शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

रस्त्यांच्या कामामुळे अडथळयांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:28 IST

औरंगाबाद, अकोला व चाळीसगावसाठी लागतात दीड ते दोन तास जादा

ठळक मुद्देऔरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तास

जळगाव : जिल्ह्यातून जाणारा जळगाव ते चिखली या राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण, जळगाव ते औरंगाबाद व जळगाव ते मनमाड या दोन रस्त्यांचे रुंदीकरण सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे अनेक भागात नागरिकांना तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागतो आहे. या कामांमुळे जुन्या मार्गाची साधी दुरूस्तीही होऊ न शकल्याने मोठमोठे खड्डे ठिकठिकाणी पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.या सर्व गोंधळामुळे जळगाव ते औरंगाबादला आणि जळगाव ते चाळीसगाव जाण्यासाठी तीन तासांऐवजी चार ते साडेचार तास तर अकोला जाण्यासाठी चार ऐवजी पाच तास लागत आहे. त्यामुळे हा प्रवास आता कंटाळवाणा तितकाच जिकरीचा बनला आहे.राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. यात तरसोद ते चिखली व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे आहेत. यातील तरसोद ते चिखली या मार्गाचे काम गेल्या सहा महिन्यापांसून गतीने सुरू आहे. तर तरसोद ते धुळे जिल्ह्यातील फागणे या मार्गाचे काम ठेकेदाराला आलेल्या काही अडचणींमुळे बंद पडले आहे. चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजुंनी साडेसात-साडेसात मिटरचे दोन मार्ग आहेत तर आत दुभाजक असेल. दोन्ही टप्प्यात चौपदरीकरणाची रूंदी अशीच असेल केवळ जळगाव ते भुसावळ दरम्यान वाहतूक जास्त असल्यामुळे दोन्ही बाजुंनी दहा-दहा मिटरचा रस्ता असेल. या दोन्ही मार्गात ठिकठिकाणी खोदून ठेवले वाहतुकीची कोंडी होत आहे.औरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तासजळगाव ते औरंगाबाद मार्ग दुहेरीकरणासाठी खोदण्यात आला आहे. रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव ते औरंगाबाद हे १६० किलोमीटरचे अंतर असून,एस.टी.टॅव्हल्स व रुग्णवाहिका यांना हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी तीन ते साडेतीन तास लागायचे. मात्र, रस्त्याच्या कामामुळे हे अंतर पार करण्यासाठी साडे चार ते पाच तास लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेले खोदकाम, खडी-मुरुमचे पडलेले ढिगारे, सिमेंटचे पाईप व वाहनामुळे उडणाऱ्या धुळीने वाहनधारकांना अतिशय संथ गतीने वाहन चालवावे लागत आहे. प्रचंड उडणाºया धुळीमुळे तर चालकांना समोरचे अस्पष्ट दिसत असल्यामुळे, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.चाळीसगाव, अकोल्याकडे जाण्यासाठींही एक ते दीड तासांचा विलंबजळगावहुन चाळीसगाव, धुळे, व अकोला या राष्ट्रीय मार्गांवरही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये धुळ्याचे काम बंद असले तरी, चाळीसगाव व अकोला या रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यामध्ये जळगाव ते चाळीसगावचे अंतर १०२ किलोमीटर असून, तीन तासांऐवजी ४ तास लागत आहे. जळगाव ते अकोला १८० किलोमीटरचे अंतर या ठिकाणी जाण्यासाठी बसला ५ तासांऐवजी सहा तास लागत असल्यााचे एस.टी, रुग्णवाहिका व ट्रॅव्हल्सच्या चालकांनी सांगितले.जळगाव-औरंगाबाद मार्ग खिळखिळाजळगाव -औरंगाबाद हा राज्य मार्ग आहे. त्याच पद्धतीने जळगाव ते चाळीसगाव व पुढे मनमाड हादेखील राज्य मार्ग आहे. दोन्ही बाजुंनी पाच-पाच मिटरने हे काम या रस्त्यांवर सुरू आहे. जळगाव औरंगाबाद रस्त्याचे डांबरीकरण ते जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले जात आहे. या मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तर खराब झालेल्या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी केली जात तीदेखील यंदा होऊ शकलेली नाही.अतिरिक्त भत्ता देण्यात यावाजळगाव आगारातून औरंगाबाद, चाळीसगाव, अकोला या मार्गावर दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत बस फेºया सुरु असतात. बस निघाल्यानंतर औरंगाबाद येथुन सात तासात परत तर धुळ््याहुन सहा व चाळीसगावहुनही सहा तासात परत व्हावे. असे प्रत्येक चालकाला वेळेचे वेळापत्रक ठरवुन दिले आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे दिलेल्या वेळेपत्रकापेक्षा दररोज दीड ते दोन तासांचा विलंब होत असल्याने, एसटीच्या चालकांनी जादा कामाचा अतिरिक्त भत्ता द्यावा. अशी मागणी विभागनियंत्रकांकडे केली आहे. गेल्या आठवड्यातच संयुक्त कृती समितीचे अध्यळ गोपाळ पाटील तर महाराष्ट्र एस.टी वर्कस काँग्रेस(इंटक)तर्फे संदीप सुर्यवंशी यांनी केली आहे.