शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अती पावसाने कांद्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 21:03 IST

पीक वखरून फेकण्याची दुर्दैवी वेळ : बिडगाव परिसरात कांदा उत्पादक हवालदिल

बिडगाव, ता.चोपडा : परिसरात गेल्या २० ते २५ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बहुतांश पिके वाया जाण्याच्या मार्गावर असून कांद्याच्या पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अती पावसाने लागवड केलेला कांदा खराब झाल्याने त्याच्यावर वखर फिरवून नष्ट करण्याची दुर्दैवी वेळ आल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.बिडगावसह परिसरातील धानोरा, देवगाव, पारगाव, पंचक, लोणी, मोहरद, वरगव्हान,खर्डी, लोणी, मितावली, पुणगाव आदी गावांना २०१३ नंतर म्हणजे तब्बल सहा वर्षांपासुन समाधानकारक पाऊस होत नव्हता. मात्र यावर्षी चांगला पाऊस झाला. चिंचपाणी धरणही भरले. सर्वच नदी-नाले वाहत आहेत. मात्र गेल्या २० ते २५ दिवसांपासुन परिसरात सुरू असलेल्या रिपरिप पावसाने पिकांवर करपा, मर, बुरशी अशा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्तम स्थितीत असलेल्या कापसावर बुरशीमुळे फुलपात्यांची गळ झाली आहे. मका पीक तर लष्करी अळीने पूर्णपणे नष्ट केले आहे.झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.