शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

खेर्डेत शेकडो एकर पिके पुरात स्वाहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST

चाळीसगाव : एरव्ही लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या सातमाळा डोंगर रांगांमधून वाहून येणाऱ्या ‘डोंगरी नद्यांनी’ ३१ ऑगस्टच्या पहाटे तीन ते पाचच्या ...

चाळीसगाव : एरव्ही लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या सातमाळा डोंगर रांगांमधून वाहून येणाऱ्या ‘डोंगरी नद्यांनी’ ३१ ऑगस्टच्या पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान थेट बाणगाव, खेर्डेत मुसंडी मारली. त्याअगोदर शेकडो एकरवरील पिकांनाही त्यांनी लोळविले. ११ जणांची घरे आणि संसारही वाहून घेऊन गेल्या. पूर ओसरल्यानंतरही पूरग्रस्तांच्या डोळ्यातला पूर अजूनही वाहतोच आहे.

खेर्डे गावात सहा दिवस उलटूनही शेती नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

रांजणगाव, बाणगाव, खेर्डे, रोकडे, लोंजे ही गावे सातमाळा डोंगर रांगांच्या तटबंदीने वेढलेली आहेत. ३० ऑगस्ट रोजी याच सातमाळा डोंगररांगांवर आभाळ फाटल्याने याच डोंगररांगांमधून वाहून येणाऱ्या लहान-मोठ्या नद्यांना पूर आला. ३१ ऑगस्टच्या पहाटे अतिवृष्टीचं बोट धरून आलेल्या पुराने धुमशान घालत शेकडो एकरवरील पिके काही मिनिटांत पाण्यात लोळविली.

पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने बहुतांशी शेत अक्षरशः खरडून निघाले आहेत. त्यामुळे काल-परवा हिरवा साज घेऊन डोलणारी शेत-शिवारं उजाड झाली असून, बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्ग प्रकोपात स्वाहा झाला आहे.

चौकट

फळबागा झाल्या उजाड

बाणगाव, खेर्डे येथे ऊस, केळी, मोसंबी, लिंबूच्या बागा आहेत. पुराने या बागांची दाणादाण उडाली आहे. सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी, ज्वारी आदी पिकेही पुराने मातीमोल करून टाकली आहेत.

१...खेर्डे येथे पुराचे संकट येऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतरही शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.

चौकट

घरे गेली वाहून, राहिला चिखलगाळ

चाळीसगाव शहरापासून पूर्वेला अवघ्या दहा कि.मी. अंतरावर असणाऱ्या बाणगावात गावाला स्पर्श करून वाहणाऱ्या डोंगरी नदीला आलेल्या पुराने मोठे नुकसान केले. एकनाथ गणपण देवरे, वसंत भीमराव देवरे, लक्ष्मण सुपडू देवरे, राजू देवचंद पवार, भिकन देवचंद पवार, रमेश बुधा गायकवाड, सुरेश बुधा गायकवाड, हिरामण माणिक गायकवाड यांची घरे आणि संसारही वाहून गेले आहेत. घरांच्या जागी आता फक्त चिखलगाळ उरला आहे. अरुण रंगराव देवरे यांचे शेड वाहून गेले. अनिल दशरथ कुंभार यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. समाजमंदिरही जमीनदोस्त झाले आहे.

-ज्यांची घरे वाहून गेली, ते सर्व मोलमजुरी करणारे नागरिक असून, काहींनी ग्रामपंचायतींत आसरा घेतला आहे.

-शेळी, गायी, म्हशी, बैल अशा दीडशे जनावरांना पुराच्या पाण्यात जलसमाधी मिळाल्याचे सांगताना पशुपालक, शेतकरी गलबलून जातात. दुभती जनावरेही पुराने हिरावून नेली आहेत.

चौकट

जलसंपदा मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत नाराजीचा सूर

शनिवारी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. मात्र, पूरग्रस्तांसाठी कोणतीही तातडीची मदत जाहीर केली नाही. त्यांनी एकप्रकारे पूरग्रस्तांच्या तोंडाला पानेच पुसली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

सांगा उघड्यावर जगायचे कसे?

३१ ऑगस्टची ती रात्र मृत्यूचे तांडवच करीत होती. बरोबर तीन वाजता डोंगरी नदीचे पाणी वाढले. काही मिनिटांत घरात दरवाज्यापर्यंत पाणी भरले. कशीबशी आम्ही आमची सुटका करून जीव वाचविला. काही क्षणात घर कोसळले आणि सर्व वाहून गेले. मायबाप सरकारने तातडीने मदत करावी.

-एकनाथ गणपत देवरे, पूरग्रस्त, बाणगाव, ता. चाळीसगाव

050921\05jal_3_05092021_12.jpg~050921\05jal_4_05092021_12.jpg

बाणगाव येथे डोंगरी नदी लगत असणारी आठ घरे वाहून गेल्याने चिखळगाळ तेवढा उरला आहे. (छाया : जिजाबराव वाघ)~बाणगाव येथे डोंगरी नदी लगत असणारी आठ घरे वाहून गेल्याने चिखळगाळ तेवढा उरला आहे. (छाया : जिजाबराव वाघ)