शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मतदार संघातील तरूण शेतकऱ्यांच्या संशोधनाला वाव मिळवून देऊ-हरिभाऊ जावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 17:20 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असलेले असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

ठळक मुद्देसंडे विशेष मुलाखतमहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांची ग्वाही

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असलेले असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.खºया अर्थाने कृषी व भूमिपुत्र असलेले आमदार हरिभाऊ जावळे यांचा शेती हा आवडीचा विषय आहे व त्यासाठीच ते सतत शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात व त्यांच्या प्रयत्नाने पिंपरूळ, ता.यावल येथे ताप्ती बनाना एनर्जी हा केळी खोडापासून विविध उत्पादन प्रक्रिया उद्योग उभा राहिलेला आहे.आमदार जावळे उपाध्यक्ष झालेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. त्यात राहुरी, परभणी, अकोला व दापोली कोकण येथील कृषि विद्यापीठांचा समावेश आहे. या चारही विद्यापीठांमध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी १० सप्टेंबर १९८४ मध्ये या परिषदेची स्थापना झाली आहे. या परिषदेमार्फत कृषी विद्यापीठांचा आढावा घेणे, त्यांचे मूल्यमापन व पर्यवेक्षण करणे व मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडणे आहे, शिक्षण, संशोधन व शिक्षण विस्तार हे तीन मुख्य विभाग करण्यात आले असून, धोरणात्मक निर्णय या परिषदेमार्फत घेतले जातात.आमदार जावळे यांची या परिषदेवर तीन वर्षांसाठी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. पण आगामी काळात निवडणुका असल्याने वेळ कमी असल्याने या संधीचे सोने शेतकºयांच्या हितासाठी करणे आहे बआमदार जावळे यांची भेट घेऊन त्यांचा आगामी काळात काय अजेंडा असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, या कृषी विद्यापीठांमध्ये सतत नवनवीन संशोधन होत असते. ते संशोधन शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्याचा फायदा शेतकरी बांधवांना करून देणे अर्थात 'लॅब टू लँड' संकल्पना राबविणे याला प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे रावेर, यावल तालुका व परिसरातील तरुण शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असतात. त्यांचे प्रयोग विद्यापीठापर्यंत पोहोचवणे त्यात अधिकची सुधारणा करणे व त्यांना शासकीय मान्यता मिळवून देत या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे.मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून हिंगोणा येथे हळद संशोधन केंद्राला ६० एकर जागा मिळालेली आहे. त्या जागेवर हळद संशोधन केंद्र उभारणे तसेच जमिनीखालील पिकांचे संशोधन व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न या केंद्रामार्फत राहणार आहे. तसेच पाल येथे हार्टिकल कॉलेज मंजूर आहे, त्याची उभारणी करणे व त्यासाठी आगामी काळात प्रयत्न राहणार आहे. याप्रसंगी मुलाखतीचा शेवट करताना आमदार जावळे यांनी सर्वात मुख्य व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेला प्रोजेक्ट शेतकºयांचे उत्पन्न कमी खर्चात दुप्पट करणे तसेच उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन त्यातून काढणे यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :interviewमुलाखतFaizpurफैजपूर