शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपरफास्ट’ रस्ता ठरतोय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 22:47 IST

चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील स्थिती : स्पीडब्रेकर नसल्याने दरदिवशी अपघात, नागरिक उभारणार आंदोलन

चाळीसगाव : बहुतांशीवेळा खराब आणि खड्डेमय रस्त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतात. चकाचक आणि सुपरफास्ट रस्त्याविषयी नागरिकांना हायसे वाटते. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे रस्ता सुफरफास्ट असूनही तो डोकेदुखी कसा ठरतो, हे भडगाव रोडवरील वाढते अपघात पाहता सहज लक्षात येते. हा रस्ता जळगाव - चांदवड महामार्गावर असल्याने त्याचे काम पूर्ण होत आहे. ठिकठिकाणी स्पीडब्रेकर नसल्याने दरदिवशी रहदारी व वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. तातडीने स्पीडब्रेकर टाकावेत, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.जळगाव - चांदडवड मार्ग चाळीसगाव शहरातून जातो. भडगाव रोडमार्गे त्याचा शहरात प्रवेश होतो. खरजई नाका ते सिग्नल चौक हा प्रचंड वर्दळीचा व रहदारीचा भाग असून येथे मोठा रहिवासही आहे. साहजिकच रस्त्यावर नेहमीच पादचारी, सायलस्वार यांचीही गर्दी मोठी असते.रस्त्याचे दुपदरीकरण लवकरच पूर्ण होऊ घातले आहे. किरकोळ कामे वगळता शहरातर्गत ९० टक्के रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. रस्ता चकाचक आणि सुपरफास्ट झाला असताना तो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. नव्याने रस्ता तयार करताना त्यावर जुन्या रस्त्यानुसार ठिकठिकाणी स्पीडब्रेकर टाकणे गरजेचे होते. परंतु, मागणी करुनही स्पीडब्रेकर टाकले न गेल्याने नागरिक व रहिवासी संतप्त आहेत.नागरिाकंची मोठी वर्दळखरजई नाका ते सिग्नल चौक या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा, बँक, एलआयसी कार्यालय, पाच मंगल कार्यालय, बँकांचे एटीएम, चार पेट्रोलपंप, अंधशाळा, मुला - मुलींचे वसतिगृह, चार चौक, खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांची जनसंपर्क कार्यालये, अशी नागरिकांची मोठी वर्दळ असणारी गर्दीची ठिकाणे आहेत. 

डॉ. पूर्णपात्रे माध्य. विद्यालय, वाणी मंगल कार्यालय, कापड गिरणी, कॅप्टन कॉर्नर, अंधशाळा चौक, बसस्थानक, एलआयसी कार्यालय, खरजई नाका आदि ठिकाणी तातडीने स्पीडब्रेकर टाकणे आवश्यक व गरजेचेही आहे. डॉ. पूर्णपात्रे शाळेजवळ सकाळी, दुपारी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. यामुळे येथे स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक लावणे क्रमप्राप्त आहे. स्पीड ब्रेकर न टाकल्यास या भागात मोठे अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते. असे प्रसंग घडल्यास नागरिकांच्या संतापाचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. तातडीने दखल घ्यावी. अशी मागणी जोर धरत आहे. विवाह सोहळ्यांची लगबग असल्याने मंगल कार्यालये गदीर्ने ओंसाडून वाहत आहेत. रस्त्यावर कुठेही 'दिशादर्शक व इतर माहिती' देणारे फलक लावलेले नाहीत. शाळेत जाणा-या दोन ते अडीच हजार विद्यार्थी व पालकांची वर्दळ असते. काही विद्यार्थी सायकलवर तर काही विद्यार्थी बस व आ?टोरिक्षाने शाळांमध्ये येतात. अशावेळी सुसाट रस्त्यावरुन भरधाव वेगाने येणारी वाहने अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे.