शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जलयुक्त शिवार अभियान ठेकेदारमुक्त व सेंद्रीय शेतीयुक्त असावे- जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह

By admin | Updated: June 3, 2017 18:44 IST

जलयुक्त शिवार अभियान दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 3 - महाराष्ट्र सरकारने शेतांमध्ये, शिवारात पाणी मुरण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणले, पण मागील वर्षी गडबड झाली. माथा ते पायथा असे तांत्रिकदृष्टय़ा योग्य काम झालेले दिसत नाही. जलयुक्त शिवार अभियान दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल, पण योग्य अभियांत्रिकीचा अवलंब करून आणि ठेकेदारांपासून ही योजना दूर करून लोकांच्या हातात द्यावी, लोकांचा मोठा सहभाग यात वाढावा. यासोबत लोकांची मागणी लक्षात घेता या अभियानात सेंद्रीय शेतीचा अंतर्भाव करता येईल का, याचाही विचार व्हावा, असे आवाहन जागतिक जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पाणी परिषद व स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेत शनिवारी केले. विद्यापीठातील पदवीप्रदान सभागृहात ही कार्यशाळाशनिवारी झाली. व्यासपीठावर पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.माधवराव चितळे, स्वच्छता दूत भारत पाटील (कोल्हापूर),  हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार,कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा उज्‍जवला पाटील, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, महापौर नितीन लढ्ढा, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, प्रा.चंद्रकांत सोनवणे, स्मिता वाघ,  जि.प.चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, प्रांताधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक एम.आदर्श रेड्डी, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील आदी उपस्थित होते. मागील काळापेक्षा 10 पट भीषण दुष्काळफक्त महाराष्ट्र दुष्काळी स्थितीत आहे, असे नाही. देशात पाच राज्यांमध्ये दुष्काळ आहे. मागील काळापेक्षा 10 पट भीषण दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत नदी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले पाहिजे. मध्य प्रदेशात हे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. मी सरकारचे अभिनंदन करीन. पण ही योजना तांत्रिकदृष्टय़ा व्यवस्थित राबवावी, ठेकेदारांपासून दूर करावी, असे राजेंद्रसिंह म्हणाले. आज जे पाणी हडपतात, दूषित करतात त्यांना मुभाइतिहासात किंवा पूर्वीच्या काळात देशात पाण्यासाठी व्यापारी, राजे हे मोठी संपत्ती द्यायचे. त्याची कुठली नोंद त्यांच्या सामाजिक उपक्रमांच्या यादीत (सीएसआर) नसायची. पाण्याला त्यांचे प्राधान्य असे. पाणी या विषयावर जनता, राजे, व्यापारी एकत्र येऊन चर्चा करीत व वर्षभराचे नियोजन करीत, पण आता उद्योजक, व्यापारी बदलले. हेच व्यापारी, उद्योजकपाणी जमिनीतून बेसमुमार पणे उपसतात, व तेच पाणी आपल्याला बाटली बंद करून देतात. जे पाणी हडपतात, पाणी दूषित करतात, त्यांना मुभा आहे व जे पाण्यासाठी, जलपुनर्भरणासाठी काम करतात, त्यांना पाणी मिळत नाही, अशी चिंताही राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली.