शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कभी जिंदगी मे सोचा नही ऐसा दिन देखना पडेगा... व्यथा स्थलांतरितांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:53 IST

जंक्शन शहरामध्ये पायपीट करत शेकडो मील पायी प्रवास करत शहरातून देशातील कोणत्याही कानाकोपºयात जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेपोटी शेकडो परप्रांतीय भुसावळ शहरांमध्ये दाखल होत आहेत.

ठळक मुद्देपायी भ्रमंती करणाऱ्या मजुरांची व्यथाभुसावळकडे आले आशेच्या दिशेने

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : जंक्शन शहरामध्ये पायपीट करत शेकडो मील पायी प्रवास करत शहरातून देशातील कोणत्याही कानाकोपºयात जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेपोटी शेकडो परप्रांतीय भुसावळ शहरांमध्ये दाखल होत आहेत. मात्र प्रशासनातर्फे जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हिरमोड झाल्यानंतर ‘कभी जिंदगी मे सोचा नही था ऐसा दिन देखना पडेगा’ अशी आप बीती मजुरांनी व्यक्त केली.हजारो किलोमीटर घरदार सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आलेले परप्रांतीय लॉकडाऊननंतर मोठा अस्मानी संकट कोसळला. भुसावळ महामार्गावर नवोदय विद्यालयासमोर दररोज जथेच्या जथे थांबत असून या ठिकाणी त्यांची सेवाभावी संस्थेतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांच्याशी युती केली असता औरंगाबाद, नाशिक, धुळे यासह छोट्या तालुक्यांमध्ये यु.पी., एम.पी., झारखंडच्या वेगवेगळा जिल्ह्यातून अडकलेल्या मजुरांनी आपबिती सांगितली तर अक्षरश: अंगावर शहारे आले. डोंबिवली येथे एका खोलीमध्ये भाडे वाचावे व दोन पैसे शिल्लक राहावे तब्बल या हेतूने आम्ही ३९ लोक राहत होते. एकाच कंपनीत तीन शिफ्टमध्ये तेरा तेरा तास काम करत होतो. त्या खोलीची क्षमता एकाच वेळेस सर्वांना राहण्याची नव्हती. मात्र लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने आमच्यावर अस्मानी संकट कोसळले. इतक्या लोकांनी कसे राहायचे? कसं जेवायचं? काहीच समजायला मार्ग नाही. ज्या भागातही खोली होती त्या भागातल्या शेजारच्यांना आमच्या राहण्यावरून आपत्ती होती. जणू माणुसकीच हरवली की काय, असं आम्हाला जाणवला. घरमालकांना सांगून वारंवार तगादा लावून आम्हाला खोली खाली करण्यास सांगण्यात आले. आमच्याकडे शंकेच्या नजरेने पाहण्यात आले. खिशात पैसे नाही. हातात काम नाही. दोन पैसे कमावून घरी वृद्ध आईवडिलांची व कुटुंबीयांची सेवा करावी याकरिता हजारो किलोमीटर लांब येऊन मजुरी करत होते. मात्र तेही देवाला मंजूर नाही, अशी मनाला भेद करणारी प्रतिक्रिया डोंबिवली येथून आलेल्या रमेश लाल तिवारी यांनी ‘लोकमत'ला दिली.कोणी माणुसकीच्या नात्याने जेवण दिले तर जेवायचे. अन्यथा उपाशी पोट प्रवास करायचा ह्या नित्याचे झाले आहे भुसावळ येथून जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेपोटी इथे आले. मात्र काही उपयोग झाला नाही. रविवारी भरदुपारी एक वाजता भुसावळ महामार्गावर एका डेरेदार वृक्षाच्या सावलीचा आधार घेत थोडा विसावा घेतला. पहाटे चारपासून प्रवास करत सकाळी नऊ वाजेपर्यंत प्रवास हे नित्याचे झाले आहे. खानदेशमध्ये आल्यानंतर विशेषत: भुसावळमध्ये लोकांनी खूप भरभरून प्रेम दिले. जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था केली. मात्र उन्हाचे चटके भुसावळचे असह्य आहे. संध्याकाळी सहानंतर पुढील प्रवास करू, असे ते युवकाने सांगितले.‘कोरोना समूहाने होतो. आम्ही तर निरंतर समूहाने चालत आहोत. आम्ही अनेक दिवसांपासून समुहात आहोत. आमच्या आरोग्याचे तर का सोडा, आमच्या जीवनाचे वांधे आहे. हमारा कौन है यहां जो मारी फिकर करेगा,’ अशी आप बीती परप्रांतीयांनी व्यक्त केली.घर की मिट्टी मे मरना पसंद करेंगेकोरोना महामारीमुळे कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र शेवटची इच्छा अशी आहे की, आम्हाला आमच्या घरी आमच्या कुटुंबीयांमध्ये आलीस तर मरण यावे. हम घर कि मिट्टी मे जाके मरना पसंद करेंगे. अगर जिंदा रहे तो वही खेतीवाडी करके दो वक्त की रोटी कमा लेंगे.साकेगाव नदीत करतात आंघोळमहामार्गावर साकेगावजवळ असलेल्या वाघूर नदीवर पायी जाणारे मजूर तसेच परवानगी मिळाल्यानंतर वाहनाने जाणारे परप्रांतीय अडकलेले मजूर सकाळ, संध्याकाळ मोठ्या संख्येने थांबून आंघोळ करून विसावा घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ