शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘सुपरफास्ट’ रस्ता ठरतोय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 22:47 IST

चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील स्थिती : स्पीडब्रेकर नसल्याने दरदिवशी अपघात, नागरिक उभारणार आंदोलन

चाळीसगाव : बहुतांशीवेळा खराब आणि खड्डेमय रस्त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतात. चकाचक आणि सुपरफास्ट रस्त्याविषयी नागरिकांना हायसे वाटते. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे रस्ता सुफरफास्ट असूनही तो डोकेदुखी कसा ठरतो, हे भडगाव रोडवरील वाढते अपघात पाहता सहज लक्षात येते. हा रस्ता जळगाव - चांदवड महामार्गावर असल्याने त्याचे काम पूर्ण होत आहे. ठिकठिकाणी स्पीडब्रेकर नसल्याने दरदिवशी रहदारी व वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. तातडीने स्पीडब्रेकर टाकावेत, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.जळगाव - चांदडवड मार्ग चाळीसगाव शहरातून जातो. भडगाव रोडमार्गे त्याचा शहरात प्रवेश होतो. खरजई नाका ते सिग्नल चौक हा प्रचंड वर्दळीचा व रहदारीचा भाग असून येथे मोठा रहिवासही आहे. साहजिकच रस्त्यावर नेहमीच पादचारी, सायलस्वार यांचीही गर्दी मोठी असते.रस्त्याचे दुपदरीकरण लवकरच पूर्ण होऊ घातले आहे. किरकोळ कामे वगळता शहरातर्गत ९० टक्के रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. रस्ता चकाचक आणि सुपरफास्ट झाला असताना तो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. नव्याने रस्ता तयार करताना त्यावर जुन्या रस्त्यानुसार ठिकठिकाणी स्पीडब्रेकर टाकणे गरजेचे होते. परंतु, मागणी करुनही स्पीडब्रेकर टाकले न गेल्याने नागरिक व रहिवासी संतप्त आहेत.नागरिाकंची मोठी वर्दळखरजई नाका ते सिग्नल चौक या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा, बँक, एलआयसी कार्यालय, पाच मंगल कार्यालय, बँकांचे एटीएम, चार पेट्रोलपंप, अंधशाळा, मुला - मुलींचे वसतिगृह, चार चौक, खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांची जनसंपर्क कार्यालये, अशी नागरिकांची मोठी वर्दळ असणारी गर्दीची ठिकाणे आहेत. 

डॉ. पूर्णपात्रे माध्य. विद्यालय, वाणी मंगल कार्यालय, कापड गिरणी, कॅप्टन कॉर्नर, अंधशाळा चौक, बसस्थानक, एलआयसी कार्यालय, खरजई नाका आदि ठिकाणी तातडीने स्पीडब्रेकर टाकणे आवश्यक व गरजेचेही आहे. डॉ. पूर्णपात्रे शाळेजवळ सकाळी, दुपारी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. यामुळे येथे स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक लावणे क्रमप्राप्त आहे. स्पीड ब्रेकर न टाकल्यास या भागात मोठे अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते. असे प्रसंग घडल्यास नागरिकांच्या संतापाचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. तातडीने दखल घ्यावी. अशी मागणी जोर धरत आहे. विवाह सोहळ्यांची लगबग असल्याने मंगल कार्यालये गदीर्ने ओंसाडून वाहत आहेत. रस्त्यावर कुठेही 'दिशादर्शक व इतर माहिती' देणारे फलक लावलेले नाहीत. शाळेत जाणा-या दोन ते अडीच हजार विद्यार्थी व पालकांची वर्दळ असते. काही विद्यार्थी सायकलवर तर काही विद्यार्थी बस व आ?टोरिक्षाने शाळांमध्ये येतात. अशावेळी सुसाट रस्त्यावरुन भरधाव वेगाने येणारी वाहने अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे.