शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लुट आणखी किती दिवस चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:05 IST

सचिन देव जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने सध्यस्थितीला बहुतांश रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ...

सचिन देव

जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने सध्यस्थितीला बहुतांश रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना कोरोनाच्या नावाखाली फेस्टीव्हल आणि स्पेशल गाड्यांचा दर्जा देऊन, प्रवाशांची अक्षरश: लुट केली जात आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जा आणि त्यातील आरक्षणाची सक्ती बंद करून पूर्वीप्रमाणे या गाड्या सर्व सामान्य प्रवाशांसाठी खुल्या करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षा काही महिने रेल्वे सेवा पूर्णपणे टप्प होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्याने आतापर्यंत ७० टक्के रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना सुरूवातीपासून विशेष व उत्सव गाड्यांचा दर्जा दिला आहे. हा दर्जा देतांना जनरल तिकीट बंद ठेवले असून, आरक्षण असणाऱ्या प्रवाशानांच प्रवास करण्याची सक्ती केली आहे. तसेच कोरोनापूर्वी या गाड्यांचे जे तिकीट दर होते, त्याहून काही प्रमाणात जास्त तिकीटाच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसत आहे.

इन्फो :

प्रवासी म्हणतात...

रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षांपासून या गाड्यांना विशेषचा दर्जा देऊन, भरमसाठ तिकीट दर लागू केले आहेत. यामुळे सर्व सामान्य गरिब प्रवाशांनाच आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेषचा दर्जा हटवुन, सर्व सामान्यासांठी या गाड्यांना तिकीट उपलब्ध करून द्यावे, ही प्रवासी म्हणून मागणी आहे.

सुनील येवले, प्रवासी

कोरोना काळात फेस्टीव्हल आणि विशेष गाड्या सुरू असल्या तरी, या गाड्यांना आता प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे रेल्वेला आता प्रचंड उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचा विशेषचा दर्जा हटवुन प्रवाशांची लुट थांबवावी.

योगेश पाटील, प्रवासी

इन्फो :

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

- कोरोना काळात प्रवाशांची रेल्वे गाड्यांना गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच सर्व पॅसेंजर सेवा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे गर्दीवर काहीसे नियंत्रण आहे. तसेच सध्या ज्या फेस्टीव्हल व विशेष गाड्या सुरू आहेत. त्या गाड्यांना गर्दी कमी राहण्यासाठी तिकीट आरक्षण बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांचा रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला आहे.

- या गाड्यांना आरक्षण केल्यामुळे स्थानिक प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे अवघड झाले आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट व मासिक पासही बंद करून ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षणाची सक्ती बंद करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.

इन्फो

तिकीटात २५ ते १०० रूपयांपर्यंत फरक

पूर्वी जळगाव ते चाळीसगाव दरम्यान एक्सप्रेसची सर्व साधारण तिकीट ५० रूपये होते. आता हे तिकीट आरक्षणामध्ये ६५ तर काही गाड्यांना ७५ रूपये आहे. तसेच जळगावहून मुंबईचे तिकीट २५० ते २७५ रूपयांपर्यंत होते. आता हेच तिकीट ३८० ते ४०० रूपयांपर्यंत मिळत आहे.