शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित पैसेवारीवर निम्मे जिल्हा संतप्त

By admin | Updated: November 18, 2015 01:14 IST

जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पैसेवारी जाहीर केल्यानंतर ग्रामस्थांच्या हरकती मागविण्याबाबत प्रक्रियाच राबविली गेली नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी असून याबाबत आता फेरसव्रेक्षण करून वास्तव स्थिती मांडण्याची गरज आहे.

पावसात अनियमिता

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनियमित व कमी पाऊस होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व धडगाव हे तीन तालुके दुष्काळी होते. या वर्षीदेखील पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, उडीद, मूग या सर्वच पिकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. शेतक:यांना लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे शेतक:यांमध्ये चिंतेचे सावट असून शासनाकडून मदतीची अपेक्षा लावून असतानाच सुधारित पैसेवारीत केवळ तीनच तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिका:यांनी महसूल आयुक्तांकडे पाठविल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

पाऊस लांबला

नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या पैसेवारी सव्रेक्षणात जिल्ह्यातील सर्व 885 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिका:यांनी महसूल आयुक्तांना दिला होता. त्या वेळी सरासरी केवळ 66.24 टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस समाधानकारक झाला.

परंतु हा पाऊस मुळातच लांबल्याने त्याचा पिकांना कुठलाही फायदा झाला नाही. उलट उत्पादनापेक्षा मका, ज्वारी या पिकांचा किमान चारा उपयोगी ठरेल अशी आस लावून बसलेल्या शेतक:यांचे नुकसान झाले. कारण या पावसाने चाराही सडला होता. त्यामुळे त्याचे उत्पादनही मिळाले नाही.

हे वास्तव असताना प्रशासनाने 31 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीत शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविली. या पैसेवारीसंदर्भात विविध गावातील सरपंच व ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी ही पैसेवारीच चुकीची काढल्याचे सांगितले.

पैसेवारी काढणा:या एका महसूल विभागातील कर्मचा:याशी संपर्क साधला असता त्यांनी

विविध गावातील सरपंचांनीही आता त्याबाबत रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या हरकती घ्याव्यात व त्यानुसार अंतिम पैसेवारी जाहीर करावी, अशी अपेक्षा लागून आहे.

‘वरूनच 50 पैशांपेक्षा अधिक दाखवा’ अशा सूचना आल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सुधारित पैसेवारीसंदर्भात जिल्हाधिका:यांनी 31 ऑक्टोबरला महसूल आयुक्तांना अहवाल पाठविला. परंतु त्यानंतर पैसेवारीबाबत गावांमध्ये दवंडी देण्यात आली नाही किंवा त्यावर हरकती मागविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ याबाबत अंधारातच आहेत.