शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सात वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या सात वर्षांपासून अनुकंपातत्त्वावर मनपात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांनी सोमवारी मनपा प्रशासनाच्या धोरणांपुढे हतबल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या सात वर्षांपासून अनुकंपातत्त्वावर मनपात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांनी सोमवारी मनपा प्रशासनाच्या धोरणांपुढे हतबल होऊन मनपासमोर उपोषण पुकारले. मनपा न्याय देऊ शकत नसेल तर न्यायासाठी मनपाच्या प्रवेशव्दारासमोर उपोषण पुकारत, जीव देऊ अशी भूमिका अनुकंपाधारकांनी घेतली होती. संपूर्ण दिवसभर उपोषण करत, सायंकाळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी अनुकंपाधारकांना न्याय मिळावा यासाठी शासनाकडे मंजुरीला पाठविण्यात आलेला आकृतीबंधांचा पाठपुरावा करण्यात येणार असून, त्यानुसार अनुकंपाधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन दिल्यानंतर अनुकंपाधारकांनी उपोषण मागे घेतले.

२०१३ पासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत मनपाच्या खेट्या मारत आहेत. मात्र, मनपाकडून अजूनही अनुकंपाधारकांना नोकरी दिली नाही. यामुळे संतप्त होऊन अनुकंपाधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अनुकंपाधारकांबाबत महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाने ३१ डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दिले होते. मात्र, हे आश्वासन प्रशासनाने न पाळल्याने नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या सर्व व भाजपच्या दोन सदस्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करून, स्थायी समितीच्या सभेचा सभात्याग देखील केला होता. अनेक वर्षांपासून वारंवार अनुकंपाधारकांना आश्वासन देऊनदेखील त्यांना नियुक्ती मिळत नसल्याने अनुकंपाधारकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

शासनाकडे आकृतीबंधासाठी पाठपुरावा करणार

सायंकाळी महापौरांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनुकंपाधारकांसह महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

सर्वप्रकारची शासन निर्णय व नियमांची पूर्तता असतांनादेखील आयुक्तांना रिक्त पदांची उपलब्धता पाहून नियुक्तीचे अधिकार असतांना अनुकंपाधारकांना न्याय मिळत नसल्याचे अनुकंपाधारकांनी सांगितले. तसेच अनेक उमेदवार पात्र असूनदेखील येत्या काही दिवसात वयोमर्यादा जास्त झाल्याने नोकरी गमावून बसणार असल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय होणार असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी मनपाचा आकृतीबंध शासनाकडे मंजुरीला पाठविण्यात आला असून, शासनाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रश्न देखील मार्गी लागेल, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह मनपा प्रशासनाकडून आकृतीबंधासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर अनुकंपाधारकांनी उपोषण सोडले.