शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये पोळ्या-भाकरी करण्यासाठी जाणाऱ्या महिलांचा रोजगार थांबला आहे. इतकेच काय या महिलांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचाही पोटाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लॉकडाऊन किंवा उद्योग धंदे बंद करणे हा पर्याय सरकारने अवलंबू नये असे मत हॉटेलमध्ये पोळी, भाजी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले. जळगाव शहरात ७० बियरबार तर ६० रेस्टॉरंट हॉटेल आहेत जवळपास १३० हॉटेलमध्ये प्रत्येकी दोन महिला चपाती,भाकरी तर एक महिला भांडी घासण्याचे काम करते. आता या सर्वच महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील या महिलांचा आकडा ४९० च्या घरात आहे. एका महिलेवर किमान तीन जण अवलंबून आहेत. जवळपास दीड हजाराच्यावर लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये सर्व पदार्थ बनविण्यासाठी कूक असले तरी पोळी किंवा भाकरी करण्यासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये काही महिला येत असतात. काही शहरांत घरातूनच पोळी-भाकरी करून हॉटेल्सना पुरविले जाते. आता आजपासून हे देखील थांबणार आहे.

-शहरातील हॉटेल्सची संख्या -१३०

-या हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची संख्या -४९०

२) हॉटेलमध्ये पोळी-भाकरी करून कुटुंब चालविणाऱ्या तीन महिलांची प्रतिक्रिया.

कोट...

मागील वर्षी परिस्थिती अत्यंत वाईट होती. हाॅटेल बंद, इतर उद्योग बंद त्यामुळे रोजगार बंद होता. दोन वेळचे जेवण मिळणेही अवघड होते. सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे काही दिवसांची सोय झाली होती. सरकारने गरीबांच्या रोजीरोटीचा विचार करावा.

- लता अरुण भावसार, तुकारामवाडी

कोट...

कोरोनामुळे सर्वात जास्त हातावर पोट असलेल्या गरिबांचे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी आमचे खूप हाल झाले. आताही सरकारने हॉटेल बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता देखील आमचा रोजगार जाणार आहे. कमवू तरच खाऊ, नाहीतर उपाशी राहू अशी आमच्या गरिबांची स्थिती आहे.

- कुसुम एकनाथ कोळी, रा.असोदा

कोट....

कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद ठेवला तरी इतर व्यवसाय किंवा उद्योगात आम्हाला कोणीही कामाला लावत नाही. परिणामी सर्वच ठिकाणी रोजीरोटी चालते गेल्यावर्षी चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. दानशुर लोकांनी दिलेल्या धान्यामुळे मोठी मदत झाली. यंदा मदतीचेही हात थांबले आहेत.

-संगीता शांताराम काकडे, रा. तानाजी मालुसरे नगर

वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक !

गेल्या वर्षाप्रमाणे सरकारने आताही लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे आतादेखील गरिबांच्या पोटावर मारले जात आहे.गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती होती. तेव्हा चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. सामाजिक संघटना झोपडपट्टी भागात जेवण वाटप करायच्या त्या ठिकाणी अक्षरशः रांगेत थांबून जेवण मिळवावे लागले. अशी वेळ कधीच आली नव्हती, ते वर्ष कसे काढले ते आम्हालाच ठाऊक. सण, उत्सव तर नशिबात नव्हताच. व्याजानेही कुणी पैसे द्यायला तयार होत नव्हते, अशी परिस्थिती होती. सध्याचे चित्र पाहता यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी भीती हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांना वाटू लागली आहे. सरकारने गरिबांच्या पोटाचा विचार करून निर्णय घ्यावा अशीही अपेक्षा या महिलांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.