शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

आडात आहे, पोहऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

बऱ्याच वेळी विविध कामांसाठी अनेक विभागांना निधी मिळत नाही व कामे होत नाही, अशी ओरड असते. मात्र यंदा कोरोनाच्या ...

बऱ्याच वेळी विविध कामांसाठी अनेक विभागांना निधी मिळत नाही व कामे होत नाही, अशी ओरड असते. मात्र यंदा कोरोनाच्या सावटातही निधी आहे, मात्र तो कसा खर्च करावा, यासाठी जिल्ह्यात सर्वच यंत्रणांची तारेवरची कसरत सुरू आहे. यात मावळत्या वर्षाचा बराच निधी शिल्लक असल्याने व आगामी वर्षासाठीदेखील मोठा निधी प्रस्तावित असल्याने याचा उपयोग करून घेतल्यास जिल्ह्यातील बरीच विकास कामे मार्गी लागू शकतात. मात्र त्यासाठी केवळ यंत्रणांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला ३७५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र नंतर कोरोनामुळे ६७ टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याला केवळ १२३ कोटी रुपयांचाच निधी मिळाला. त्यानंतर संसर्ग कमी होत गेला व आर्थिक घडी रुळावर येत असताना जिल्ह्यासाठी १०० टक्के निधी उपलब्ध झाल्याने तो ३१ मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. मात्र आता केवळ पावणे दोन महिनेच शिल्लक असल्याने हा खर्च करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्याला ३७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला खरा मात्र जि.प. कडे तर गेल्या वर्षाचा ६३ कोटींचा निधी शिल्लक असल्याचे समोर आल्याने डीपीडीसी बैठकीतदेखील सर्वच लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे जि.प. यंत्रणेवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही असे सांगत दोन महिन्याच्या कामाला तीन वर्षे लागतात, असा आरोप केला. यात प्रत्येक टेबलवर फायली पडून राहतात, जि.प.मध्ये कायद्याला धरून काम चालते की कोणाच्या दबावाखाली जि.प. चालते, असा सवाल केला होता. तसेच ही कामे इतर यंत्रणांना देण्याची मागणीदेखील करण्यात आली. त्यानंतर मात्र जि.प.मध्ये निधीच्या नियोजनासाठी धावपळ सुरू असून ३१ मार्चपर्यंत हा निधी खर्च होतो की नाही, याकडे लक्ष लागलेले आहे. जि.प.च्या बाबतीत या विषयी यंदा प्रथमच ओरड होत नसून या पूर्वीदेखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हा शिल्लक असताना आता २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना ३०० कोटी ७२ लाख, अनुसूचित जाती उपयोजना ९१ कोटी ५९ लाख, आदिवासी उपयोजना क्षेत्र १५ कोटी ५१ लाख आणि आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र २८ कोटी ९५ लाख एवढी नियतव्ययाची मर्यादा दिली आहे. या मर्यादेत प्रारूप आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात रखडलेली अधिकाधिक कामे मार्गी लावण्यासाठी मावळत्या वर्षाचा व आगामी वर्षाच्या प्रस्तावित निधीचा उपयोग करून घेतल्यास जिल्ह्यातील बरीच विकास कामे मार्गी लागतील, यात शंका नाही.