शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मतदार संघातील तरूण शेतकऱ्यांच्या संशोधनाला वाव मिळवून देऊ-हरिभाऊ जावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 17:20 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असलेले असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

ठळक मुद्देसंडे विशेष मुलाखतमहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांची ग्वाही

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असलेले असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.खºया अर्थाने कृषी व भूमिपुत्र असलेले आमदार हरिभाऊ जावळे यांचा शेती हा आवडीचा विषय आहे व त्यासाठीच ते सतत शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात व त्यांच्या प्रयत्नाने पिंपरूळ, ता.यावल येथे ताप्ती बनाना एनर्जी हा केळी खोडापासून विविध उत्पादन प्रक्रिया उद्योग उभा राहिलेला आहे.आमदार जावळे उपाध्यक्ष झालेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. त्यात राहुरी, परभणी, अकोला व दापोली कोकण येथील कृषि विद्यापीठांचा समावेश आहे. या चारही विद्यापीठांमध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी १० सप्टेंबर १९८४ मध्ये या परिषदेची स्थापना झाली आहे. या परिषदेमार्फत कृषी विद्यापीठांचा आढावा घेणे, त्यांचे मूल्यमापन व पर्यवेक्षण करणे व मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडणे आहे, शिक्षण, संशोधन व शिक्षण विस्तार हे तीन मुख्य विभाग करण्यात आले असून, धोरणात्मक निर्णय या परिषदेमार्फत घेतले जातात.आमदार जावळे यांची या परिषदेवर तीन वर्षांसाठी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. पण आगामी काळात निवडणुका असल्याने वेळ कमी असल्याने या संधीचे सोने शेतकºयांच्या हितासाठी करणे आहे बआमदार जावळे यांची भेट घेऊन त्यांचा आगामी काळात काय अजेंडा असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, या कृषी विद्यापीठांमध्ये सतत नवनवीन संशोधन होत असते. ते संशोधन शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्याचा फायदा शेतकरी बांधवांना करून देणे अर्थात 'लॅब टू लँड' संकल्पना राबविणे याला प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे रावेर, यावल तालुका व परिसरातील तरुण शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असतात. त्यांचे प्रयोग विद्यापीठापर्यंत पोहोचवणे त्यात अधिकची सुधारणा करणे व त्यांना शासकीय मान्यता मिळवून देत या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे.मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून हिंगोणा येथे हळद संशोधन केंद्राला ६० एकर जागा मिळालेली आहे. त्या जागेवर हळद संशोधन केंद्र उभारणे तसेच जमिनीखालील पिकांचे संशोधन व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न या केंद्रामार्फत राहणार आहे. तसेच पाल येथे हार्टिकल कॉलेज मंजूर आहे, त्याची उभारणी करणे व त्यासाठी आगामी काळात प्रयत्न राहणार आहे. याप्रसंगी मुलाखतीचा शेवट करताना आमदार जावळे यांनी सर्वात मुख्य व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेला प्रोजेक्ट शेतकºयांचे उत्पन्न कमी खर्चात दुप्पट करणे तसेच उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन त्यातून काढणे यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :interviewमुलाखतFaizpurफैजपूर