शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामामुळे अडथळयांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:28 IST

औरंगाबाद, अकोला व चाळीसगावसाठी लागतात दीड ते दोन तास जादा

ठळक मुद्देऔरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तास

जळगाव : जिल्ह्यातून जाणारा जळगाव ते चिखली या राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण, जळगाव ते औरंगाबाद व जळगाव ते मनमाड या दोन रस्त्यांचे रुंदीकरण सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे अनेक भागात नागरिकांना तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागतो आहे. या कामांमुळे जुन्या मार्गाची साधी दुरूस्तीही होऊ न शकल्याने मोठमोठे खड्डे ठिकठिकाणी पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.या सर्व गोंधळामुळे जळगाव ते औरंगाबादला आणि जळगाव ते चाळीसगाव जाण्यासाठी तीन तासांऐवजी चार ते साडेचार तास तर अकोला जाण्यासाठी चार ऐवजी पाच तास लागत आहे. त्यामुळे हा प्रवास आता कंटाळवाणा तितकाच जिकरीचा बनला आहे.राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. यात तरसोद ते चिखली व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे आहेत. यातील तरसोद ते चिखली या मार्गाचे काम गेल्या सहा महिन्यापांसून गतीने सुरू आहे. तर तरसोद ते धुळे जिल्ह्यातील फागणे या मार्गाचे काम ठेकेदाराला आलेल्या काही अडचणींमुळे बंद पडले आहे. चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजुंनी साडेसात-साडेसात मिटरचे दोन मार्ग आहेत तर आत दुभाजक असेल. दोन्ही टप्प्यात चौपदरीकरणाची रूंदी अशीच असेल केवळ जळगाव ते भुसावळ दरम्यान वाहतूक जास्त असल्यामुळे दोन्ही बाजुंनी दहा-दहा मिटरचा रस्ता असेल. या दोन्ही मार्गात ठिकठिकाणी खोदून ठेवले वाहतुकीची कोंडी होत आहे.औरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तासजळगाव ते औरंगाबाद मार्ग दुहेरीकरणासाठी खोदण्यात आला आहे. रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव ते औरंगाबाद हे १६० किलोमीटरचे अंतर असून,एस.टी.टॅव्हल्स व रुग्णवाहिका यांना हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी तीन ते साडेतीन तास लागायचे. मात्र, रस्त्याच्या कामामुळे हे अंतर पार करण्यासाठी साडे चार ते पाच तास लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेले खोदकाम, खडी-मुरुमचे पडलेले ढिगारे, सिमेंटचे पाईप व वाहनामुळे उडणाऱ्या धुळीने वाहनधारकांना अतिशय संथ गतीने वाहन चालवावे लागत आहे. प्रचंड उडणाºया धुळीमुळे तर चालकांना समोरचे अस्पष्ट दिसत असल्यामुळे, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.चाळीसगाव, अकोल्याकडे जाण्यासाठींही एक ते दीड तासांचा विलंबजळगावहुन चाळीसगाव, धुळे, व अकोला या राष्ट्रीय मार्गांवरही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये धुळ्याचे काम बंद असले तरी, चाळीसगाव व अकोला या रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यामध्ये जळगाव ते चाळीसगावचे अंतर १०२ किलोमीटर असून, तीन तासांऐवजी ४ तास लागत आहे. जळगाव ते अकोला १८० किलोमीटरचे अंतर या ठिकाणी जाण्यासाठी बसला ५ तासांऐवजी सहा तास लागत असल्यााचे एस.टी, रुग्णवाहिका व ट्रॅव्हल्सच्या चालकांनी सांगितले.जळगाव-औरंगाबाद मार्ग खिळखिळाजळगाव -औरंगाबाद हा राज्य मार्ग आहे. त्याच पद्धतीने जळगाव ते चाळीसगाव व पुढे मनमाड हादेखील राज्य मार्ग आहे. दोन्ही बाजुंनी पाच-पाच मिटरने हे काम या रस्त्यांवर सुरू आहे. जळगाव औरंगाबाद रस्त्याचे डांबरीकरण ते जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले जात आहे. या मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तर खराब झालेल्या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी केली जात तीदेखील यंदा होऊ शकलेली नाही.अतिरिक्त भत्ता देण्यात यावाजळगाव आगारातून औरंगाबाद, चाळीसगाव, अकोला या मार्गावर दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत बस फेºया सुरु असतात. बस निघाल्यानंतर औरंगाबाद येथुन सात तासात परत तर धुळ््याहुन सहा व चाळीसगावहुनही सहा तासात परत व्हावे. असे प्रत्येक चालकाला वेळेचे वेळापत्रक ठरवुन दिले आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे दिलेल्या वेळेपत्रकापेक्षा दररोज दीड ते दोन तासांचा विलंब होत असल्याने, एसटीच्या चालकांनी जादा कामाचा अतिरिक्त भत्ता द्यावा. अशी मागणी विभागनियंत्रकांकडे केली आहे. गेल्या आठवड्यातच संयुक्त कृती समितीचे अध्यळ गोपाळ पाटील तर महाराष्ट्र एस.टी वर्कस काँग्रेस(इंटक)तर्फे संदीप सुर्यवंशी यांनी केली आहे.