शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

आशा कर्मचाऱ्यांना मानधनवाढ मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:52 IST

चोपडा : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आशा गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा प्रश्न शासनाने सोडवावा, अशी मागणी आशा गटप्रवर्तकांनी ...

चोपडा : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आशा गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा प्रश्न शासनाने सोडवावा, अशी मागणी आशा गटप्रवर्तकांनी केली आहे. यासह इतर मागण्यांसाठी तहसीलदारांना २ रोजी निवेदन सादर करण्यात आले.येथे २ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयावर सकाळी ११ वाजता आशा कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष, कामगार नेते अमृतराव महाजन उपस्थित होते. नायब तहसीलदार राजेश पऊळ यांना १७ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ‘आशां’ना तेलंगणा राज्याप्रमाणे किमान १० हजार रुपये मानधन व किमान ६ हजार पेन्शन द्यावे. मानधनवाढीचा रखडलेला आदेश काढावा. एकछत्री योजना अमलात आणावी, १२०० रुपये स्टेशनरी खर्च मिळावा तसेच मे महिन्यापासूनचा थकीत मोबदला द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे पदाधिकारी अमृतराव महाजन यांच्यासह शैला परदेशी, मीनाक्षी सोनवणे, संगिता पाटील, मनिषा पाटील, संजना विसावे, पल्लवी सोनवणे, अनिति पाटील, कल्पना महाले, ललिता भादले, योगिता कोळी, रेखा पाटील, वनिता मोरे, शितल पाटील, संगिता पाटील, ज्योती चित्रकथी, संजना विसावे, आदींनी केले आहे.