शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

रात्रीच्या संचारबंदीत दंगल झालीच कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

शनिवारी रात्री १० वाजेपासून वादाला सुरुवात झाली, त्याचा शेवट रात्री १ वाजता झाला. तब्बल तीन तास फातेमा नगर व ...

शनिवारी रात्री १० वाजेपासून वादाला सुरुवात झाली, त्याचा शेवट रात्री १ वाजता झाला. तब्बल तीन तास फातेमा नगर व एमआयडीसीतील कंपनीत हा धिंगाणा सुरू होता. बॅट, रॉडसारख्या हत्यारांचा वापर झाला. गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती, अर्थात खरेच गोळीबार झाला की अफवाच होती, हा देखील संशोधनाचाच भाग आहे. शहरात खेळण्यासारखे सहज शस्त्र उपलब्ध होत असल्याने गोळीबार नवीन नाही, असो पण यानिमित्ताने खरा प्रश्न निर्माण होत आहे तो संचारबंदीच्या अंमलबजावणीचा. मनपा व पोलीस या दोन्ही यंत्रणा खरोखर आपले कर्तव्य पार पाडत आहेत का? पाडत असतील तर मग रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या या लोकांना कोणी हटकले नाही का, की गस्त नव्हतीच? यासारखे प्रश्न जळगावकरांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत.

अधिकाऱ्यांची धडपड; पण यंत्रणा कामचुकार

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांची प्रचंड धडपड सुरू आहे. प्रशासनाकडून रोज नवनवीन आदेश काढले जात आहेत. त्याचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे तर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस व मनपावर सोपविण्यात आली आहे. तीन दिवस पूर्णपणे आस्थापना बंद राहिल्या, हा जनता कर्फ्यू असल्याने नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला, मात्र संचारबंदीत अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई होणेचे अपेक्षित असताना पोलीस किंवा मनपाकडून कारवाया होताना दिसत नाही. रात्रीची नाकाबंदी व गस्तही दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी दोन गटात दंगल झाली.