शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील पाणीटंचाईमुळे धरणगावात प्रचंड असंतोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:18 IST

नगरपालिका प्रशासनातील कारभारींच्या कामकाजाचा फटका धरणगावकरांना बसत आहे. नियोजन नसल्यामुळे भर पावसाळ्यात धरणगावकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. ...

नगरपालिका प्रशासनातील कारभारींच्या कामकाजाचा फटका धरणगावकरांना बसत आहे. नियोजन नसल्यामुळे भर पावसाळ्यात धरणगावकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. त्यामुळे गुरुवारी संतप्त महिलांनी नगरपालिकेवर धडक देत नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. अगदी पालिकेला बांगड्यांचा अहेर देण्यात आला.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे सोशल मीडियात विशेषतः विविध व्हाॅटसॲप ग्रुपवर याबाबत नगरपालिका प्रशासनाला जाब विचारले जात आहेत. व्हाॅटसॲप ग्रुपवर राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत. विस्कळीत तसेच दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. काही नागरिकांनी ‘सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर राजीनामा देईन,’ ही जुनी बातमी काही दिवसांपूर्वी शेअर करून नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांना जाब विचारला होता. एवढेच नव्हेतर, त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली होती.

भर पावसाळ्यातील पाणीटंचाईमुळे धरणगावच्या सोशल मीडियात प्रचंड असंतोषाचे वातावरण बघावयास मिळत आहे. वीस ते पंचवीस वर्षांपासून धरणगाव नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही पाण्याचा प्रश्न का सुटत नाही, असा उघड प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तरीदेखील धरणगावचा पाणी प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न विचारून विरोधकही शिवसेनेवर हल्लाबोल करीत आहेत.

दरम्यान, नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या आपसातील राजकारणामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात नाही, अशीदेखील गावात चर्चा आहे. पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना अवैध नळकनेक्शनकडेदेखील मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे.

लसीकरणाबाबतही नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांमध्ये नंबर लावण्यावरून जोरदार हाणामारी झाली होती. त्यामुळे गावात दोन ते तीन लसीकरण केंद्रे उभारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

लस उपलब्ध झाल्यावर नागरिक पहाटे तीन ते चार वाजेपासून लसीकरण केंद्रावर रांगा लावत असतात. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनदेखील याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

- कल्पेश महाजन