शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अर्धा तास दम‘धार’ ; मनपाच्या कृपेने जळगाव पुन्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास झालेल्या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अर्धातासाच्या पावसातच शहरातील मुख्य रस्त्यांसह शहरातील गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे गटारीचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. मनपाकडून नालेसफाईचे दावे केले जात असले तरी या पावसात मनपाच्या दाव्यांचे पूर्णपणे पितळ उघडे पडले.

रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडागडाटासह शहरात सुमारे अर्धातास दमदार हजेरी लावली. नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे शहरातील मुख्य नाले व उपनाले सोडाच गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हर फ्लो झाल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.

गायत्री नगराजवळील नाल्याचे पाणी रस्त्यावर

शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या गायत्री नगराजवळील दवंड्या नाल्याची सफाईदेखील व्यवस्थित न झाल्याने रविवारी झालेल्या अर्ध्यातासाच्या पावसातच नाला ओव्हर फ्लो झाला होता. नाल्याचे पाणी लहान पुलावरून वाहत असल्याने याठिकाणी वाहने चालविताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. याठिकाणची ही समस्या कायमचीच आहे. नेहमी रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत.

विवेकानंद नगरात झाड पडले

विवेकानंद नगर भागात रविवारी झालेल्या पावसामुळे ५० वर्षे जुने निंबाचे झाड कोसळले. सुदैवाने यावेळी रस्त्यालगत वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हे झाड रस्त्यावर पडल्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती. तसेच यामुळे या भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. यासह शहरातील खोटेनगर भागातदेखील एक लहान वृक्ष कोसळला होता. तर आशाबाबा नगर परिसरातदेखील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या.

नेहमीच्या ठिकाणी साचले पाणी

शहरात थोडा पाऊस झाला की, काही भागात नेहमीच पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असते. वर्षानुवर्षे ही पाणी साचण्याची समस्या कायम असूनही यावर मनपा प्रशासनाला कायमचा तोडगा काढता आलेला नाही. रविवारीदेखील नवीपेठ, आकाशवाणी चौक, बी.जे.मार्केट परिसर, प्रभात चौक, भोईटे शाळा परिसर, नवसाचा गणपती मंदिर परिसर, ख्वॉजामिया चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

नालेसफाईचा केवळ देखावा, प्रत्यक्षात काम शून्य

शहरातील नालेसफाईचे काम यावर्षी अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे झालेले दिसून येत आहे. मनपा प्रशासनाने केलेले नालेसफाईचे दावे पूर्णपणे फोल ठरत असून, नालेसफाईचा प्रशासनाकडून केवळ देखावा केलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनपाकडून आता लहान गटारी देखील साफ केल्या जात नसल्याने थोड्याशाच पावसात या गटारीदेखील ओव्हर फ्लो होत आहेत. मनपाने नालेसफाईवर केलेला २० लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेल्याचे चित्र यावर्षीच्या नालेसफाईवरून दिसून येत आहे.

पावसामुळे पिकांना जीवदान

रविवारी जळगाव शहरासोबतच तालुक्यातील शिरसोली, आव्हाणे, वडली, बिलवाडी, खेडी, फुपनगरी परिसरात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे सोयाबीन, कोरडवाहू कापसावर असलेले दुबार पेरणीचे संकट काही अंशी दूर झाले आहे. तर मूग, उडीदलादेखील या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.