शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियान ठेकेदारमुक्त व सेंद्रीय शेतीयुक्त असावे- जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह

By admin | Updated: June 3, 2017 18:44 IST

जलयुक्त शिवार अभियान दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 3 - महाराष्ट्र सरकारने शेतांमध्ये, शिवारात पाणी मुरण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणले, पण मागील वर्षी गडबड झाली. माथा ते पायथा असे तांत्रिकदृष्टय़ा योग्य काम झालेले दिसत नाही. जलयुक्त शिवार अभियान दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल, पण योग्य अभियांत्रिकीचा अवलंब करून आणि ठेकेदारांपासून ही योजना दूर करून लोकांच्या हातात द्यावी, लोकांचा मोठा सहभाग यात वाढावा. यासोबत लोकांची मागणी लक्षात घेता या अभियानात सेंद्रीय शेतीचा अंतर्भाव करता येईल का, याचाही विचार व्हावा, असे आवाहन जागतिक जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पाणी परिषद व स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेत शनिवारी केले. विद्यापीठातील पदवीप्रदान सभागृहात ही कार्यशाळाशनिवारी झाली. व्यासपीठावर पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.माधवराव चितळे, स्वच्छता दूत भारत पाटील (कोल्हापूर),  हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार,कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा उज्‍जवला पाटील, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, महापौर नितीन लढ्ढा, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, प्रा.चंद्रकांत सोनवणे, स्मिता वाघ,  जि.प.चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, प्रांताधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक एम.आदर्श रेड्डी, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील आदी उपस्थित होते. मागील काळापेक्षा 10 पट भीषण दुष्काळफक्त महाराष्ट्र दुष्काळी स्थितीत आहे, असे नाही. देशात पाच राज्यांमध्ये दुष्काळ आहे. मागील काळापेक्षा 10 पट भीषण दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत नदी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले पाहिजे. मध्य प्रदेशात हे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. मी सरकारचे अभिनंदन करीन. पण ही योजना तांत्रिकदृष्टय़ा व्यवस्थित राबवावी, ठेकेदारांपासून दूर करावी, असे राजेंद्रसिंह म्हणाले. आज जे पाणी हडपतात, दूषित करतात त्यांना मुभाइतिहासात किंवा पूर्वीच्या काळात देशात पाण्यासाठी व्यापारी, राजे हे मोठी संपत्ती द्यायचे. त्याची कुठली नोंद त्यांच्या सामाजिक उपक्रमांच्या यादीत (सीएसआर) नसायची. पाण्याला त्यांचे प्राधान्य असे. पाणी या विषयावर जनता, राजे, व्यापारी एकत्र येऊन चर्चा करीत व वर्षभराचे नियोजन करीत, पण आता उद्योजक, व्यापारी बदलले. हेच व्यापारी, उद्योजकपाणी जमिनीतून बेसमुमार पणे उपसतात, व तेच पाणी आपल्याला बाटली बंद करून देतात. जे पाणी हडपतात, पाणी दूषित करतात, त्यांना मुभा आहे व जे पाण्यासाठी, जलपुनर्भरणासाठी काम करतात, त्यांना पाणी मिळत नाही, अशी चिंताही राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली.