शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

जलपर्णी न काढल्यास मेहरुण तलावाचे अस्तित्व येणार धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मेहरूण तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णीबाबत मनपा प्रशासनाकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मराठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मेहरूण तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णीबाबत मनपा प्रशासनाकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मराठी प्रतिष्ठानसह अनेक पर्यावरणप्रेमींकडून जलपर्णी काढण्याची मागणी केली जात आहे. तर उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यास जलपर्णी नष्ट होवून जाईल असे मत मनपा अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, ही वनस्पती वाढत गेल्यास तलावाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भिती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही तलावात किंवा नदी पात्रात जलपर्णीचा विस्तार वाढला तर काही वर्षात त्याठिकाणी केवळ जलपर्णीच दिसते, त्यामुळे आज जे तलावाचे सौंदर्य जळगावकरांना अनुभवण्यास मिळत आहे. ते काही वर्षात नष्ट होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. मेहरूण तलावात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून, अनेक प्रकारच्या वनस्पती देखील मेहरूण तलावाच्या जलाशयात आहेत. मात्र, जलपर्णीचा वाढत जाणारा विळखा काही प्रमाणात तलावाचे अस्तित्व धोक्यात आणू शकतो.

जलपर्णी बाबत मतभिन्नता

जलपर्णी बाबत पक्षीमित्र व पर्यावरण प्रेमींमध्ये काही प्रमाणात मतभिन्नता आहे. जलपर्णी वाढल्यास स्थलांतरीत पक्षी असो वा स्थानिक पक्षी यांना अन्न चांगल्याप्रकारे उपलब्ध होत असते. पक्ष्यांसाठी काही प्रमाणात असलेली जलपर्णी फायदेकारक आहे. मात्र, ही जलपर्णी वाढत गेल्यास संपूर्ण जलाशयच व्यापून टाकते. त्यामुळे याबाबत प्रशासनाने सजग राहण्याचीच गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. दरम्यान, काही प्रमाणात तलावात जलपर्णी कायम राहिली तर तलावाचे नुकसान होणार नाही. मात्र, हेच प्रमाण वाढल्यास धोका निर्माण होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.

तलाव परिसर नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करा

मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, तलाव परिसरात वाढत जाणारा मानवी वावर या भागातील जैवविविधता, पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. त्यातच तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने देखील आणली जात असल्याने शांततेचा देखील भंग होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तलाव परिसर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्याची मागणी नीर फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. याबाबतीत नीर फाऊंडेशन चे संचालक सागर महाजन यांनी मनपा आयुक्त व महापौरांना निवेदन देण्यात आले.

कोट.

तलाव परिसरात जलपर्णी ही किनाऱ्यालगत वाढली आहे. इतपत ही वनस्पती वाढल्यास तलावाला धोका नाही. तसेच वनस्पतीमुळे पक्षी व मासे यांना फायद्याची ठरते. मात्र, ही वनस्पती थांबलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढत असते. तलावाचे पाणी हे स्थिर असते. त्यामुळे भविष्यात ही वनस्पती तलावात वाढू शकते.

-डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक

जलपर्णी हे पक्ष्यांसाठी उत्तम खाद्य आहे. मात्र, त्याचे प्रमाण तलावात कमी राहिले पाहिजे. वाढत गेल्यास तलावाला धोका, मनपाने ही जलपर्णी काढल्यास इतर पोषक वनस्पती तलावात कशा वाढतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-राजेंद्र गाडगीळ, पक्षी मित्र