शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा तास दम‘धार’ ; मनपाच्या कृपेने जळगाव पुन्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास झालेल्या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अर्धातासाच्या पावसातच शहरातील मुख्य रस्त्यांसह शहरातील गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे गटारीचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. मनपाकडून नालेसफाईचे दावे केले जात असले तरी या पावसात मनपाच्या दाव्यांचे पूर्णपणे पितळ उघडे पडले.

रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडागडाटासह शहरात सुमारे अर्धातास दमदार हजेरी लावली. नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे शहरातील मुख्य नाले व उपनाले सोडाच गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हर फ्लो झाल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.

गायत्री नगराजवळील नाल्याचे पाणी रस्त्यावर

शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या गायत्री नगराजवळील दवंड्या नाल्याची सफाईदेखील व्यवस्थित न झाल्याने रविवारी झालेल्या अर्ध्यातासाच्या पावसातच नाला ओव्हर फ्लो झाला होता. नाल्याचे पाणी लहान पुलावरून वाहत असल्याने याठिकाणी वाहने चालविताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. याठिकाणची ही समस्या कायमचीच आहे. नेहमी रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत.

विवेकानंद नगरात झाड पडले

विवेकानंद नगर भागात रविवारी झालेल्या पावसामुळे ५० वर्षे जुने निंबाचे झाड कोसळले. सुदैवाने यावेळी रस्त्यालगत वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हे झाड रस्त्यावर पडल्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती. तसेच यामुळे या भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. यासह शहरातील खोटेनगर भागातदेखील एक लहान वृक्ष कोसळला होता. तर आशाबाबा नगर परिसरातदेखील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या.

नेहमीच्या ठिकाणी साचले पाणी

शहरात थोडा पाऊस झाला की, काही भागात नेहमीच पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असते. वर्षानुवर्षे ही पाणी साचण्याची समस्या कायम असूनही यावर मनपा प्रशासनाला कायमचा तोडगा काढता आलेला नाही. रविवारीदेखील नवीपेठ, आकाशवाणी चौक, बी.जे.मार्केट परिसर, प्रभात चौक, भोईटे शाळा परिसर, नवसाचा गणपती मंदिर परिसर, ख्वॉजामिया चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

नालेसफाईचा केवळ देखावा, प्रत्यक्षात काम शून्य

शहरातील नालेसफाईचे काम यावर्षी अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे झालेले दिसून येत आहे. मनपा प्रशासनाने केलेले नालेसफाईचे दावे पूर्णपणे फोल ठरत असून, नालेसफाईचा प्रशासनाकडून केवळ देखावा केलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनपाकडून आता लहान गटारी देखील साफ केल्या जात नसल्याने थोड्याशाच पावसात या गटारीदेखील ओव्हर फ्लो होत आहेत. मनपाने नालेसफाईवर केलेला २० लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेल्याचे चित्र यावर्षीच्या नालेसफाईवरून दिसून येत आहे.

पावसामुळे पिकांना जीवदान

रविवारी जळगाव शहरासोबतच तालुक्यातील शिरसोली, आव्हाणे, वडली, बिलवाडी, खेडी, फुपनगरी परिसरात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे सोयाबीन, कोरडवाहू कापसावर असलेले दुबार पेरणीचे संकट काही अंशी दूर झाले आहे. तर मूग, उडीदलादेखील या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.