणि ‘त्या’ बालकाचाही जीव वाचला असता. शिवाजीनगर उड्डाणपूल काहीही करुन होणारचं आहे. मात्र, त्या बालकाचा जीव परत येणार आहे का ? असे असतानांही मतासांठी मतदारांचा पाय पडणारे,त्यांना प्रलोभने दाखविणारे,ऐवढे झाल्यानंतर आवाज उठवतांना का दिसत नाहीत, आताच मौन गिळुन गप्प का..