शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

सूचनांची अंमलबजावणी होत नसल्यास महामार्गाच्या कामाला गती येणार कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करून महामार्गाच्या कामाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करून महामार्गाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्यानंतर तीन दिवसांनीदेखील अजिंठा चौफुलीच्या पुढे महामार्गाला लागून जैसे थे स्थिती असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला ट्रकचे काम सुरू असण्यासह विविध वस्तूंचे दुकानेदेखील कायम आहे.

शहरातील रस्ता सुरक्षा व ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी रोजी बैठक झाली होती. त्या वेळी महामार्गाच्या कामाला गती देण्यासंदर्भात संबंधित विभागांना सूचना दिल्या होत्या. त्या वेळी या विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही निर्देश दिले होते. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित असतानाही तातडीने काम मार्गी लागले नसल्याचे चित्र आहे.

कामात अडथळे कायम

अजिंठा चौफुलीपासून पुढे रस्त्यावरच ट्रक दुरुस्तीचे काम केले जाते, महामार्गाच्या दोन्ही बाजूस विक्रेते दुकान मांडून वस्तुंची विक्री करतात त्यामुळेही वाहतूक कोंडी होवून रस्त्याच्या कामात अडथळे येतात. याबाबत पोलीस, परिवहन व महापालिकेने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले होते. याला आता तीन दिवस झाले तरी संयुक्त कारवाई झाली नाही व या रस्त्यावरील ट्रक दुरुस्ती अजूनही न थांबल्याने येथे अडथळे कायम असल्याचे चित्र आहे.

रस्त्याच्या कामात अडथळ्यासह वाहतूक कोंडीत भर

शहरातील व महामार्गावर असणाऱ्या चौफुलींवर वाहतूक कोंडी होणे आता नित्याचे झाले आहे. त्यात अजिंठा चौफुली येथे केवळ सकाळ-संध्याकाळच नव्हे तर आता दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असल्याची समस्या वाढत आहे. यात भुसावळवरून येताना कालिंका माता मंदिर ते थेट अजिंठा चौफुलीपर्यंत रस्त्याच्या कडेला वाहनांची दुरुस्ती करण्यासह विविध वस्तूंच्या विक्रीचे दुकाने असल्याने वाहनांची गती कमी होते व वाहतूक कोंडी वाढत जाते, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

धुळीचा प्रचंड त्रास

अजिंठा चौफुली ते कालिंका माता मंदिर या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागण्यासह रस्त्याच्या कडेला ट्रकचे काम करीत असताना ते सुरू करून पाहिले जातात. यामुळे मोठमोठा आवाज होण्यासह धुळीचाही मोठा त्रास वाढल्याचे या भागातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

तातडीच्या सूचना असताना अंमलबजावणी कधीमहामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहे. मात्र तीन दिवसांनंतरही जबाबदारी सोपविलेल्या महापालिका, पोलीस, परिवहन विभागाकडूने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.