शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये पोळ्या-भाकरी करण्यासाठी जाणाऱ्या महिलांचा रोजगार थांबला आहे. इतकेच काय या महिलांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचाही पोटाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लॉकडाऊन किंवा उद्योग धंदे बंद करणे हा पर्याय सरकारने अवलंबू नये असे मत हॉटेलमध्ये पोळी, भाजी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले. जळगाव शहरात ७० बियरबार तर ६० रेस्टॉरंट हॉटेल आहेत जवळपास १३० हॉटेलमध्ये प्रत्येकी दोन महिला चपाती,भाकरी तर एक महिला भांडी घासण्याचे काम करते. आता या सर्वच महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील या महिलांचा आकडा ४९० च्या घरात आहे. एका महिलेवर किमान तीन जण अवलंबून आहेत. जवळपास दीड हजाराच्यावर लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये सर्व पदार्थ बनविण्यासाठी कूक असले तरी पोळी किंवा भाकरी करण्यासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये काही महिला येत असतात. काही शहरांत घरातूनच पोळी-भाकरी करून हॉटेल्सना पुरविले जाते. आता आजपासून हे देखील थांबणार आहे.

-शहरातील हॉटेल्सची संख्या -१३०

-या हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची संख्या -४९०

२) हॉटेलमध्ये पोळी-भाकरी करून कुटुंब चालविणाऱ्या तीन महिलांची प्रतिक्रिया.

कोट...

मागील वर्षी परिस्थिती अत्यंत वाईट होती. हाॅटेल बंद, इतर उद्योग बंद त्यामुळे रोजगार बंद होता. दोन वेळचे जेवण मिळणेही अवघड होते. सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे काही दिवसांची सोय झाली होती. सरकारने गरीबांच्या रोजीरोटीचा विचार करावा.

- लता अरुण भावसार, तुकारामवाडी

कोट...

कोरोनामुळे सर्वात जास्त हातावर पोट असलेल्या गरिबांचे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी आमचे खूप हाल झाले. आताही सरकारने हॉटेल बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता देखील आमचा रोजगार जाणार आहे. कमवू तरच खाऊ, नाहीतर उपाशी राहू अशी आमच्या गरिबांची स्थिती आहे.

- कुसुम एकनाथ कोळी, रा.असोदा

कोट....

कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद ठेवला तरी इतर व्यवसाय किंवा उद्योगात आम्हाला कोणीही कामाला लावत नाही. परिणामी सर्वच ठिकाणी रोजीरोटी चालते गेल्यावर्षी चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. दानशुर लोकांनी दिलेल्या धान्यामुळे मोठी मदत झाली. यंदा मदतीचेही हात थांबले आहेत.

-संगीता शांताराम काकडे, रा. तानाजी मालुसरे नगर

वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक !

गेल्या वर्षाप्रमाणे सरकारने आताही लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे आतादेखील गरिबांच्या पोटावर मारले जात आहे.गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती होती. तेव्हा चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. सामाजिक संघटना झोपडपट्टी भागात जेवण वाटप करायच्या त्या ठिकाणी अक्षरशः रांगेत थांबून जेवण मिळवावे लागले. अशी वेळ कधीच आली नव्हती, ते वर्ष कसे काढले ते आम्हालाच ठाऊक. सण, उत्सव तर नशिबात नव्हताच. व्याजानेही कुणी पैसे द्यायला तयार होत नव्हते, अशी परिस्थिती होती. सध्याचे चित्र पाहता यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी भीती हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांना वाटू लागली आहे. सरकारने गरिबांच्या पोटाचा विचार करून निर्णय घ्यावा अशीही अपेक्षा या महिलांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.