शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये पोळ्या-भाकरी करण्यासाठी जाणाऱ्या महिलांचा रोजगार थांबला आहे. इतकेच काय या महिलांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचाही पोटाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लॉकडाऊन किंवा उद्योग धंदे बंद करणे हा पर्याय सरकारने अवलंबू नये असे मत हॉटेलमध्ये पोळी, भाजी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले. जळगाव शहरात ७० बियरबार तर ६० रेस्टॉरंट हॉटेल आहेत जवळपास १३० हॉटेलमध्ये प्रत्येकी दोन महिला चपाती,भाकरी तर एक महिला भांडी घासण्याचे काम करते. आता या सर्वच महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील या महिलांचा आकडा ४९० च्या घरात आहे. एका महिलेवर किमान तीन जण अवलंबून आहेत. जवळपास दीड हजाराच्यावर लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये सर्व पदार्थ बनविण्यासाठी कूक असले तरी पोळी किंवा भाकरी करण्यासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये काही महिला येत असतात. काही शहरांत घरातूनच पोळी-भाकरी करून हॉटेल्सना पुरविले जाते. आता आजपासून हे देखील थांबणार आहे.

-शहरातील हॉटेल्सची संख्या -१३०

-या हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची संख्या -४९०

२) हॉटेलमध्ये पोळी-भाकरी करून कुटुंब चालविणाऱ्या तीन महिलांची प्रतिक्रिया.

कोट...

मागील वर्षी परिस्थिती अत्यंत वाईट होती. हाॅटेल बंद, इतर उद्योग बंद त्यामुळे रोजगार बंद होता. दोन वेळचे जेवण मिळणेही अवघड होते. सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे काही दिवसांची सोय झाली होती. सरकारने गरीबांच्या रोजीरोटीचा विचार करावा.

- लता अरुण भावसार, तुकारामवाडी

कोट...

कोरोनामुळे सर्वात जास्त हातावर पोट असलेल्या गरिबांचे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी आमचे खूप हाल झाले. आताही सरकारने हॉटेल बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता देखील आमचा रोजगार जाणार आहे. कमवू तरच खाऊ, नाहीतर उपाशी राहू अशी आमच्या गरिबांची स्थिती आहे.

- कुसुम एकनाथ कोळी, रा.असोदा

कोट....

कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद ठेवला तरी इतर व्यवसाय किंवा उद्योगात आम्हाला कोणीही कामाला लावत नाही. परिणामी सर्वच ठिकाणी रोजीरोटी चालते गेल्यावर्षी चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. दानशुर लोकांनी दिलेल्या धान्यामुळे मोठी मदत झाली. यंदा मदतीचेही हात थांबले आहेत.

-संगीता शांताराम काकडे, रा. तानाजी मालुसरे नगर

वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक !

गेल्या वर्षाप्रमाणे सरकारने आताही लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे आतादेखील गरिबांच्या पोटावर मारले जात आहे.गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती होती. तेव्हा चटणी-भाकरी खाऊन दिवस काढले. सामाजिक संघटना झोपडपट्टी भागात जेवण वाटप करायच्या त्या ठिकाणी अक्षरशः रांगेत थांबून जेवण मिळवावे लागले. अशी वेळ कधीच आली नव्हती, ते वर्ष कसे काढले ते आम्हालाच ठाऊक. सण, उत्सव तर नशिबात नव्हताच. व्याजानेही कुणी पैसे द्यायला तयार होत नव्हते, अशी परिस्थिती होती. सध्याचे चित्र पाहता यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी भीती हॉटेलमध्ये पोळी-भाजी करणाऱ्या महिलांना वाटू लागली आहे. सरकारने गरिबांच्या पोटाचा विचार करून निर्णय घ्यावा अशीही अपेक्षा या महिलांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.