शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

वादळी पावसामुळे निम्मे शहर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे रविवारी जळगाव शहरात दुपारपासून वादळी पावसाने हजेरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे रविवारी जळगाव शहरात दुपारपासून वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वीज तारा तुटल्याने निम्मे शहर अंधारात होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीज आली. मात्र, अवघ्या दहा तेे पंधरा मिनिटांत पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला. तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या पट्ट्यात केळी बागांना वादळामुळे मोठा फटका बसला. वीज गायब झाल्याने त्यांचा फटका दूरसंचार यंत्रणेवर झाला. त्याचा फटका इंटरनेट सेवेला बसल्याने अनेक कामाचा खोळंबा झाला.

रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून जळगाव शहर व तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांसह शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

तापमानात मोठी घट

रविवारी दुपारी तीन वाजल्यानंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. दुपारी बारा वाजेपर्यंत शहराचा पारा ४२ अंशांवर कायम होता. मात्र, दुपारी चार वाजल्यानंतर तापमानात मोठी घट होऊन, पारा ३५ अंशांपर्यंत खाली आला होता. यामुळे काही प्रमाणात गारवा जाणवत होता. शहर व तालुका परिसरात दुपारी तीन वाजल्यानंतर २० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने केळीच्या लवकर लागवड झालेल्या कांदे बागाला मोठे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यातील कठोरा, भोकर, आव्हाने, खेडी, फुपनगरी, गाढाेदे, पळसोद या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढगाळ वातावरण आणि जोरदार वारा येत आहे.

विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित

दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जळगाव तालुक्यातील मुख्य फिडर वर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शिरसोली, म्हसावद, वावडदा या गावांमधील वीजपुरवठा रात्री अकरा वाजेपर्यंत खंडित झाला होता. तर आव्हाणे, खेडी परिसरातील विद्युत तारा तुटल्यामुळे या गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता. तसेच जळगाव शहरातील अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, वाघुर धरण परिसरातील मुख्य फिडरवरदेखील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही तास वीज बंद झाली होती. दरम्यान, यामुळे शहराचा पाणीपुरवठ्यावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

आरएमएस काॅलनीत झाड कोसळले

शहरातील नेहरू नगर, महाबळ, मोहननगर, आरएमएस काॅलनी, भवानी पेठ, जुने जळगाव, रिंग रोड यासह अन्य भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, अवघ्या १० ते १५ मिनिटांत पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत विजेचा लंपडाव सुरू होता. आरएमएस काॅलनीमध्ये विजेच्या खांबावर झाड कोसळल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांनी याबाबत महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

वीजवाहिन्या व झाड कोसळले

शहरातील भजे गल्ली, भास्कर मार्केट परिसरात वीजवाहिन्या तुटल्या होत्या. तर चिमुकले राममंदिर, रिंगरोड, पिंप्राळा व हरिविठ्ठल नगर भागात झाडे व फांद्या तुटून वीज वाहिनीवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचे नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर

शहरातील विविध भागातील वीज गायब झाल्यानंतर नागरिकांनी चौकशीसाठी टोल फ्री नंबर तसेच त्या भागातील वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क सुरू केला. मात्र, काही वेळेनंतर हे नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आढळून आले.