शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिरसोलीत पंधरा दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

शिरसोली : येथे पत्नीच्या निधनानंतर पतीचाही पंधरा दिवसांनी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी झाली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने ...

शिरसोली : येथे पत्नीच्या निधनानंतर पतीचाही पंधरा दिवसांनी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी झाली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरसोली येथील शेतकरी नारायण बारी व त्यांच्या पत्नी भारती बारी यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना २९ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना भारती बारी यांचा ३ मे रोजी मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूची माहिती पती नारायण यांना सांगण्यात आली नव्हती. दरम्यान, नारायण यांनी पत्नीची चौकशी केली असता त्यांना त्या दुसऱ्या वॉर्डात उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यात १९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा जयेश, मुलगी स्नेहल आणि हर्षाली असा परिवार आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा जयेश याच्यावर फक्त २२व्या वर्षी दोन्ही लहान बहिणींची जबाबदारी आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.