शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

सूचनांची अंमलबजावणी होत नसल्यास महामार्गाच्या कामाला गती येणार कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करून महामार्गाच्या कामाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करून महामार्गाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्यानंतर तीन दिवसांनीदेखील अजिंठा चौफुलीच्या पुढे महामार्गाला लागून जैसे थे स्थिती असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला ट्रकचे काम सुरू असण्यासह विविध वस्तूंचे दुकानेदेखील कायम आहे.

शहरातील रस्ता सुरक्षा व ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी रोजी बैठक झाली होती. त्या वेळी महामार्गाच्या कामाला गती देण्यासंदर्भात संबंधित विभागांना सूचना दिल्या होत्या. त्या वेळी या विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही निर्देश दिले होते. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित असतानाही तातडीने काम मार्गी लागले नसल्याचे चित्र आहे.

कामात अडथळे कायम

अजिंठा चौफुलीपासून पुढे रस्त्यावरच ट्रक दुरुस्तीचे काम केले जाते, महामार्गाच्या दोन्ही बाजूस विक्रेते दुकान मांडून वस्तुंची विक्री करतात त्यामुळेही वाहतूक कोंडी होवून रस्त्याच्या कामात अडथळे येतात. याबाबत पोलीस, परिवहन व महापालिकेने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले होते. याला आता तीन दिवस झाले तरी संयुक्त कारवाई झाली नाही व या रस्त्यावरील ट्रक दुरुस्ती अजूनही न थांबल्याने येथे अडथळे कायम असल्याचे चित्र आहे.

रस्त्याच्या कामात अडथळ्यासह वाहतूक कोंडीत भर

शहरातील व महामार्गावर असणाऱ्या चौफुलींवर वाहतूक कोंडी होणे आता नित्याचे झाले आहे. त्यात अजिंठा चौफुली येथे केवळ सकाळ-संध्याकाळच नव्हे तर आता दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असल्याची समस्या वाढत आहे. यात भुसावळवरून येताना कालिंका माता मंदिर ते थेट अजिंठा चौफुलीपर्यंत रस्त्याच्या कडेला वाहनांची दुरुस्ती करण्यासह विविध वस्तूंच्या विक्रीचे दुकाने असल्याने वाहनांची गती कमी होते व वाहतूक कोंडी वाढत जाते, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

धुळीचा प्रचंड त्रास

अजिंठा चौफुली ते कालिंका माता मंदिर या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागण्यासह रस्त्याच्या कडेला ट्रकचे काम करीत असताना ते सुरू करून पाहिले जातात. यामुळे मोठमोठा आवाज होण्यासह धुळीचाही मोठा त्रास वाढल्याचे या भागातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

तातडीच्या सूचना असताना अंमलबजावणी कधीमहामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहे. मात्र तीन दिवसांनंतरही जबाबदारी सोपविलेल्या महापालिका, पोलीस, परिवहन विभागाकडूने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.