शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

प्रकल्पांतील साठा निम्मेच

By admin | Updated: November 23, 2015 00:08 IST

सावट पाणीटंचाईचे : अध्र्या डझनपेक्षा जास्त लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

नंदुरबार : दुष्काळाने होरपळणा:या जिल्ह्यातील विविध लघु प्रकल्पांमधील जलसाठा आजच्या स्थितीत निम्म्यावर आला असून, अध्र्या डझनपेक्षा जास्त प्रकल्पांनी तर तळ गाठला आहे. यामुळे आगामी सात महिने कसे निघतील, असा प्रश्न संभाव्य पाणीटंचाईच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनियमित व कमी पाऊस होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व धडगाव हे तीन तालुके दुष्काळी होते. यावर्षीदेखील पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. यानंतर पावसाने तब्बल 40 दिवस ओढ दिली आणि थोडी फार जी काही पिके हातात येणार होती तीही गेली. यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता दुसरीकडे पाणीटंचाईचा सामना शेतक:यांना करावा लागणार आहे.

शासकीय आकडेवारीनुसार पाऊस 86 टक्के दिसत असला तरी त्यात कोणतेही सातत्य राहिले नाही. त्यातच जिल्ह्यातील एकही लघु वा मध्यम प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला नाही. गेल्या दोन-तीन वर्षापासून कोणताही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याचे जिल्हावासीयांनी अनुभवले नाही. पावसाळ्याला अजून सहा महिने बाकी आहेत. परंतु गेल्या दीड महिन्यापासून कडक ऊन तापू लागले आहे. हिवाळा असतानाही हिवाळ्यासारखे वातावरण जाणवत नाही. सकाळी अकरानंतर तर सध्या उन्हाळा आहे की काय, असे वातावरण असते. दिवसेंदिवस तापणा:या उन्हाचा फटका पाण्याचे बाष्पीभवन होण्यावर होत आहे. विविध प्रकल्पांमधील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे.

जिल्ह्यात 37 लघु प्रकल्प आहेत. यातील अर्धा डझन प्रकल्पांमध्ये पाणी असूनही नसल्यासारखेच आहे. त्यातील खडकी प्रकल्पात 28 टक्के, खेकडा 32, मुगधन 33, नावली 6, सोनखडकी 7, सुलीपाडा 4, पावला 31, वावद 12, महूपाडा 35, गढावली प्रकल्पात 28 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

याशिवाय हळदाणी लघु प्रकल्पात 63 टक्के साठा शिल्लक आहे. तसेच खोकसा 64, मेंदीपाडा 46, रायंगण 71, विसरवाडी 95, धनीबारा 63, खोलघर 99, कोकणीपाडा 43, शनिमांडळ 96, ठाणेपाडा (2) 66, ठाणेपाडा (1) 89, वसलाय 55, दुधखेडा 49, खापरखेडा 89, कोंढावळ 72, राणीपूर 59, शहाणे 47, खडकुना 64, पाडळपूर 85, रोझवा 88, सिंगसपूर प्रकल्पात 90 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील रंगावली या मध्यम प्रकल्पात 98.45 टक्के, दरा मध्यम प्रकल्पात 97.62, तर शिवण मध्यम प्रकल्पात 41.11 टक्के जलसाठा शिल्लक आहे.