शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रात्रीच्या संचारबंदीत दंगल झालीच कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

शनिवारी रात्री १० वाजेपासून वादाला सुरुवात झाली, त्याचा शेवट रात्री १ वाजता झाला. तब्बल तीन तास फातेमा नगर व ...

शनिवारी रात्री १० वाजेपासून वादाला सुरुवात झाली, त्याचा शेवट रात्री १ वाजता झाला. तब्बल तीन तास फातेमा नगर व एमआयडीसीतील कंपनीत हा धिंगाणा सुरू होता. बॅट, रॉडसारख्या हत्यारांचा वापर झाला. गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती, अर्थात खरेच गोळीबार झाला की अफवाच होती, हा देखील संशोधनाचाच भाग आहे. शहरात खेळण्यासारखे सहज शस्त्र उपलब्ध होत असल्याने गोळीबार नवीन नाही, असो पण यानिमित्ताने खरा प्रश्न निर्माण होत आहे तो संचारबंदीच्या अंमलबजावणीचा. मनपा व पोलीस या दोन्ही यंत्रणा खरोखर आपले कर्तव्य पार पाडत आहेत का? पाडत असतील तर मग रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या या लोकांना कोणी हटकले नाही का, की गस्त नव्हतीच? यासारखे प्रश्न जळगावकरांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत.

अधिकाऱ्यांची धडपड; पण यंत्रणा कामचुकार

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांची प्रचंड धडपड सुरू आहे. प्रशासनाकडून रोज नवनवीन आदेश काढले जात आहेत. त्याचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे तर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस व मनपावर सोपविण्यात आली आहे. तीन दिवस पूर्णपणे आस्थापना बंद राहिल्या, हा जनता कर्फ्यू असल्याने नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला, मात्र संचारबंदीत अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई होणेचे अपेक्षित असताना पोलीस किंवा मनपाकडून कारवाया होताना दिसत नाही. रात्रीची नाकाबंदी व गस्तही दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी दोन गटात दंगल झाली.