शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

लॉकडाऊनची उपासमार सहन होईना- व्यथा स्थलांतरितांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:42 IST

परप्रांतातून पोट भरण्यासाठी जामनेर व परिसरात आलेल्या कामगारांची कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे.

ठळक मुद्देघरी जाण्याची परवानगी मिळेना जामनेरच्या परप्रांतीयांची व्यथा

मोहन सारस्वत/सय्यद लियाकतजामनेर, जि.जळगाव : परप्रांतातून पोट भरण्यासाठी जामनेर व परिसरात आलेल्या कामगारांची कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे. आणखी किती दिवस उपासमार सहन करायची, यापेक्षा गावाकडे गेलेलेच बरे, असा विचार करून परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज केले, मात्र प्रशासकीय अडचणींमुळे परवानगी मिळत नसल्याने हतबल झालेले कामगार निराश झाले आहे.थंड पेय, पाणी पुरी विक्रेत्यांसह हॉटेल कारागीर असलेले परप्रांतातील सुमारे अडीच हजार कामगार जामनेर व ग्रामीण भागात अडकून आहेत. कानपूर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या या मजुरांना काम नसल्याने घराची ओढ लागली आहे. गावी परतण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली मात्र अद्याप काहीही उत्तर मिळत नसल्याने मजूर हतबल झाले.परराज्यातील मजुरांच्या आधार कार्डावर पूर्ण नाव नसल्याने आॅनलाईन नोंदणीत अडचणी येत असल्याने त्यांनी आमदार गिरीश महाजन यांच्याकडे व्यथा मांडली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडचण सोडविण्याची मागणी केली.शहरात उत्तर प्रदेश येथील भय्या लोकांचे थंड पेय विक्रीचे दुकान असून काही जण हातगाडी लावून व्यवसाय करतात. सुमारे २०० जणांचा यावर उदरनिर्वाह आहे. पाणीपुरी विकून चरितार्थ चालविणारे बिहार व कानपूर येथील काही कुटुंबीय लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक अडचणीत सापडले.राजस्थान येथील फरसाण व मिठाई दुकानदार जामनेर, फत्तेपूर, नेरी, पहूर, शेंदुर्णी येथे आहेत. त्यांच्याकडे काम करणारे घराकडे जाण्यासाठी आतूर झाले आहे. आॅनलाईन परवानगी साठी अर्ज करून देखील प्रशासनाकडून काहीही हालचाल होत नसल्याने त्यांची तगमग वाढत आहे.देशी दारू दुकान चालविणारे अांध्रप्रदेश येथील असून त्यांच्याकडे काम करणाºया मजुरांची संख्या सुमारे ५० असावी. दीड महिन्यापासून दुकान बंद असल्याने चरितार्थ कसा चालवावा याची चिंता त्यांना सतावत आहे.घर व दुकानातील पीओपीचे काम करणारे परप्रांतीय मजूर शहरात कुटुंबांसह राहतात. काम सुरू होईल या आशेवर मजुरांनी गावाकडे जाणे टाळले.तालुक्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कामगार सुरत, वापी येथे कामासाठी जातात. वीटभट्टीवर तर काही कारखान्यात काम करतात. मिळेल त्या वाहणारे हे मजूर गावाकडे परतत आहेत. जामनेरसह ग्रामीण भागात परतणाºया मजुरांना तपासणी करून गावात घेतले जात आहे. काही ठिकाणी मजुरांना शाळेच्या इमारतीत ठेवले जात असून, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत. चिंचखेडे तवा या गावातील १४ कुटुंबीय सुरत येथून परतल्यानंतर त्यांनी गावाबाहेर शेतातच राहणे पसंत केले.मध्य प्रदेशात पायी जाणारे मजूर रात्री भुसावळ अथवा मुक्ताईनगर मार्गे शहरातून जाताना दिसतात. एकत्रित जाणाºया मजुरांना जेवण पुरविण्यासाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदत करतात.लॉकडाऊनपूर्वीच कुटुंबियांना घरी पाठविले. हॉटेलमध्ये काम करून रोजी रोटी मिळवितो, मात्र हॉटेल बंद असल्याने अडचण वाढली. घराची ओढ आहेच परवानगी मिळण्याची वाट बघतोय.- दिवाकर कुमावत (मिस्तरी), नानंद, बिहारथंड पेय विक्री बंद असल्याने सुमारे ४० कामगार बेरोजगार झाले. दीड महिन्यापासून घरातच आहोत. रोजगार नसल्याने घर खचार्ची चिंता वाढली आहे. कामगारांना घराकडे जाण्याची ओढ लागली मात्र परवानगी मिळत नाही.-राहुल रामकीसन भय्या, थंडपेय विक्रेते, कानपूरवालेदोन हजार प्रमाणपत्रांचे वाटपपरराज्यात जाणाºया सुमारे दोन ते अडीच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले.-डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर