शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

जलपर्णी न काढल्यास मेहरुण तलावाचे अस्तित्व येणार धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मेहरूण तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णीबाबत मनपा प्रशासनाकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मराठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मेहरूण तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णीबाबत मनपा प्रशासनाकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मराठी प्रतिष्ठानसह अनेक पर्यावरणप्रेमींकडून जलपर्णी काढण्याची मागणी केली जात आहे. तर उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यास जलपर्णी नष्ट होवून जाईल असे मत मनपा अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, ही वनस्पती वाढत गेल्यास तलावाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भिती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही तलावात किंवा नदी पात्रात जलपर्णीचा विस्तार वाढला तर काही वर्षात त्याठिकाणी केवळ जलपर्णीच दिसते, त्यामुळे आज जे तलावाचे सौंदर्य जळगावकरांना अनुभवण्यास मिळत आहे. ते काही वर्षात नष्ट होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. मेहरूण तलावात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून, अनेक प्रकारच्या वनस्पती देखील मेहरूण तलावाच्या जलाशयात आहेत. मात्र, जलपर्णीचा वाढत जाणारा विळखा काही प्रमाणात तलावाचे अस्तित्व धोक्यात आणू शकतो.

जलपर्णी बाबत मतभिन्नता

जलपर्णी बाबत पक्षीमित्र व पर्यावरण प्रेमींमध्ये काही प्रमाणात मतभिन्नता आहे. जलपर्णी वाढल्यास स्थलांतरीत पक्षी असो वा स्थानिक पक्षी यांना अन्न चांगल्याप्रकारे उपलब्ध होत असते. पक्ष्यांसाठी काही प्रमाणात असलेली जलपर्णी फायदेकारक आहे. मात्र, ही जलपर्णी वाढत गेल्यास संपूर्ण जलाशयच व्यापून टाकते. त्यामुळे याबाबत प्रशासनाने सजग राहण्याचीच गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. दरम्यान, काही प्रमाणात तलावात जलपर्णी कायम राहिली तर तलावाचे नुकसान होणार नाही. मात्र, हेच प्रमाण वाढल्यास धोका निर्माण होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.

तलाव परिसर नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करा

मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, तलाव परिसरात वाढत जाणारा मानवी वावर या भागातील जैवविविधता, पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. त्यातच तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने देखील आणली जात असल्याने शांततेचा देखील भंग होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तलाव परिसर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्याची मागणी नीर फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. याबाबतीत नीर फाऊंडेशन चे संचालक सागर महाजन यांनी मनपा आयुक्त व महापौरांना निवेदन देण्यात आले.

कोट.

तलाव परिसरात जलपर्णी ही किनाऱ्यालगत वाढली आहे. इतपत ही वनस्पती वाढल्यास तलावाला धोका नाही. तसेच वनस्पतीमुळे पक्षी व मासे यांना फायद्याची ठरते. मात्र, ही वनस्पती थांबलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढत असते. तलावाचे पाणी हे स्थिर असते. त्यामुळे भविष्यात ही वनस्पती तलावात वाढू शकते.

-डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक

जलपर्णी हे पक्ष्यांसाठी उत्तम खाद्य आहे. मात्र, त्याचे प्रमाण तलावात कमी राहिले पाहिजे. वाढत गेल्यास तलावाला धोका, मनपाने ही जलपर्णी काढल्यास इतर पोषक वनस्पती तलावात कशा वाढतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-राजेंद्र गाडगीळ, पक्षी मित्र