शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रकल्पांतील साठा निम्मेच

By admin | Updated: November 23, 2015 00:08 IST

सावट पाणीटंचाईचे : अध्र्या डझनपेक्षा जास्त लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

नंदुरबार : दुष्काळाने होरपळणा:या जिल्ह्यातील विविध लघु प्रकल्पांमधील जलसाठा आजच्या स्थितीत निम्म्यावर आला असून, अध्र्या डझनपेक्षा जास्त प्रकल्पांनी तर तळ गाठला आहे. यामुळे आगामी सात महिने कसे निघतील, असा प्रश्न संभाव्य पाणीटंचाईच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनियमित व कमी पाऊस होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व धडगाव हे तीन तालुके दुष्काळी होते. यावर्षीदेखील पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. यानंतर पावसाने तब्बल 40 दिवस ओढ दिली आणि थोडी फार जी काही पिके हातात येणार होती तीही गेली. यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता दुसरीकडे पाणीटंचाईचा सामना शेतक:यांना करावा लागणार आहे.

शासकीय आकडेवारीनुसार पाऊस 86 टक्के दिसत असला तरी त्यात कोणतेही सातत्य राहिले नाही. त्यातच जिल्ह्यातील एकही लघु वा मध्यम प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला नाही. गेल्या दोन-तीन वर्षापासून कोणताही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याचे जिल्हावासीयांनी अनुभवले नाही. पावसाळ्याला अजून सहा महिने बाकी आहेत. परंतु गेल्या दीड महिन्यापासून कडक ऊन तापू लागले आहे. हिवाळा असतानाही हिवाळ्यासारखे वातावरण जाणवत नाही. सकाळी अकरानंतर तर सध्या उन्हाळा आहे की काय, असे वातावरण असते. दिवसेंदिवस तापणा:या उन्हाचा फटका पाण्याचे बाष्पीभवन होण्यावर होत आहे. विविध प्रकल्पांमधील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे.

जिल्ह्यात 37 लघु प्रकल्प आहेत. यातील अर्धा डझन प्रकल्पांमध्ये पाणी असूनही नसल्यासारखेच आहे. त्यातील खडकी प्रकल्पात 28 टक्के, खेकडा 32, मुगधन 33, नावली 6, सोनखडकी 7, सुलीपाडा 4, पावला 31, वावद 12, महूपाडा 35, गढावली प्रकल्पात 28 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

याशिवाय हळदाणी लघु प्रकल्पात 63 टक्के साठा शिल्लक आहे. तसेच खोकसा 64, मेंदीपाडा 46, रायंगण 71, विसरवाडी 95, धनीबारा 63, खोलघर 99, कोकणीपाडा 43, शनिमांडळ 96, ठाणेपाडा (2) 66, ठाणेपाडा (1) 89, वसलाय 55, दुधखेडा 49, खापरखेडा 89, कोंढावळ 72, राणीपूर 59, शहाणे 47, खडकुना 64, पाडळपूर 85, रोझवा 88, सिंगसपूर प्रकल्पात 90 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील रंगावली या मध्यम प्रकल्पात 98.45 टक्के, दरा मध्यम प्रकल्पात 97.62, तर शिवण मध्यम प्रकल्पात 41.11 टक्के जलसाठा शिल्लक आहे.