शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

रस्त्यांच्या कामामुळे अडथळयांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:28 IST

औरंगाबाद, अकोला व चाळीसगावसाठी लागतात दीड ते दोन तास जादा

ठळक मुद्देऔरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तास

जळगाव : जिल्ह्यातून जाणारा जळगाव ते चिखली या राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण, जळगाव ते औरंगाबाद व जळगाव ते मनमाड या दोन रस्त्यांचे रुंदीकरण सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे अनेक भागात नागरिकांना तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागतो आहे. या कामांमुळे जुन्या मार्गाची साधी दुरूस्तीही होऊ न शकल्याने मोठमोठे खड्डे ठिकठिकाणी पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.या सर्व गोंधळामुळे जळगाव ते औरंगाबादला आणि जळगाव ते चाळीसगाव जाण्यासाठी तीन तासांऐवजी चार ते साडेचार तास तर अकोला जाण्यासाठी चार ऐवजी पाच तास लागत आहे. त्यामुळे हा प्रवास आता कंटाळवाणा तितकाच जिकरीचा बनला आहे.राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. यात तरसोद ते चिखली व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे आहेत. यातील तरसोद ते चिखली या मार्गाचे काम गेल्या सहा महिन्यापांसून गतीने सुरू आहे. तर तरसोद ते धुळे जिल्ह्यातील फागणे या मार्गाचे काम ठेकेदाराला आलेल्या काही अडचणींमुळे बंद पडले आहे. चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजुंनी साडेसात-साडेसात मिटरचे दोन मार्ग आहेत तर आत दुभाजक असेल. दोन्ही टप्प्यात चौपदरीकरणाची रूंदी अशीच असेल केवळ जळगाव ते भुसावळ दरम्यान वाहतूक जास्त असल्यामुळे दोन्ही बाजुंनी दहा-दहा मिटरचा रस्ता असेल. या दोन्ही मार्गात ठिकठिकाणी खोदून ठेवले वाहतुकीची कोंडी होत आहे.औरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तासजळगाव ते औरंगाबाद मार्ग दुहेरीकरणासाठी खोदण्यात आला आहे. रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव ते औरंगाबाद हे १६० किलोमीटरचे अंतर असून,एस.टी.टॅव्हल्स व रुग्णवाहिका यांना हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी तीन ते साडेतीन तास लागायचे. मात्र, रस्त्याच्या कामामुळे हे अंतर पार करण्यासाठी साडे चार ते पाच तास लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेले खोदकाम, खडी-मुरुमचे पडलेले ढिगारे, सिमेंटचे पाईप व वाहनामुळे उडणाऱ्या धुळीने वाहनधारकांना अतिशय संथ गतीने वाहन चालवावे लागत आहे. प्रचंड उडणाºया धुळीमुळे तर चालकांना समोरचे अस्पष्ट दिसत असल्यामुळे, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.चाळीसगाव, अकोल्याकडे जाण्यासाठींही एक ते दीड तासांचा विलंबजळगावहुन चाळीसगाव, धुळे, व अकोला या राष्ट्रीय मार्गांवरही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये धुळ्याचे काम बंद असले तरी, चाळीसगाव व अकोला या रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यामध्ये जळगाव ते चाळीसगावचे अंतर १०२ किलोमीटर असून, तीन तासांऐवजी ४ तास लागत आहे. जळगाव ते अकोला १८० किलोमीटरचे अंतर या ठिकाणी जाण्यासाठी बसला ५ तासांऐवजी सहा तास लागत असल्यााचे एस.टी, रुग्णवाहिका व ट्रॅव्हल्सच्या चालकांनी सांगितले.जळगाव-औरंगाबाद मार्ग खिळखिळाजळगाव -औरंगाबाद हा राज्य मार्ग आहे. त्याच पद्धतीने जळगाव ते चाळीसगाव व पुढे मनमाड हादेखील राज्य मार्ग आहे. दोन्ही बाजुंनी पाच-पाच मिटरने हे काम या रस्त्यांवर सुरू आहे. जळगाव औरंगाबाद रस्त्याचे डांबरीकरण ते जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले जात आहे. या मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तर खराब झालेल्या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी केली जात तीदेखील यंदा होऊ शकलेली नाही.अतिरिक्त भत्ता देण्यात यावाजळगाव आगारातून औरंगाबाद, चाळीसगाव, अकोला या मार्गावर दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत बस फेºया सुरु असतात. बस निघाल्यानंतर औरंगाबाद येथुन सात तासात परत तर धुळ््याहुन सहा व चाळीसगावहुनही सहा तासात परत व्हावे. असे प्रत्येक चालकाला वेळेचे वेळापत्रक ठरवुन दिले आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे दिलेल्या वेळेपत्रकापेक्षा दररोज दीड ते दोन तासांचा विलंब होत असल्याने, एसटीच्या चालकांनी जादा कामाचा अतिरिक्त भत्ता द्यावा. अशी मागणी विभागनियंत्रकांकडे केली आहे. गेल्या आठवड्यातच संयुक्त कृती समितीचे अध्यळ गोपाळ पाटील तर महाराष्ट्र एस.टी वर्कस काँग्रेस(इंटक)तर्फे संदीप सुर्यवंशी यांनी केली आहे.