शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित पैसेवारीवर निम्मे जिल्हा संतप्त

By admin | Updated: November 18, 2015 01:14 IST

जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पैसेवारी जाहीर केल्यानंतर ग्रामस्थांच्या हरकती मागविण्याबाबत प्रक्रियाच राबविली गेली नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी असून याबाबत आता फेरसव्रेक्षण करून वास्तव स्थिती मांडण्याची गरज आहे.

पावसात अनियमिता

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनियमित व कमी पाऊस होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व धडगाव हे तीन तालुके दुष्काळी होते. या वर्षीदेखील पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, उडीद, मूग या सर्वच पिकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. शेतक:यांना लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे शेतक:यांमध्ये चिंतेचे सावट असून शासनाकडून मदतीची अपेक्षा लावून असतानाच सुधारित पैसेवारीत केवळ तीनच तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिका:यांनी महसूल आयुक्तांकडे पाठविल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

पाऊस लांबला

नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या पैसेवारी सव्रेक्षणात जिल्ह्यातील सर्व 885 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिका:यांनी महसूल आयुक्तांना दिला होता. त्या वेळी सरासरी केवळ 66.24 टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस समाधानकारक झाला.

परंतु हा पाऊस मुळातच लांबल्याने त्याचा पिकांना कुठलाही फायदा झाला नाही. उलट उत्पादनापेक्षा मका, ज्वारी या पिकांचा किमान चारा उपयोगी ठरेल अशी आस लावून बसलेल्या शेतक:यांचे नुकसान झाले. कारण या पावसाने चाराही सडला होता. त्यामुळे त्याचे उत्पादनही मिळाले नाही.

हे वास्तव असताना प्रशासनाने 31 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीत शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविली. या पैसेवारीसंदर्भात विविध गावातील सरपंच व ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी ही पैसेवारीच चुकीची काढल्याचे सांगितले.

पैसेवारी काढणा:या एका महसूल विभागातील कर्मचा:याशी संपर्क साधला असता त्यांनी

विविध गावातील सरपंचांनीही आता त्याबाबत रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या हरकती घ्याव्यात व त्यानुसार अंतिम पैसेवारी जाहीर करावी, अशी अपेक्षा लागून आहे.

‘वरूनच 50 पैशांपेक्षा अधिक दाखवा’ अशा सूचना आल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सुधारित पैसेवारीसंदर्भात जिल्हाधिका:यांनी 31 ऑक्टोबरला महसूल आयुक्तांना अहवाल पाठविला. परंतु त्यानंतर पैसेवारीबाबत गावांमध्ये दवंडी देण्यात आली नाही किंवा त्यावर हरकती मागविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ याबाबत अंधारातच आहेत.