शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

आणखी किती दिवस प्रतीक्षा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 16:06 IST

विश्लेषण

 सुशील देवकर

शासनाकडून सहकार कायद्यात सुधारणा करून प्रभावी वसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रभावी वसुली करण्यावर शासनाचा भर असून, यामुळे सहकारक्षेत्र अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे असे सांगत चुकीचे काम करणाऱ्यांचा संपत्तीवर येणार टाच आणली जाईल, असा इशाराही, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी जळगाव दौºयावर आलेले असताना दिला. मात्र राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार येऊन साडेचार वर्ष झाली. सहकार राज्यमंत्री जिल्ह्याचेच असताना सर्वाधिक पतपेढ्यांमधील ठेवींचा प्रश्न जिल्ह्यातच आहे. तो सोडविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. केवळ चर्चा झाली. कागदावरच कृती कार्यक्रम झाले. मात्र अधिकाºयांनी त्याची अंमलबजावणीच केली नाही. आणि वरिष्ठ अधिकारी व शासनाने त्याचा आढावा घेत अंमलबजावणी न करणाºया अधिकाºयांना जाबही विचारला नाही. त्यामुळेच सहकार विभागातील अधिकारी पतसंस्था चालकांशी हातमिळवणी करून स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेण्यात मग्न असल्याचेच या साडेचार वर्षात दिसून आले. ठेवीदार मात्र आस लावून आहेत. बहुतांश ठेवीदार हे वयोवृद्ध असून त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे या पतपेढ्यांमध्ये जादा व्याज मिळेल, या आशेने ठेवले. त्यांची आयुष्याची जमापुंजी आता त्यांच्या म्हातारपणात आजारांवर उपचारासाठी अथवा मुलींचे लग्न, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा अन्य गरजांसाठी कामाला येईल, अशी अपेक्षा असताना पतपेढ्यांनी हात वर केल्याने त्यांना शासनाकडे निवेदने देण्यापलिकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. दुसरीकडे शासनातील ज्यांच्याकडे अधिकार आहेत, असे मंत्री असोत की अधिकारी त्यांनी साडेचार वर्षात ही समस्या निकाली काढण्यासाठी अपेक्षेएवढ्या गांभीर्याने प्रयत्नच केलेले नाहीत. आता विधानसभेच्या निवडणुका अवघ्या सात-आठ महिन्यांवर आहेत. त्याआधी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी किमान तीन महिने सुरू राहील. त्यामुळे उरलेल्या कालावधीत सहकार कायदा कडक क रून ठेवीदारांना न्याय मिळेल, याची शाश्वती ठेवीदारांनाही वाटत नाही.