शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास भोरगाव लेवा पंचायत विरोधात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:31 IST

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री तथा समाजाचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव आले नाही. त्यामुळे हा समाजाचा अपमान आहे.

ठळक मुद्देपहिल्या यादीत नाव न घेतल्याने निषेधसमाजाने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम होतोराज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर परिणाम होणारलेवा पाटीदार समाज खान्देश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला४० वर्षांपासून खडसे हे भाजपला जिल्ह्यात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत

भुसावळ, जि.जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री तथा समाजाचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव आले नाही. त्यामुळे हा समाजाचा अपमान असून, खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास सकल लेवा समाजाची बैठक घेऊन भोरगाव लेवा पाटीदार पंचायत योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी दिला आहे. याचा परिणाम राज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. याचबरोबर त्यांनी भाजप नेतृत्वाचा निषेध केला आहे.येथील जामनेर रोडवरील सोनीच्छा वाडीजवळ आयोजित पत्रकार परिषदेत कुटुंबनायक रमेश पाटील बोलत होते. यावेळी भोर पंचायतचे सदस्य डॉ.नरेंद्र कोल्हे (यावल), बाळू पाटील, भुसावळ येथील लेवा समाज युवक महासंघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, सुहास चौधरी, मंगला पाटील, आरती चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.भाजपची पहिली यादी १ रोजी प्रसिद्ध झाली. ही यादी पाहून समाजाला मोठे दु:ख झाले. पहिल्या यादीत खडसे हे डावलले गेले तो समाजाचा अपमान आहे. त्यामुळे निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आल्याचेही काही सदस्यांनी सांगितले. लेवा पाटीदार समाज खान्देश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे. ४० वर्षांपासून माजी मंत्री खडसे हे भाजपला जिल्ह्यात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. भाजपचा झेंडा हाती घेण्यास कोणी तयार नव्हते, त्या वेळेपासून ते प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांचं नाव सन्मानपूर्वक पहिल्या यादीत घेणे गरजेचे असल्याचेही मत कुटुंबनायक पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या तीन वर्षांपासून भाजप खडसे यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी खडसे यांना माहिती दिली असल्याचे कुटुंबनायक पाटील यांनी सांगितले, तर समाज हा माजी मंत्री खडसे यांच्यासोबत असून, भाजपने खडसे यांची दखल न घेतल्यास भोरगाव पंचायतीचे २१ सदस्य व आठ निमंत्रित सदस्य यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. समाजाने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील सहा, त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, अमरावती, मलकापूर, कोथरूड आदी ३५ मतदारसंघांवर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :ElectionनिवडणूकBhusawalभुसावळ