शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘नली : एक अव्यक्त विरहिणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:50 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये शरद धनगर यांनी, परिवर्तन निर्मित नली या एकल नाट्यकृतीचा घेतलेला आढावा.

आज मराठी रंगभूमीवर जुनं ते सोनं या युक्तीने जुनी नाटकं नवीन साज लेवून आपल्या भेटीस येत असतानाच ‘संगीत देवबाभळी’ आणि ‘हॅम्लेट’सारखी नाट्यकृती आपलं वेगळंपण घेऊन येत आहेत. याच नावीन्यपूर्ण आणि प्रयोगशील परंपरेला पुढं नेण्याचं काम खान्देशी नाट्यसृष्टीही करताना दिसते. ‘परिवर्तन जळगाव’चे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील आणि त्यांची टीम खान्देशी नाट्यक्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करत असतात, त्यातलीच एक कलाकृती म्हणजे ‘नली’.‘परिवर्तन जळगाव’निर्मित ‘नली’ ही एकल नाट्यकृती नुसती पाहायची नाही, तर अनुभवायची गोष्ट आहे. लेखक ‘श्रीकांत देशमुख’ लिखित ‘पडझड वाऱ्याच्या ‘भिंती’ या पुस्तकातील ‘नलिनी देवराव’ या व्यक्तीचित्रावर आधारित हा एकल नाट्यप्रयोग सर्वांगाने परिपूर्ण अशी कलाकृती आहे. ‘नली’ नावाचं हे पात्र महाराष्ट्रातील तमाम सोशित, पीडित ग्रामीण स्त्रियांचं प्रातिनिधिक रूप आहे.साधारणत: १९७०च्या दशकातली ही कथा आहे.‘नली’ म्हणजे सतत खळखळत, हसत, बागळत राहणाºया निर्झर झºयासारखी निर्मळ मुलगी. ‘बाळू’ आणि ‘नली’च्या उत्कट पण अव्यक्त प्रेमाची ही कहाणी. इयत्ता चौथीतली ही मैत्री खूप अल्लड पण तितकीच घट्ट आणि निष्पाप...ढे सातवीत येईपर्यंत बाळूच्या मनात ‘नली’विषयी अंकुरणार प्रेम... नलीचं चौथी नापास होणं, त्यातून होणारी त्यांची ताटातूट......नलीचं चौथीत नापास झाल्यावर अल्लड, निरागस पोरीतून एका बाईत होणारं परिवर्तन माणसाला अंतर्मुख करतं. तिच्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात होणारे बदल हे मनाच्या तळाशी खोलवर चटके देऊन जातं आणि बेमालूमपणे प्रेक्षकांच्या डोळ्यात अलगद पाणी आणतं. बाळू गरीब कुटुंबातील कौटुंबिक जाणीव असलेला हुशार होतकरू युवक.शहरात जाऊन त्याचं शिक्षण घेणं. त्याच्या मनात नलीचं प्रेम तसूभरही कमी न होता उलट वृद्धिंगत होत जाणं. सुट्टीत गावी आल्यावर नलीला भेटण्यासाठी त्याची धडपड. असं सगळं होत असताना बाळूला नोकरी लागण. बाळूला आपलं मनातलं प्रेम व्यक्त करण्याची संधी असूनदेखील तो त्याला ते व्यक्त करता न येणं पुढे या भेटीची गावात होणारी चर्चा नलीची होणारी बदनामी व त्यातून एक दिवस अचानक गावातल्या एका स्वजातीय अशिक्षित व्यसनी मुलाशी नली लग्न होणं. येथूनच नलीचा खरा सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक संघर्ष सुरू होतो. शेती मातीत मोलमजुरी करून आपलं व आपल्या व्यसनी नवºयाचं पोट भरत गरिबीत जगणारी नली आपलं दु:ख, कुचंबना, कोंडमारा, हेळसांड, समाजाकडून होणारे चारित्र्यहनन, बदनामीविषयी कुठेच व्यक्त होत नाही आणि इथेच नलीविषयी वाटणारी सहानुभूती प्रेक्षक आपल्या वाहणाºया अश्रूतून व्यक्त करतो. शेवटी नली आत्महत्येसारखा मार्ग निवडते. नली आत्महत्या का करते? तिचं काय चुकलं?बाळूने त्याचं प्रेम व्यक्त केलं असतं तर हे टाळता आलं असतं का? नलीच्या आत्महत्येचा खरा दोषी कोण? सामाजिक परिस्थिती, बाळू की गरिबी? अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेत आपले डबडबले डोळे पुसत प्रेक्षक सभागृहाबाहेर पडतात. नाटकाच्या इतर बाबी सांगायच्या झाल्यास नाटकाचं पार्श्वसंगीत प्रसंगांना साजेसं आहे. नेपथ्य प्रकाशयोजनेचा अचूक जागी वापर केला आहे.योगेश पाटील या तरुण दिग्दर्शकाने आपलं काम चोख बजावलंय. एका व्यक्तीचित्रणाचं माध्यमांत एकल प्रयोगात इतक्या चपखल पद्धतीने केला आहे की, प्रेक्षक या नाट्यकृतीशी इतका एकरूप होऊन जातो की, तो स्वत:ला त्यातला एक भाग मानायला लागतो आणि याचं श्रेय दिग्दर्शक योगेश पाटीलबरोबरच हर्षल पाटील या तरुण नाट्यअभिनेत्याला विभागून देता येईल.हर्षल पाटील यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा व संवादाचा अचूक मेळ साधत नली आणि बाळू सोबत सगळीच पात्र म्हणजे अगदी बाळूचे मित्र, शाळेतला मास्तर, मारोतीच्या देवळात निरागस पोरींना प्रवेश नाकारणारा मसाजी देशमुखच्या रूपाने पुराणमतवादी वृत्तीचा मसाजी देशमुख इत्यादी पात्र अचूक उभी केलेली आहेत. ही नाट्यकृती पाहताना शालेय जीवनातील आपापल्या ‘नली’ आणि ‘बाळू’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अहिराणी व तावडी बोली भाषेतील संवाद खूपच परिणामकारक आहेत.आपल्या खान्देशी बोली भाषेचा लेहेजा, खान्देशी संस्कृती, परंपरा, म्हणी याचा गंधही या कलाकृतीच्या निमित्ताने अनुभवता येतो. एकपात्री आणि एकल यातला महत्त्वाचा फरक म्हणजे एकपात्री ही स्टेजवर एका जागी उभं राहून केला जातो व त्यात मिमिक्रीचा उपयोग करून एकच व्यक्ती सर्व व्यक्तीरेखा सादर करतो.मात्र एकल नाट्यप्रयोगात एकच व्यक्ती सर्वच व्यक्तीरेखा आपल्या अभिनय कौशल्य, शारीरिक हालचाली आणि संवाद यातून जिवंत करण्याचं काम करत असतो आणि हर्षल पाटील यांनी त्यांच्या अभिनयाने तो माहोल निर्माण केलाय.खान्देशची नाट्यपरंपरा फार पुरातन आहे. जळगावची परिवर्तन ही संस्था व शंभू पाटील आपल्या परीने ही नाट्य चळवळ जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. आज खान्देशातील अनेक शहरात प्रशस्त नाट्यगृह उभारली आहेत पण तेथे एकही नाटक सादर होताना दिसत नाही. खान्देशी नाट्य चळवळीला पुन्हा चांगले दिवस आणायचे असतील तर खान्देशातील राजकीय नेते, नाट्य व सामाजिक संस्था तसेच बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने योग्य दिशेने पावले उचलाय हवी.केवळ विद्यापिठात अभ्यासक्रम सुरू करून चालणार नाही तर नाट्य कार्यशाळा, एकल, एकपात्री, नाट्यस्पर्धा, अभिवाचन स्पर्धांचं आयोजन केले पाहिजे.