शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लुट आणखी किती दिवस चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:05 IST

सचिन देव जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने सध्यस्थितीला बहुतांश रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ...

सचिन देव

जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने सध्यस्थितीला बहुतांश रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना कोरोनाच्या नावाखाली फेस्टीव्हल आणि स्पेशल गाड्यांचा दर्जा देऊन, प्रवाशांची अक्षरश: लुट केली जात आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जा आणि त्यातील आरक्षणाची सक्ती बंद करून पूर्वीप्रमाणे या गाड्या सर्व सामान्य प्रवाशांसाठी खुल्या करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षा काही महिने रेल्वे सेवा पूर्णपणे टप्प होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्याने आतापर्यंत ७० टक्के रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना सुरूवातीपासून विशेष व उत्सव गाड्यांचा दर्जा दिला आहे. हा दर्जा देतांना जनरल तिकीट बंद ठेवले असून, आरक्षण असणाऱ्या प्रवाशानांच प्रवास करण्याची सक्ती केली आहे. तसेच कोरोनापूर्वी या गाड्यांचे जे तिकीट दर होते, त्याहून काही प्रमाणात जास्त तिकीटाच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसत आहे.

इन्फो :

प्रवासी म्हणतात...

रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षांपासून या गाड्यांना विशेषचा दर्जा देऊन, भरमसाठ तिकीट दर लागू केले आहेत. यामुळे सर्व सामान्य गरिब प्रवाशांनाच आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेषचा दर्जा हटवुन, सर्व सामान्यासांठी या गाड्यांना तिकीट उपलब्ध करून द्यावे, ही प्रवासी म्हणून मागणी आहे.

सुनील येवले, प्रवासी

कोरोना काळात फेस्टीव्हल आणि विशेष गाड्या सुरू असल्या तरी, या गाड्यांना आता प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे रेल्वेला आता प्रचंड उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचा विशेषचा दर्जा हटवुन प्रवाशांची लुट थांबवावी.

योगेश पाटील, प्रवासी

इन्फो :

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

- कोरोना काळात प्रवाशांची रेल्वे गाड्यांना गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच सर्व पॅसेंजर सेवा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे गर्दीवर काहीसे नियंत्रण आहे. तसेच सध्या ज्या फेस्टीव्हल व विशेष गाड्या सुरू आहेत. त्या गाड्यांना गर्दी कमी राहण्यासाठी तिकीट आरक्षण बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांचा रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला आहे.

- या गाड्यांना आरक्षण केल्यामुळे स्थानिक प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे अवघड झाले आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट व मासिक पासही बंद करून ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षणाची सक्ती बंद करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.

इन्फो

तिकीटात २५ ते १०० रूपयांपर्यंत फरक

पूर्वी जळगाव ते चाळीसगाव दरम्यान एक्सप्रेसची सर्व साधारण तिकीट ५० रूपये होते. आता हे तिकीट आरक्षणामध्ये ६५ तर काही गाड्यांना ७५ रूपये आहे. तसेच जळगावहून मुंबईचे तिकीट २५० ते २७५ रूपयांपर्यंत होते. आता हेच तिकीट ३८० ते ४०० रूपयांपर्यंत मिळत आहे.