शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

सुधारित पैसेवारीवर निम्मे जिल्हा संतप्त

By admin | Updated: November 18, 2015 01:14 IST

जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पैसेवारी जाहीर केल्यानंतर ग्रामस्थांच्या हरकती मागविण्याबाबत प्रक्रियाच राबविली गेली नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी असून याबाबत आता फेरसव्रेक्षण करून वास्तव स्थिती मांडण्याची गरज आहे.

पावसात अनियमिता

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनियमित व कमी पाऊस होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व धडगाव हे तीन तालुके दुष्काळी होते. या वर्षीदेखील पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, उडीद, मूग या सर्वच पिकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. शेतक:यांना लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे शेतक:यांमध्ये चिंतेचे सावट असून शासनाकडून मदतीची अपेक्षा लावून असतानाच सुधारित पैसेवारीत केवळ तीनच तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिका:यांनी महसूल आयुक्तांकडे पाठविल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

पाऊस लांबला

नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या पैसेवारी सव्रेक्षणात जिल्ह्यातील सर्व 885 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिका:यांनी महसूल आयुक्तांना दिला होता. त्या वेळी सरासरी केवळ 66.24 टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस समाधानकारक झाला.

परंतु हा पाऊस मुळातच लांबल्याने त्याचा पिकांना कुठलाही फायदा झाला नाही. उलट उत्पादनापेक्षा मका, ज्वारी या पिकांचा किमान चारा उपयोगी ठरेल अशी आस लावून बसलेल्या शेतक:यांचे नुकसान झाले. कारण या पावसाने चाराही सडला होता. त्यामुळे त्याचे उत्पादनही मिळाले नाही.

हे वास्तव असताना प्रशासनाने 31 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीत शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविली. या पैसेवारीसंदर्भात विविध गावातील सरपंच व ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी ही पैसेवारीच चुकीची काढल्याचे सांगितले.

पैसेवारी काढणा:या एका महसूल विभागातील कर्मचा:याशी संपर्क साधला असता त्यांनी

विविध गावातील सरपंचांनीही आता त्याबाबत रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या हरकती घ्याव्यात व त्यानुसार अंतिम पैसेवारी जाहीर करावी, अशी अपेक्षा लागून आहे.

‘वरूनच 50 पैशांपेक्षा अधिक दाखवा’ अशा सूचना आल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सुधारित पैसेवारीसंदर्भात जिल्हाधिका:यांनी 31 ऑक्टोबरला महसूल आयुक्तांना अहवाल पाठविला. परंतु त्यानंतर पैसेवारीबाबत गावांमध्ये दवंडी देण्यात आली नाही किंवा त्यावर हरकती मागविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ याबाबत अंधारातच आहेत.