शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा न घेताच मूल्यमापन कसे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST

चाळीसगाव विद्यार्थी - शिक्षक, पालक आणि संस्थाचालकांचा सूर लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगावः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गत ...

चाळीसगाव विद्यार्थी - शिक्षक, पालक आणि संस्थाचालकांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगावः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गत महिन्यात इयत्ता १० वीप्रमाणेच १२ वीचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गुरुवारी मान्यतेची मोहोर उमटलीही आहे. परीक्षा रद्द झाली तरी काही प्रश्न मात्र अनुत्तरीतच

आहेत. परीक्षा न घेता मूल्यमापन कसे केले जाईल. पुढील प्रवेश कसे होणार. असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी - पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्यामधून उपस्थित होत आहे.

गुरुवारी या पार्श्वभूमीवर 'लोकमत' साधलेल्या संवादातूनही हाच सूर उमटला.

कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. तिसऱ्या लाटेच्या घंटा वाजविल्या जात आहे. याचबरोबर १२ वीच्या परीक्षेचाही प्रश्न ऐरणीवर होता. परीक्षा रद्द झाल्याने पुढील पदवी परीक्षेसाठी प्रवेश कसे द्यायचे? गुणदान कसे करायचे? अशा प्रश्नांना आता तोंड फुटले आहे. परीक्षा रद्द झाली असली तरी मूल्यमापन, गुणदान, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश याविषयी स्पष्टपणे सूचना येत नाही तोवर ही चर्चा सुरूच राहणार आहे.

...........

महत्त्वाची चौकट

जिल्ह्यात १२ वीच्या ४९ हजार विद्यार्थ्यांना दिलासा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नाशिक येथील परीक्षा मंडळाकडे १२वीच्या परीक्षेसाठी

एकूण ४९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. जवळपास अर्धा लाख विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

१...यावर्षी जिल्ह्यातून इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी ५८ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे या ५८ हजार विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. आता १२ वीचीही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

.......

* पुढील धोरणही जाहीर करावे

कोरोनाच्या रौद्र काळात १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. पुढील प्रवेशाचे धोरणही जाहीर करावे. म्हणजे गोंधळाची स्थिती दूर होईल. १२ वीची परीक्षा घेणे संस्थाचालकांच्या दृष्टीने जोखमीचेच ठरले असते.

- योगेश रमेशचंद्र अग्रवाल, संचालक, चाळीसगाव एज्यु. सोसायटी.

.........

* प्रवेश परीक्षा अनिवार्य

१२ वीची परीक्षा रद्द झाली आहे. चांगला निर्णय आहे. ही परीक्षा रद्द झाली तरी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य करता येईल. परीक्षा घेऊनच या अभ्यासक्रमांना प्रवेश देणे. योग्य होईल.

- अशोक खलाणे, सचिव, म. फुले शिक्षण मंडळ चाळीसगाव.

...........

* परीक्षा हवीच होती

१२ वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात टर्निंग पाईंट असतो. या टप्प्यावर त्याचे समग्र मूल्यमापन होणे अत्यावश्यक असते. या इयत्तेनंतर उच्च शिक्षणाचे दरवाजेही उघडतात. त्यामुळे परिक्षा होऊन मूल्यमापन होणे गरजेचे होते.

कोरोना काळातील योग्य निर्णय म्हणावा लागेल.

- डॉ. एस. आर. जाधव, प्राचार्य, य.ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव.

........

* मूल्यांकन होणेही महत्त्वाचे

कोरोनाची स्थिती भयावह आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून लेखी परीक्षा घेणे उचित ठरले नसते. यादृष्टीने या निर्णयाकडे पहावे लागेल. मूल्यांकन कसे केले जाते. हेही महत्त्वाचे आहे.

- डॉ. मिलिंद बिल्दीकर

प्राचार्य, चाळीसगाव महाविद्यालय

.........

* विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता महत्त्वाची

एका शैक्षणिक टप्प्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. तथापि कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. परीक्षेसाठी झालेली गर्दी त्याला निमंत्रण देणारी ठरू शकली असती. शासनाने हे टाळले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार प्राधान्याने केला आहे.

निर्णयाचे स्वागत आहे.

प्रा. वैशाली नितीन पाटील, के.आर. कोतकर ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव.

........

* मोठे संक्रमण टळले

विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊनच १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाच्या लाटेत परीक्षा घेणे संयुक्तिक ठरले नसते. आत्ता कुठे बाधितांची संख्या आटोक्यात येऊ लागली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी एकत्र आले असते तर साथ रोगाचे संक्रमण वाढण्याला मदतच होणार होती. योग्य पर्याय निवडला शासनाने.

- प्रा. संजय घोडेस्वार

राष्ट्रीय ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव.

.........

* परीक्षा घेणेच योग्य होते

कोरोनाचा धोका आहेच. मात्र त्याबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्याचे मूल्यमापन होणे महत्वाचे आहे. त्यासाठी परिक्षा रद्द न करता इतर पर्याय वापरुन निर्णय घेणे योग्य झाले असते. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वापरुन परिक्षा घेणे शक्य होते. आपण परिक्षा न देता उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात तयार होऊ शकतो.

- प्रा. बी. आर. येवले

के.आर.कोतकर ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव

.........

* परीक्षेमुळे आत्मविश्वास वाढतो

विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत पाठवितांना मागील वर्गात त्याने कितपत कौशल्य मिळविले. हे तपासणे म्हणजेच परीक्षा घेणे. वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी परीक्षा घ्यायलाच हवी होती. अर्थात शासनाने सर्व घटक व परिस्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे, असे वाटते. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास वाढीस लागतो.

- प्रशांत मदन जोशी

पालक, चाळीसगाव.

......

* विद्यार्थी हिताचा निर्णय

१२ वीची परीक्षा होणार? की नाही होणार? या मोठ्या प्रश्नातून सुटका झाल्यासारखे वाटते आहे. परीक्षा रद्द करणे. हा विद्यार्थी हिताचा निर्णय आहे. आता पुढील दिशा ठरवणे सोपे होणार? आहे. वर्षभरापासून कोरोनामुळे अडचणींचा सामना करून अभ्यास केला. परीक्षा घेण्याची वेळही निघून गेली होती. संक्रमणाचा धोका वाढला असून कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे.

- साहिल रवींद्र खैरे, इयत्ता १२ वी, जयहिंद विद्यालय, चाळीसगाव.

.......

* परीक्षा द्यायला आवडले असते

आम्ही वर्षभर ऑनलाइन आणि ऑफलाइनही जीव तोडून अभ्यास केला आहे. पदवी परीक्षेसाठीदेखील १२ वीची परीक्षा मेरीट की ठरते. त्यामुळे परीक्षा द्यायला आवडले असते. मूल्यमापन कसे होईल. सरसकट निर्णयामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.

- वैष्णवी नामदेव जाधव, इयत्ता १२ वी, के.आर.कोतकर ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव.

........

* असे आहेत निष्कर्ष

# व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश कसे देणार? ही अनिश्चितता परीक्षा रद्दच्या

निर्णयानंतरही कायम आहे.

# परीक्षेसंबंधी निर्णय घेण्यास राज्य शासनाने बराच उशीर केला.

# यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला.

# परीक्षा रद्द झाली. तथापि, गुणदान कसे करणार ? याबाबत स्पष्टता नाही.

# इयत्ता नववी, दहावी, अकरावीच्या गुणांची सरासरी काढून १२ वीचा निकाल देण्याचा पर्याय आहे.

# गेल्या वर्षी मात्र ११ वीची परिक्षा झालेली नाही.

# ग्रामीण भागातील ऑनलाईन अभ्यासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

..............

महत्वाची चौकट

चाळीसगावच्या कोतकर कॉलेजने घेतली ११ वीची परीक्षा चाळीसगाव एज्यु. सोसायटीच्या के.आर.कोतकर कॉलेजने इयत्ता ११वीची परीक्षा

नुकतीच ऑनलाइन पद्धतीने घेतली. यात प्रविष्ट असणाऱ्या ६७० पैकी ६०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. याविद्यार्थ्यांच्या निकाल तयार करण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. यावरून विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्याकडे स्पष्ट कल दिसून येतो, अशी माहिती प्रा. बी.आर.येलले यांनी दिली.