शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वाळूचोरीसाठी आणले जाताय लिलावात अडथळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:27 IST

विश्लेषण

सुशील देवकरजळगाव- वाळू गटांचे लिलाव करण्यात अडथळे आणून वाळू चोरी करण्याचे तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील वाळू आणून ती अधिक किंमतीला विक्रीचे प्रकार आता सुरू झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाळूला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.मागील वर्षी वाळू लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल झाली. त्याच्या सुनावणीसाठी राज्यभरातील वाळू गटांच्या लिलावाला स्थगिती मागण्यात आली होती. त्यामुळे वाळूचे लिलाव रखडले होते. आता यंदाही बरोबर वाळू गटांचे लिलाव होण्याच्या काही दिवस आधीच नागपूर उच्च न्यायालयातच याचिका दाखल झाली आहे. त्यात वाळू गटांच्या लिलावाला स्थगिती देण्यात आलेली नसली तरीही त्यासाठी जाहिरातीवर खर्च करण्यास मनाई आहे. जाहिरात दिल्याशिवाय निविदा निघू शकणार नसल्याने साहजिकच निविदा प्रक्रिया रखडली आहे. या परिस्थितीत वाळू चोरीचे प्रमाण मात्र प्रचंड वाढले आहे. कारण बांधकामे सुरू असून अधिकृत वाळू पुरवठा मात्र बंद आहे. याचा फायदा वाळू माफियांना मिळत आहे. दरवर्षीच वाळू गटांच्या लिलावापूर्वीच याचिका कशा दाखल होतात? याबाबत कानोसा घेतला असता नागपूर जिल्ह्यात वाळू माफियांनी ही क्लृप्ती योजत असल्याचे समजले. कारण अनेक वाळू माफियांनी लगतच्या जिल्ह्यात अथवा राज्यात वाळू ठेके घेतलेले असतात. वाळूची मागणी मात्र नागपूर शहरात जास्त असल्याने वाळू गटांना स्थगिती मिळवून बाहेरच्या राज्यातील वाळू तेथे विक्री केली जाते. एका नेत्याने तर भंडारा जिल्ह्यातील सर्व वाळूठेके घेऊन नागपूर जिल्ह्यातील वाळू ठेक्यांना स्थगिती घेतली होती. सहाजिकच त्याच्या ठेक्यांमधील वाळूच नागपूरात विक्री झाल्याची चर्चा आहे. राज्य शासनाने या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाळूलाही जिल्ह्याबाहेर विक्रीस मनाई करण्यासारख्या उपाययोजना करण्याची गरज आहे. शासनाने नुकतेच नदीपात्रापर्यंत वाळूचे डंपर न नेता वाळू उपसा करून मक्तेदाराने तो जवळच एक डेपो करून त्यात साठवावा. तेथून प्रशासनाच्या परवानगीने तो विक्रीसाठी न्यावा, असे आदेश दिले आहेत. मात्र याची अंमलबजावणी कितपत यशस्वी होते? याबाबतही साशंकताच आहे.