शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णी न काढल्यास मेहरुण तलावाचे अस्तित्व येणार धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मेहरूण तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णीबाबत मनपा प्रशासनाकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मराठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मेहरूण तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णीबाबत मनपा प्रशासनाकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मराठी प्रतिष्ठानसह अनेक पर्यावरणप्रेमींकडून जलपर्णी काढण्याची मागणी केली जात आहे. तर उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यास जलपर्णी नष्ट होवून जाईल असे मत मनपा अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, ही वनस्पती वाढत गेल्यास तलावाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भिती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही तलावात किंवा नदी पात्रात जलपर्णीचा विस्तार वाढला तर काही वर्षात त्याठिकाणी केवळ जलपर्णीच दिसते, त्यामुळे आज जे तलावाचे सौंदर्य जळगावकरांना अनुभवण्यास मिळत आहे. ते काही वर्षात नष्ट होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. मेहरूण तलावात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून, अनेक प्रकारच्या वनस्पती देखील मेहरूण तलावाच्या जलाशयात आहेत. मात्र, जलपर्णीचा वाढत जाणारा विळखा काही प्रमाणात तलावाचे अस्तित्व धोक्यात आणू शकतो.

जलपर्णी बाबत मतभिन्नता

जलपर्णी बाबत पक्षीमित्र व पर्यावरण प्रेमींमध्ये काही प्रमाणात मतभिन्नता आहे. जलपर्णी वाढल्यास स्थलांतरीत पक्षी असो वा स्थानिक पक्षी यांना अन्न चांगल्याप्रकारे उपलब्ध होत असते. पक्ष्यांसाठी काही प्रमाणात असलेली जलपर्णी फायदेकारक आहे. मात्र, ही जलपर्णी वाढत गेल्यास संपूर्ण जलाशयच व्यापून टाकते. त्यामुळे याबाबत प्रशासनाने सजग राहण्याचीच गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. दरम्यान, काही प्रमाणात तलावात जलपर्णी कायम राहिली तर तलावाचे नुकसान होणार नाही. मात्र, हेच प्रमाण वाढल्यास धोका निर्माण होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.

तलाव परिसर नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करा

मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, तलाव परिसरात वाढत जाणारा मानवी वावर या भागातील जैवविविधता, पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. त्यातच तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने देखील आणली जात असल्याने शांततेचा देखील भंग होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तलाव परिसर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्याची मागणी नीर फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. याबाबतीत नीर फाऊंडेशन चे संचालक सागर महाजन यांनी मनपा आयुक्त व महापौरांना निवेदन देण्यात आले.

कोट.

तलाव परिसरात जलपर्णी ही किनाऱ्यालगत वाढली आहे. इतपत ही वनस्पती वाढल्यास तलावाला धोका नाही. तसेच वनस्पतीमुळे पक्षी व मासे यांना फायद्याची ठरते. मात्र, ही वनस्पती थांबलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढत असते. तलावाचे पाणी हे स्थिर असते. त्यामुळे भविष्यात ही वनस्पती तलावात वाढू शकते.

-डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक

जलपर्णी हे पक्ष्यांसाठी उत्तम खाद्य आहे. मात्र, त्याचे प्रमाण तलावात कमी राहिले पाहिजे. वाढत गेल्यास तलावाला धोका, मनपाने ही जलपर्णी काढल्यास इतर पोषक वनस्पती तलावात कशा वाढतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-राजेंद्र गाडगीळ, पक्षी मित्र