शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

सोनसाखळी चोरीची घटना पाहिली अन‌् चोरी सुरु केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:17 IST

जळगाव : तिघे मित्र शहरात पायी फिरत असताना डोळ्यासमोर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी एका महिलेची सोनसाखळी लांबविली. त्या महिलेने आरडाओरड ...

जळगाव : तिघे मित्र शहरात पायी फिरत असताना डोळ्यासमोर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी एका महिलेची सोनसाखळी लांबविली. त्या महिलेने आरडाओरड केली, मात्र काहीच उपयोग झाला नाही. चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. काही सेकंदात हजारो रुपयांची सोनसाखळी पचविल्याचे पाहून आम्हीलाही ही बुध्दी सुचली. दुसऱ्या दिवशी अशाच पध्दतीने सोनसाखळी लांबविली. योगायोगाने ही घटना पचली, त्यामुळे दुसऱ्या घटनेत आणखी हिंमत केली व ती देखील घटना पचली..मग आम्ही मागे वळून पाहिले नाही चार महिन्यात शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकलोच..हे बोल आहेत सोनसाखळी लांबविणाऱ्या टोळीतील तिघा मित्रांचे.

पुण्यातून आकाश चौधरी याला ताब्यात घेतल्यानंतर जळगावात अमोल उर्फ रामेश्वर अहिरे व सागर चौधरी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व सहकाऱ्यांनी तिघांची एकत्रित चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यात कसे वळलो याची माहिती दिली. आकाश याचे वडील शहरात हातगाडीवर नारळ विक्री करतात तर आई कपडे इस्त्री करुन कुटुंबाला हातभार लावते. अमोल याचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात सागर हा मेकॅनिकल पदविधारक असून अभियंता आहे. वडील मनपात नोकरीला होते, आता निवृत्त झाल्यानंतर चारचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. सर्वांचे आई, वडील ऊन, थंडी व पावसाची तमा न बाळगता दिवसभर कष्ट करतात अन‌् मुलांनी चोरीचा मार्ग निवडल्याने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे.

बिग बाजारातून लांबविल्या होत्या एलईडी

आकाश सूर्यवंशी हा काही वर्षापूर्वी बिग बाजारात नोकरीला होता. तेथे त्याने दोन लाख रुपये किमतीच्या सात एलईडी टीव्ही चोरी केल्या होत्या. तेव्हा त्याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटकही झालेली होती. दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या बाहेर जावून सोनसाखळी लांबविण्याचे नियोजन केल्यानंतर ट्रॅव्हल्स बसमधून दुचाकी पुण्यात न्यायचे व तेथे दुचाकीचा वापर करायचे. सागर हा दुचाकी चालविण्यात तरबेज असून १४० च्या प्रतीवेगाने तो दुचाकी चालवितो तर आकाश हा चालत्या दुचाकीवरुन सोनसाखळी लांबविण्यात तरबेज आहे.

काही संशयित रडारवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीत तिघांच्या व्यतिरिक्त आणखी काही जण असण्याची शक्यता असून दागिनेही अजून हस्तगत होऊ शकतात. त्याबाबतचे धागेदोरे पोलिसांना मिळालेले आहेत. अटकेतील तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेतील तिघांकडून रामानंद नगर, भुसावळ बाजारपेठ, अमळनेर, चोपडा शहर, रावेर, भुसावळ शहर, मुक्ताईनगर, जळगाव तालुका व चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमधील सोनसाखळी हस्तगत करण्यात आल्या आहेत.