शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांतील साठा निम्मेच

By admin | Updated: November 23, 2015 00:08 IST

सावट पाणीटंचाईचे : अध्र्या डझनपेक्षा जास्त लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

नंदुरबार : दुष्काळाने होरपळणा:या जिल्ह्यातील विविध लघु प्रकल्पांमधील जलसाठा आजच्या स्थितीत निम्म्यावर आला असून, अध्र्या डझनपेक्षा जास्त प्रकल्पांनी तर तळ गाठला आहे. यामुळे आगामी सात महिने कसे निघतील, असा प्रश्न संभाव्य पाणीटंचाईच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनियमित व कमी पाऊस होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व धडगाव हे तीन तालुके दुष्काळी होते. यावर्षीदेखील पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. यानंतर पावसाने तब्बल 40 दिवस ओढ दिली आणि थोडी फार जी काही पिके हातात येणार होती तीही गेली. यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता दुसरीकडे पाणीटंचाईचा सामना शेतक:यांना करावा लागणार आहे.

शासकीय आकडेवारीनुसार पाऊस 86 टक्के दिसत असला तरी त्यात कोणतेही सातत्य राहिले नाही. त्यातच जिल्ह्यातील एकही लघु वा मध्यम प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला नाही. गेल्या दोन-तीन वर्षापासून कोणताही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याचे जिल्हावासीयांनी अनुभवले नाही. पावसाळ्याला अजून सहा महिने बाकी आहेत. परंतु गेल्या दीड महिन्यापासून कडक ऊन तापू लागले आहे. हिवाळा असतानाही हिवाळ्यासारखे वातावरण जाणवत नाही. सकाळी अकरानंतर तर सध्या उन्हाळा आहे की काय, असे वातावरण असते. दिवसेंदिवस तापणा:या उन्हाचा फटका पाण्याचे बाष्पीभवन होण्यावर होत आहे. विविध प्रकल्पांमधील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे.

जिल्ह्यात 37 लघु प्रकल्प आहेत. यातील अर्धा डझन प्रकल्पांमध्ये पाणी असूनही नसल्यासारखेच आहे. त्यातील खडकी प्रकल्पात 28 टक्के, खेकडा 32, मुगधन 33, नावली 6, सोनखडकी 7, सुलीपाडा 4, पावला 31, वावद 12, महूपाडा 35, गढावली प्रकल्पात 28 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

याशिवाय हळदाणी लघु प्रकल्पात 63 टक्के साठा शिल्लक आहे. तसेच खोकसा 64, मेंदीपाडा 46, रायंगण 71, विसरवाडी 95, धनीबारा 63, खोलघर 99, कोकणीपाडा 43, शनिमांडळ 96, ठाणेपाडा (2) 66, ठाणेपाडा (1) 89, वसलाय 55, दुधखेडा 49, खापरखेडा 89, कोंढावळ 72, राणीपूर 59, शहाणे 47, खडकुना 64, पाडळपूर 85, रोझवा 88, सिंगसपूर प्रकल्पात 90 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील रंगावली या मध्यम प्रकल्पात 98.45 टक्के, दरा मध्यम प्रकल्पात 97.62, तर शिवण मध्यम प्रकल्पात 41.11 टक्के जलसाठा शिल्लक आहे.