शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

आणखी किती दिवस प्रतीक्षा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 16:06 IST

विश्लेषण

 सुशील देवकर

शासनाकडून सहकार कायद्यात सुधारणा करून प्रभावी वसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रभावी वसुली करण्यावर शासनाचा भर असून, यामुळे सहकारक्षेत्र अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे असे सांगत चुकीचे काम करणाऱ्यांचा संपत्तीवर येणार टाच आणली जाईल, असा इशाराही, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी जळगाव दौºयावर आलेले असताना दिला. मात्र राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार येऊन साडेचार वर्ष झाली. सहकार राज्यमंत्री जिल्ह्याचेच असताना सर्वाधिक पतपेढ्यांमधील ठेवींचा प्रश्न जिल्ह्यातच आहे. तो सोडविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. केवळ चर्चा झाली. कागदावरच कृती कार्यक्रम झाले. मात्र अधिकाºयांनी त्याची अंमलबजावणीच केली नाही. आणि वरिष्ठ अधिकारी व शासनाने त्याचा आढावा घेत अंमलबजावणी न करणाºया अधिकाºयांना जाबही विचारला नाही. त्यामुळेच सहकार विभागातील अधिकारी पतसंस्था चालकांशी हातमिळवणी करून स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेण्यात मग्न असल्याचेच या साडेचार वर्षात दिसून आले. ठेवीदार मात्र आस लावून आहेत. बहुतांश ठेवीदार हे वयोवृद्ध असून त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे या पतपेढ्यांमध्ये जादा व्याज मिळेल, या आशेने ठेवले. त्यांची आयुष्याची जमापुंजी आता त्यांच्या म्हातारपणात आजारांवर उपचारासाठी अथवा मुलींचे लग्न, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा अन्य गरजांसाठी कामाला येईल, अशी अपेक्षा असताना पतपेढ्यांनी हात वर केल्याने त्यांना शासनाकडे निवेदने देण्यापलिकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. दुसरीकडे शासनातील ज्यांच्याकडे अधिकार आहेत, असे मंत्री असोत की अधिकारी त्यांनी साडेचार वर्षात ही समस्या निकाली काढण्यासाठी अपेक्षेएवढ्या गांभीर्याने प्रयत्नच केलेले नाहीत. आता विधानसभेच्या निवडणुका अवघ्या सात-आठ महिन्यांवर आहेत. त्याआधी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी किमान तीन महिने सुरू राहील. त्यामुळे उरलेल्या कालावधीत सहकार कायदा कडक क रून ठेवीदारांना न्याय मिळेल, याची शाश्वती ठेवीदारांनाही वाटत नाही.