शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

लोणीला संतप्त महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:24 IST

पाणी टंचाई : ग्रा. पं. कार्यालयाच्या ओट्यावर मांडला ठिय्या

बिडगाव, ता. चोपडा : एकीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गंभीर पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. मात्र लोणी ता.चोपडा येथे पाणी उपलब्ध असतांनाही निव्वळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्यांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने बुधवारी संतप्त थेट हंडा मोर्चा काढत ग्राम पंचायतीच्या ओट्यावर हंड्यांसह ठिय्या मांडला होता.लोणी हे अवघ्या सोळाशे लोकसंख्येचे गाव आहे. गावात सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी तब्बल चार ट्युबवेल्स आहेत.मात्र ग्रामपंचायतीच्या गचाळ कारभारामुळे एक ट्यूबवेल नादुरुस्त होऊन पडली आहे. एक जळाली आहे. तर केवळ दोन सुरू आहेत. बिघाड झालेल्या ट्यूृबवेल्स दुरूस्त करण्याची तसदी ग्रामपंचायत घेत नाही. दोन ट्यूबवेल्सच्या आहे त्या पाण्याचेही नियोजन नाही. त्यामुळे गावातील अनेक भागात गेल्या आठ- दहा दिवसापासुन पाणीच मिळत नाही. तर अनेक ठिकाणी मिळते ते पाणीही गढुळ व दुषित मिळत आहे. याबाबत ग्रामस्यांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करून उपयोग होत नसल्याने वैताग येऊन त्याचा उद्रेक झाला व संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ग्रामसेवक मणिषा महाजन व सरपंच सत्तार तडवी यांच्या समोरच ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या ओट्यावरच हंडे घेऊन धडक दिली.यावेळी तडवी वाडा, मारूती चौक व प्लॉट भागात पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. तर आमच्याकडे होणारा पाणीपुरवठा अतिशय दुषित होत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, त्याबाबत अनेक वेळा सरपंच, ग्रामसेवकाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे कमलेश युवराज पाटील यांनी सांगीतले. अनेक ठिकाणी लिकेज असुन गटारीचे पाणी नळांमध्ये येत असल्याचे धक्कादायक वास्तवही ग्रामस्थांनी यावेळी मांडले.येथे गेल्या काही वषार्पुर्वी तब्बल २७ लाख रुपए खर्च करून भारत निर्माण योजने अंतर्गत काम झाले आहे मात्र ही योजनाच अद्याप ग्रामपंचायतीने ताब्यात घेतली नसल्याने या योजनेत मोठे गौडबंगाल झाल्याचे समजते. तर लोणी या गावासाठी स्वतंत्र ग्रामसेविका असुनही त्या नियमीत नसून दुर्लक्षामुळे कृत्रीम पाणी टंचाई होत आहे तर दुषित पाण्याचीही गंभीर समस्या असतांनाही त्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. यावेळी अवंताबाई पाटील, शालुबाई पाटील, राधाबाई पाटील, रत्नाबाई कोळी, ईम्तीयाज तडवी, सुशिलाबाई सोनवणे, भुरीबाई तडवी, भारती धोबी, संजुबाई, सलमा तडवी, जयश्री पाटील, शिलाबाई सोनवणे, एकनाथ पाटील, कमलेश पाटील, श्रीराम कोळी, मनोज पाटील, दशरथ कोळी, अरूण पाटील, जुम्मा तडवी, अरूण पाटील, नारायण पाटील,यांच्यसह अनेक महिला व पुरूष उपस्थीत होते.