शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे दादरसह केळीच्या बागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीदेखील जळगाव शहरासह तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीदेखील जळगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे केळीलादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळात जिल्ह्यातील सुमारे सात हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. मंगळवारी झालेल्या वादळामुळे नुकसानीची आकडेवारी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक हवामान बदलामुळे यंदा प्रत्येक महिन्यात अवकाळी व वादळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. १९ मार्चपासून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, चोपडा व जळगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव शहर व परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा वेग जरी कमी असला तरी मात्र वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहर परिसरातील ग्रामीण भागामध्ये केळीचे मोठे नुकसान झाले. यासह आव्हाने, खेडी, वडनगरी ज्या भागातील दाद देखील पूर्णपणे आडवी झाली आहे, तर ज्या शेतकऱ्यांचा अद्यापही गहू काढण्यात आलेला नाही असा गहू पावसामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुन्हा मंगळवारी झालेल्या पावसामुळे नुकसानीची आकडेवारी वाढली आहे. आव्हाने, वडनगरी व कानडदा परिसरातील केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

तब्बल बारा तास वीज पुरवठा खंडित

मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हे वादळ कायम होतं, मात्र रात्री अकरा वाजेनंतर पाऊस व वादळानेदेखील विश्रांती घेतली. तासाभराच्या वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तसेच विद्युत तारादेखील तुटल्या असल्याने जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. बुधवारी सकाळीदेखील विद्युत खांब व विद्युत तारा जोडण्याचे काम सुरू असल्याने वीज पुरवठा बंद होता.

दादरच्या उत्पादनात येणार घट

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळे रबी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये गहू व हरभरा काढला गेल्यामुळे हे नुकसान टळले असले तरी, दादरचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे यंदा दादरच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सुमारे बावीस हजार हेक्टरवर दादरची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार हेक्‍टरवरील दादरला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.