शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अर्धा तास दम‘धार’ ; मनपाच्या कृपेने जळगाव पुन्हा जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास झालेल्या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अर्धातासाच्या पावसातच शहरातील मुख्य रस्त्यांसह शहरातील गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे गटारीचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. मनपाकडून नालेसफाईचे दावे केले जात असले तरी या पावसात मनपाच्या दाव्यांचे पूर्णपणे पितळ उघडे पडले.

रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडागडाटासह शहरात सुमारे अर्धातास दमदार हजेरी लावली. नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे शहरातील मुख्य नाले व उपनाले सोडाच गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हर फ्लो झाल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.

गायत्री नगराजवळील नाल्याचे पाणी रस्त्यावर

शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या गायत्री नगराजवळील दवंड्या नाल्याची सफाईदेखील व्यवस्थित न झाल्याने रविवारी झालेल्या अर्ध्यातासाच्या पावसातच नाला ओव्हर फ्लो झाला होता. नाल्याचे पाणी लहान पुलावरून वाहत असल्याने याठिकाणी वाहने चालविताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. याठिकाणची ही समस्या कायमचीच आहे. नेहमी रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत.

विवेकानंद नगरात झाड पडले

विवेकानंद नगर भागात रविवारी झालेल्या पावसामुळे ५० वर्षे जुने निंबाचे झाड कोसळले. सुदैवाने यावेळी रस्त्यालगत वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हे झाड रस्त्यावर पडल्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती. तसेच यामुळे या भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. यासह शहरातील खोटेनगर भागातदेखील एक लहान वृक्ष कोसळला होता. तर आशाबाबा नगर परिसरातदेखील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या.

नेहमीच्या ठिकाणी साचले पाणी

शहरात थोडा पाऊस झाला की, काही भागात नेहमीच पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असते. वर्षानुवर्षे ही पाणी साचण्याची समस्या कायम असूनही यावर मनपा प्रशासनाला कायमचा तोडगा काढता आलेला नाही. रविवारीदेखील नवीपेठ, आकाशवाणी चौक, बी.जे.मार्केट परिसर, प्रभात चौक, भोईटे शाळा परिसर, नवसाचा गणपती मंदिर परिसर, ख्वॉजामिया चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

नालेसफाईचा केवळ देखावा, प्रत्यक्षात काम शून्य

शहरातील नालेसफाईचे काम यावर्षी अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे झालेले दिसून येत आहे. मनपा प्रशासनाने केलेले नालेसफाईचे दावे पूर्णपणे फोल ठरत असून, नालेसफाईचा प्रशासनाकडून केवळ देखावा केलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनपाकडून आता लहान गटारी देखील साफ केल्या जात नसल्याने थोड्याशाच पावसात या गटारीदेखील ओव्हर फ्लो होत आहेत. मनपाने नालेसफाईवर केलेला २० लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेल्याचे चित्र यावर्षीच्या नालेसफाईवरून दिसून येत आहे.

पावसामुळे पिकांना जीवदान

रविवारी जळगाव शहरासोबतच तालुक्यातील शिरसोली, आव्हाणे, वडली, बिलवाडी, खेडी, फुपनगरी परिसरात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे सोयाबीन, कोरडवाहू कापसावर असलेले दुबार पेरणीचे संकट काही अंशी दूर झाले आहे. तर मूग, उडीदलादेखील या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.