शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात हुकूमशाही येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:44 IST

दिलीप वळसे- पाटील यांनी जळगाव येथील आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त केली भिती: भाजपा सरकारचे दडपशाहीचे धोरण

ठळक मुद्देगिरीश महाजनांची मस्ती उतरवा- डॉ. सतीश पाटीलभाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही- देवकर

जळगाव: भाजपा सरकारचे दडपशाहीचे धोरणअसून सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल जात आहे. भाजपा सरकार पुन्हा निवडून आल्यास देशात मोदी हे हुकुमशाहीच आणतील. यामुळे ही निवडणूक देशातील लोकशाहीच्या अस्तित्वासाठीची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे- पाटील यांनी येथील मेळाव्यात केले.जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी येथील शिवतीर्थ मैदानावर आघाडीचा मेळावा झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार सुधीर तांबे, आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, अरुण पाटील व दिलीप सोनवणे, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगर अध्यक्ष नामदेवराव चौधरी, सजंय गरुड, शशिकांत साळुंखे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, अभिषेक पाटील, ललित बागुल, योगेश देसले, वाल्मिक पाटील, उज्वल पाटील, उमेश पाटील, तिलोत्तमा पाटील, मंगला पाटील, सविता बोरसे, कल्पिता पाटील, निला चौधरी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, महानगरअध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डी. जी. पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, राजस कोतवाल, उदय पाटील, आरपीआय गवई गटाचे अध्यक्ष कल्पेश मोरे आदी उपस्थित होते.रावेरचा उमेदवार लवकरच जाहीर होणारजळगाव लोकसभा मतदार संघात आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे. रावेर मधूनही चांगला उमेदवार दिला जाईल. आज रात्रीपर्यंत अथवा उद्यापर्यंत उमेदवार जाहीर होईल, असे सांगत दोन्ही मतदार संघातून पक्षाच्या विजयासाठी जोमाने काम करावे,असे आवाहन वळसे पाटील यांंनी केले.भाजपाचे तिकीट तोडीपानीवाल्यांना !प्रचंड मताधिक्याने गेल्या निवडणुकीत विजयी होवून सुद्धा भाजपाचे खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट का कापले गेले ? असं काय झालं...हा सवाल गिरीश महाजनांना विचारा, असे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच या खासदाराला का निवडून दिले हा देखील विचार करा. आता पुन्हा ती चूक करु नका असे आवाहनही त्यांनी केले. तर पाटील यांना महाजन तसेच भाजपा जिल्हाध्यक्षांनी ब्लॅकमेल केले पैसे पोहचूनही तिकिट मिळाले नाही, एवढेच नाही तर तोडीपाणीवाल्यांना तिकीट दिले असा आरोपही डॉ. पाटील यांनी केला.गिरीश महाजनांची मस्ती उतरवा- डॉ. सतीश पाटीलगिरीश महाजन यांना आभाळ दोन बोटेच शिल्लक असल्यासारखे झाले आहे, आता त्यांना आता खाली उतरवा असे आवाहनही डॉ. सतीश पाटील यांनी केले. महाजन हे जलसंपदा मंत्री असताना जिल्'ात काहीही कामे झालेले नाही. जिल्'ातला दोन मंत्री आणि एक अर्धा मंत्री असताना जिल्हा वाऱ्यावर आहे. डीपीडीसीच्या बैठकीही वेळेवर होत नाही, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली.भाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही- देवकरगुलाबराव देवकर यावेळी म्हणाले की, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मनपा निवडणुकीत सांगितले होते की, आम्हाला सत्ता दिल्यास ३०० कोटी आणू आणि शहराचा विकास करु अन्यथा पुढील निवडणुकीत मते मागणार नाही. मात्र आज ८ महिने झाले तरी १ रुपयाआणला नाही. शहराची पहिल्यापेक्षाही दुरावस्था झाली आहे. ग्रामीण भागातही विकास नाही. यामुळे भाजपाला मते मागण्याचाच अधिकार नाही, अशी टिका गुलाबराव देवकर यांनी केली.मेळाव्याच्या सुरुवातीला शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेळावा समाप्ती नंतर रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत देवकर यांनी जिल्हाधिकारी येथे रॅलीसहपायी जावून अर्ज दाखल केला. यावेळी विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Politicsराजकारण