शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

बँकेतील पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

जळगाव : इंटरनेटमुळे एकीकडे सर्व व्यवहार ऑनलाइन होत आहेत, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. केवायसीच्या नावाने ...

जळगाव : इंटरनेटमुळे एकीकडे सर्व व्यवहार ऑनलाइन होत आहेत, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. केवायसीच्या नावाने कॉल करून गोपनीय माहिती विचारली जात असून, त्यामुळे क्षणात बँक खात्यातील पैसा वळविला जात आहे. जळगाव जिल्ह्यात असे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालय वेळोवेळी सरकारच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून लोकांना या नव्या पद्धतीने सतर्क करीत आहे.

केवायसीसाठी आपल्या मोबाइलवर कोणी लिंक पाठविली असल्यास मोहात पडू नका? याद्वारे आपल्या बँकेच्या खात्यातील पैसे गायब केले जाऊ शकतात. सध्या फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार कॉल किंवा एसएमएस करून लोकांना केवायसी करण्याच्या नावाखाली फसवत आहेत. अशा प्रकारे, लोकांकडून त्यांचे वैयक्तिक तपशील मिळवून ते गुन्हेगारी उपद्रव करीत आहेत. गृहमंत्रालयाने लोकांना अशी कोणतीही चूक न करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, तुमच्याकडे येणाऱ्या कोणत्याही कॉल, मेसेज किंवा ई-मेलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असेही म्हटले असून सायबर पोलिसांकडून नागरिकांना वेळोवेळी सावध केले जात आहे.

अशी होऊ शकते फसवणूक

अ) अमुक बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे केवायसी अपूर्ण आहे, त्यामुळे बँक खाते बंद होऊ शकते. असे सांगून आधारकार्ड, मोबाइल क्रमांक, दिनांक, वैधता याची पडताळणी करावयाची असल्याचे सांगून गोपनीय माहिती विचारून फसवणूक झाल्याचे प्रकरण सायबर पोलिसांकडे आलेले आहे.

ब) ‘ॲनीडेस्क’ किंवा ‘टीम विव्हर’सारखे कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करणे टाळावे. अशा अ‍ॅपसह आपल्या डिव्हाइसवर रिमोट ॲक्सेस देत असल्यास, फसवणूक करणाऱ्यांना आपला पिन, ओटीपी, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती मिळू शकेल. त्यामुळे आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत.

क) बनावट मेसेजबाबत सरकारकडून सतर्कता वेळोवेळी जारी केली जाते. यासह, तुम्ही अज्ञात नंबरवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि अशा मेसेजना फॉरवर्ड करणे टाळावे. जेणेकरून दुसरा कोणताही युजर्स फसवणुकीचा बळी पडू नये.

गेलेला पैसा परत मिळणे कठीण

ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क केला तर काही अंशी पैसे रोखले जाऊ शकतात. जळगाव जिल्ह्यात अजून तरी कोणाला पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे शक्यतो आपल्या बँक खात्याची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये.

कोट

मोबाइलवर येणारे मेसेज काळजीपूर्वक वाचले पाहिजे. मोबाइलवर आलेले ओटीपी, पासवर्ड व जो १६ अंकी क्रमांक असतो तो कोणालाही सांगू नये. कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाचे बँक खाते व एटीएमसंबंधी माहिती विचारत नाही, त्यामुळे कोणालाही ही माहिती देऊ नये. शंका वाटली तर बँकेत जाऊन खात्री करावी.

- बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे