शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये पोळ्या-भाकरी करण्यासाठी जाणाऱ्या महिलांचा रोजगार थांबला आहे. इतकेच काय या महिलांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचाही पोटाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लॉकडाऊन किंवा उद्योग धंदे बंद करणे हा पर्याय सरकारने अवलंबू नये असे मत हॉटेलमध्ये पोळी, भाजी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले. जळगाव शहरात ७० बियरबार तर ६० रेस्टॉरंट हॉटेल आहेत जवळपास १३० हॉटेलमध्ये प्रत्येकी दोन महिला चपाती,भाकरी तर एक महिला भांडी घासण्याचे काम करते. आता या सर्वच महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील या महिलांचा आकडा ४९० च्या घरात आहे. एका महिलेवर किमान तीन जण अवलंबून आहेत. जवळपास दीड हजाराच्यावर लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये सर्व पदार्थ बनविण्यासाठी कूक असले तरी पोळी किंवा भाकरी करण्यासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये काही महिला येत असतात. काही शहरांत घरातूनच पोळी-भाकरी करून हॉटेल्सना पुरविले जाते. आता आजपासून हे देखील थांबणार आहे.

-शहरातील हॉटेल्सची संख्या -१३०

-या हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची संख्या -४९०

२) हॉटेलमध्ये पोळी-भाकरी करून कुटुंब चालविणाऱ्या तीन महिलांची प्रतिक्रिया.

कोट...

मागील वर्षी परिस्थिती अत्यंत वाईट होती. हाॅटेल बंद, इतर उद्योग बंद त्यामुळे रोजगार बंद होता. दोन वेळचे जेवण मिळणेही अवघड होते. सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे काही दिवसांची सोय झाली होती. सरकारने गरीबांच्या रोजीरोटीचा विचार करावा.

- लता अरुण भावसार, तुकारामवाडी

कोट...

कोरोनामुळे सर्वात जास्त हातावर पोट असलेल्या गरिबांचे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी आमचे खूप हाल झाले. आताही सरकारने हॉटेल बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता देखील आमचा रोजगार जाणार आहे. कमवू तरच खाऊ, नाहीतर उपाशी राहू अशी आमच्या गरिबांची स्थिती आहे.

- कुसुम एकनाथ कोळी, रा.असोदा

कोट....

कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद ठेवला तरी इतर व्यवसाय किंवा उद्योगात आम्हाला कोणीही कामाला लावत नाही. परिणामी सर्वच ठिकाणी रोजीरोटी चालते गेल्यावर्षी चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. दानशुर लोकांनी दिलेल्या धान्यामुळे मोठी मदत झाली. यंदा मदतीचेही हात थांबले आहेत.

-संगीता शांताराम काकडे, रा. तानाजी मालुसरे नगर

वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक !

गेल्या वर्षाप्रमाणे सरकारने आताही लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे आतादेखील गरिबांच्या पोटावर मारले जात आहे.गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती होती. तेव्हा चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. सामाजिक संघटना झोपडपट्टी भागात जेवण वाटप करायच्या त्या ठिकाणी अक्षरशः रांगेत थांबून जेवण मिळवावे लागले. अशी वेळ कधीच आली नव्हती, ते वर्ष कसे काढले ते आम्हालाच ठाऊक. सण, उत्सव तर नशिबात नव्हताच. व्याजानेही कुणी पैसे द्यायला तयार होत नव्हते, अशी परिस्थिती होती. सध्याचे चित्र पाहता यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी भीती हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांना वाटू लागली आहे. सरकारने गरिबांच्या पोटाचा विचार करून निर्णय घ्यावा अशीही अपेक्षा या महिलांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.