शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अर्धा तास दम‘धार’ ; मनपाच्या कृपेने जळगाव पुन्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास झालेल्या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अर्धातासाच्या पावसातच शहरातील मुख्य रस्त्यांसह शहरातील गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे गटारीचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. मनपाकडून नालेसफाईचे दावे केले जात असले तरी या पावसात मनपाच्या दाव्यांचे पूर्णपणे पितळ उघडे पडले.

रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडागडाटासह शहरात सुमारे अर्धातास दमदार हजेरी लावली. नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे शहरातील मुख्य नाले व उपनाले सोडाच गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हर फ्लो झाल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.

गायत्री नगराजवळील नाल्याचे पाणी रस्त्यावर

शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या गायत्री नगराजवळील दवंड्या नाल्याची सफाईदेखील व्यवस्थित न झाल्याने रविवारी झालेल्या अर्ध्यातासाच्या पावसातच नाला ओव्हर फ्लो झाला होता. नाल्याचे पाणी लहान पुलावरून वाहत असल्याने याठिकाणी वाहने चालविताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. याठिकाणची ही समस्या कायमचीच आहे. नेहमी रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत.

विवेकानंद नगरात झाड पडले

विवेकानंद नगर भागात रविवारी झालेल्या पावसामुळे ५० वर्षे जुने निंबाचे झाड कोसळले. सुदैवाने यावेळी रस्त्यालगत वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हे झाड रस्त्यावर पडल्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती. तसेच यामुळे या भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. यासह शहरातील खोटेनगर भागातदेखील एक लहान वृक्ष कोसळला होता. तर आशाबाबा नगर परिसरातदेखील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या.

नेहमीच्या ठिकाणी साचले पाणी

शहरात थोडा पाऊस झाला की, काही भागात नेहमीच पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असते. वर्षानुवर्षे ही पाणी साचण्याची समस्या कायम असूनही यावर मनपा प्रशासनाला कायमचा तोडगा काढता आलेला नाही. रविवारीदेखील नवीपेठ, आकाशवाणी चौक, बी.जे.मार्केट परिसर, प्रभात चौक, भोईटे शाळा परिसर, नवसाचा गणपती मंदिर परिसर, ख्वॉजामिया चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

नालेसफाईचा केवळ देखावा, प्रत्यक्षात काम शून्य

शहरातील नालेसफाईचे काम यावर्षी अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे झालेले दिसून येत आहे. मनपा प्रशासनाने केलेले नालेसफाईचे दावे पूर्णपणे फोल ठरत असून, नालेसफाईचा प्रशासनाकडून केवळ देखावा केलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनपाकडून आता लहान गटारी देखील साफ केल्या जात नसल्याने थोड्याशाच पावसात या गटारीदेखील ओव्हर फ्लो होत आहेत. मनपाने नालेसफाईवर केलेला २० लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेल्याचे चित्र यावर्षीच्या नालेसफाईवरून दिसून येत आहे.

पावसामुळे पिकांना जीवदान

रविवारी जळगाव शहरासोबतच तालुक्यातील शिरसोली, आव्हाणे, वडली, बिलवाडी, खेडी, फुपनगरी परिसरात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे सोयाबीन, कोरडवाहू कापसावर असलेले दुबार पेरणीचे संकट काही अंशी दूर झाले आहे. तर मूग, उडीदलादेखील या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.