शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास भोरगाव लेवा पंचायत विरोधात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:31 IST

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री तथा समाजाचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव आले नाही. त्यामुळे हा समाजाचा अपमान आहे.

ठळक मुद्देपहिल्या यादीत नाव न घेतल्याने निषेधसमाजाने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम होतोराज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर परिणाम होणारलेवा पाटीदार समाज खान्देश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला४० वर्षांपासून खडसे हे भाजपला जिल्ह्यात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत

भुसावळ, जि.जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री तथा समाजाचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव आले नाही. त्यामुळे हा समाजाचा अपमान असून, खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास सकल लेवा समाजाची बैठक घेऊन भोरगाव लेवा पाटीदार पंचायत योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी दिला आहे. याचा परिणाम राज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. याचबरोबर त्यांनी भाजप नेतृत्वाचा निषेध केला आहे.येथील जामनेर रोडवरील सोनीच्छा वाडीजवळ आयोजित पत्रकार परिषदेत कुटुंबनायक रमेश पाटील बोलत होते. यावेळी भोर पंचायतचे सदस्य डॉ.नरेंद्र कोल्हे (यावल), बाळू पाटील, भुसावळ येथील लेवा समाज युवक महासंघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, सुहास चौधरी, मंगला पाटील, आरती चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.भाजपची पहिली यादी १ रोजी प्रसिद्ध झाली. ही यादी पाहून समाजाला मोठे दु:ख झाले. पहिल्या यादीत खडसे हे डावलले गेले तो समाजाचा अपमान आहे. त्यामुळे निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आल्याचेही काही सदस्यांनी सांगितले. लेवा पाटीदार समाज खान्देश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे. ४० वर्षांपासून माजी मंत्री खडसे हे भाजपला जिल्ह्यात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. भाजपचा झेंडा हाती घेण्यास कोणी तयार नव्हते, त्या वेळेपासून ते प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांचं नाव सन्मानपूर्वक पहिल्या यादीत घेणे गरजेचे असल्याचेही मत कुटुंबनायक पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या तीन वर्षांपासून भाजप खडसे यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी खडसे यांना माहिती दिली असल्याचे कुटुंबनायक पाटील यांनी सांगितले, तर समाज हा माजी मंत्री खडसे यांच्यासोबत असून, भाजपने खडसे यांची दखल न घेतल्यास भोरगाव पंचायतीचे २१ सदस्य व आठ निमंत्रित सदस्य यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. समाजाने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील सहा, त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, अमरावती, मलकापूर, कोथरूड आदी ३५ मतदारसंघांवर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :ElectionनिवडणूकBhusawalभुसावळ