शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील पाणीटंचाईमुळे धरणगावात प्रचंड असंतोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:18 IST

नगरपालिका प्रशासनातील कारभारींच्या कामकाजाचा फटका धरणगावकरांना बसत आहे. नियोजन नसल्यामुळे भर पावसाळ्यात धरणगावकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. ...

नगरपालिका प्रशासनातील कारभारींच्या कामकाजाचा फटका धरणगावकरांना बसत आहे. नियोजन नसल्यामुळे भर पावसाळ्यात धरणगावकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. त्यामुळे गुरुवारी संतप्त महिलांनी नगरपालिकेवर धडक देत नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. अगदी पालिकेला बांगड्यांचा अहेर देण्यात आला.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे सोशल मीडियात विशेषतः विविध व्हाॅटसॲप ग्रुपवर याबाबत नगरपालिका प्रशासनाला जाब विचारले जात आहेत. व्हाॅटसॲप ग्रुपवर राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत. विस्कळीत तसेच दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. काही नागरिकांनी ‘सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर राजीनामा देईन,’ ही जुनी बातमी काही दिवसांपूर्वी शेअर करून नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांना जाब विचारला होता. एवढेच नव्हेतर, त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली होती.

भर पावसाळ्यातील पाणीटंचाईमुळे धरणगावच्या सोशल मीडियात प्रचंड असंतोषाचे वातावरण बघावयास मिळत आहे. वीस ते पंचवीस वर्षांपासून धरणगाव नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही पाण्याचा प्रश्न का सुटत नाही, असा उघड प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तरीदेखील धरणगावचा पाणी प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न विचारून विरोधकही शिवसेनेवर हल्लाबोल करीत आहेत.

दरम्यान, नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या आपसातील राजकारणामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात नाही, अशीदेखील गावात चर्चा आहे. पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना अवैध नळकनेक्शनकडेदेखील मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे.

लसीकरणाबाबतही नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांमध्ये नंबर लावण्यावरून जोरदार हाणामारी झाली होती. त्यामुळे गावात दोन ते तीन लसीकरण केंद्रे उभारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

लस उपलब्ध झाल्यावर नागरिक पहाटे तीन ते चार वाजेपासून लसीकरण केंद्रावर रांगा लावत असतात. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनदेखील याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

- कल्पेश महाजन