शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे दादरसह केळीच्या बागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीदेखील जळगाव शहरासह तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीदेखील जळगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे केळीलादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळात जिल्ह्यातील सुमारे सात हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. मंगळवारी झालेल्या वादळामुळे नुकसानीची आकडेवारी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक हवामान बदलामुळे यंदा प्रत्येक महिन्यात अवकाळी व वादळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. १९ मार्चपासून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, चोपडा व जळगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव शहर व परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा वेग जरी कमी असला तरी मात्र वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहर परिसरातील ग्रामीण भागामध्ये केळीचे मोठे नुकसान झाले. यासह आव्हाने, खेडी, वडनगरी ज्या भागातील दाद देखील पूर्णपणे आडवी झाली आहे, तर ज्या शेतकऱ्यांचा अद्यापही गहू काढण्यात आलेला नाही असा गहू पावसामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुन्हा मंगळवारी झालेल्या पावसामुळे नुकसानीची आकडेवारी वाढली आहे. आव्हाने, वडनगरी व कानडदा परिसरातील केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

तब्बल बारा तास वीज पुरवठा खंडित

मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हे वादळ कायम होतं, मात्र रात्री अकरा वाजेनंतर पाऊस व वादळानेदेखील विश्रांती घेतली. तासाभराच्या वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तसेच विद्युत तारादेखील तुटल्या असल्याने जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. बुधवारी सकाळीदेखील विद्युत खांब व विद्युत तारा जोडण्याचे काम सुरू असल्याने वीज पुरवठा बंद होता.

दादरच्या उत्पादनात येणार घट

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळे रबी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये गहू व हरभरा काढला गेल्यामुळे हे नुकसान टळले असले तरी, दादरचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे यंदा दादरच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सुमारे बावीस हजार हेक्टरवर दादरची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार हेक्‍टरवरील दादरला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.